शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

कुटुंबातील एक तरी सैन्यात असावाच

By admin | Updated: May 7, 2017 03:26 IST

देशात शिस्तप्रिय पिढी तयार करायची असेल, तर शिस्तीचे धडे हे शालेय जीवनातच द्यायला हवेत़ देशाच्या सेवेसाठी प्रत्येक कुटुंबीयांनी एक जण

 लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : देशात शिस्तप्रिय पिढी तयार करायची असेल, तर शिस्तीचे धडे हे शालेय जीवनातच द्यायला हवेत़ देशाच्या सेवेसाठी प्रत्येक कुटुंबीयांनी एक जण तरी सैन्य दलात भरती करावा, अशी अपेक्षा वीरचक्रविजेते निवृत्त कर्नल सदानंद साळुंखे यांनी व्यक्त केली़ दीवा प्रतिष्ठान आणि वीर हनुमान मित्रमंडळ यांच्या वतीने मालतीताई माधवराव मानकर यांच्या स्मरणार्थ देण्यात येणाऱ्या यशोदा पुरस्काराचे वितरण साळुंखे यांच्या हस्ते करण्यात आले़, त्या वेळी ते बोलत होते़ माजी उपमहापौर दीपक मानकर यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते़ या वेळी माधवराव मानकर, माजी आमदार उल्हास पवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, मंगला कांबळे, दीपक मानकर, सैनिक मित्र परिवारचे अध्यक्ष अशोक मेहेंदळे, सरिता साळुंखे, हवालदार अशोक गावडे, शहीद लेफ्टनंट जनरल मनीष कदम यांचे वडील शशिकांत कदम, दत्ता सागरे, वसुधा मानकर, दीवा प्रतिष्ठानचे संस्थापक हर्षवर्धन मानकर, अध्यक्ष करण मानकर, साधना वर्तक आदी उपस्थित होते़ या वेळी वीरपिता शशिकांत कदम आणि अमोल चौघुले यांचा विशेष सत्कार करुन आर्थिक मदतीचा हात देण्यात आला़ साळुंखे म्हणाले, ‘‘प्रत्येक जवानाचा सन्मान करणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे़ सैनिकांच्या कुटुंबीयांना दिलेला मदतीचा हात सर्वांना प्रेरणादायी आहे़’’वीरमाता महालक्ष्मी गावडे म्हणाल्या, ‘‘मुलगा देशासाठी शहीद झाला असल,ा तरी त्यांची दोन्ही मुलेही सैन्यातच भरती करणार आहोत़’’ हर्षवर्धन मानकर यांनी प्रास्ताविक केले. आनंद सराफ यांनी आभार मानले़ उल्हास पवार म्हणाले, ‘‘एकीकडे आपण युद्धावेळी सैनिकांचे कौतुक करतो आणि दुसरीकडे मांडवगण फराटा गावात सैनिक चौघुले यांचे घर पाडले जाते, ही भूमिका योग्य नाही़’’दीपक मानकर म्हणाले, ‘‘सुभेदार खंडोजी मानकर यांचा वसा जपताना शहिदांना वंदन आणि मदतीचा हात देण्याची प्रेरणा मिळाली़ त्यातूनच यशोदा पुरस्कार देताना त्यासोबत सैनिकांच्या कुटुंबीयांनाही गौरवले जावे़’’