शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
2
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
3
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
4
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
5
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
6
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
7
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
8
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती
9
"कमेंट्समध्ये ट्रोल करतात अन् पर्सनल मेसेजमध्ये लोक...", राजेश्वरी खरातने व्यक्त केला राग
10
विमान अपघातापासून बॉलिवूडच्या सुपरस्टारचा थोडक्यात वाचलेला जीव, काय घडलेलं?
11
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
12
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
13
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
14
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
15
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
16
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
17
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
18
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
19
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
20
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!

कुटुंबातील एक तरी सैन्यात असावाच

By admin | Updated: May 7, 2017 03:26 IST

देशात शिस्तप्रिय पिढी तयार करायची असेल, तर शिस्तीचे धडे हे शालेय जीवनातच द्यायला हवेत़ देशाच्या सेवेसाठी प्रत्येक कुटुंबीयांनी एक जण

 लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : देशात शिस्तप्रिय पिढी तयार करायची असेल, तर शिस्तीचे धडे हे शालेय जीवनातच द्यायला हवेत़ देशाच्या सेवेसाठी प्रत्येक कुटुंबीयांनी एक जण तरी सैन्य दलात भरती करावा, अशी अपेक्षा वीरचक्रविजेते निवृत्त कर्नल सदानंद साळुंखे यांनी व्यक्त केली़ दीवा प्रतिष्ठान आणि वीर हनुमान मित्रमंडळ यांच्या वतीने मालतीताई माधवराव मानकर यांच्या स्मरणार्थ देण्यात येणाऱ्या यशोदा पुरस्काराचे वितरण साळुंखे यांच्या हस्ते करण्यात आले़, त्या वेळी ते बोलत होते़ माजी उपमहापौर दीपक मानकर यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते़ या वेळी माधवराव मानकर, माजी आमदार उल्हास पवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, मंगला कांबळे, दीपक मानकर, सैनिक मित्र परिवारचे अध्यक्ष अशोक मेहेंदळे, सरिता साळुंखे, हवालदार अशोक गावडे, शहीद लेफ्टनंट जनरल मनीष कदम यांचे वडील शशिकांत कदम, दत्ता सागरे, वसुधा मानकर, दीवा प्रतिष्ठानचे संस्थापक हर्षवर्धन मानकर, अध्यक्ष करण मानकर, साधना वर्तक आदी उपस्थित होते़ या वेळी वीरपिता शशिकांत कदम आणि अमोल चौघुले यांचा विशेष सत्कार करुन आर्थिक मदतीचा हात देण्यात आला़ साळुंखे म्हणाले, ‘‘प्रत्येक जवानाचा सन्मान करणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे़ सैनिकांच्या कुटुंबीयांना दिलेला मदतीचा हात सर्वांना प्रेरणादायी आहे़’’वीरमाता महालक्ष्मी गावडे म्हणाल्या, ‘‘मुलगा देशासाठी शहीद झाला असल,ा तरी त्यांची दोन्ही मुलेही सैन्यातच भरती करणार आहोत़’’ हर्षवर्धन मानकर यांनी प्रास्ताविक केले. आनंद सराफ यांनी आभार मानले़ उल्हास पवार म्हणाले, ‘‘एकीकडे आपण युद्धावेळी सैनिकांचे कौतुक करतो आणि दुसरीकडे मांडवगण फराटा गावात सैनिक चौघुले यांचे घर पाडले जाते, ही भूमिका योग्य नाही़’’दीपक मानकर म्हणाले, ‘‘सुभेदार खंडोजी मानकर यांचा वसा जपताना शहिदांना वंदन आणि मदतीचा हात देण्याची प्रेरणा मिळाली़ त्यातूनच यशोदा पुरस्कार देताना त्यासोबत सैनिकांच्या कुटुंबीयांनाही गौरवले जावे़’’