शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

साडेसहाशे महिला ४४ बसच्या मालकिणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : माजी सैनिकांच्या पत्नींनी बचत गट स्थापन करून पुरुषांचीच मक्तेदारी असलेल्या ट्रान्सपोर्ट व्यवसायात पाऊल टाकले. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : माजी सैनिकांच्या पत्नींनी बचत गट स्थापन करून पुरुषांचीच मक्तेदारी असलेल्या ट्रान्सपोर्ट व्यवसायात पाऊल टाकले. कोरोना आपत्तीतही त्या ठाम राहिल्या. कुटुंबात मागेमागे राहणाऱ्या महिलांसाठी नवा आदर्श तयार केला.

बचत गटाच्या माध्यमातून त्यांंनी ही कामगिरी केली. कोरोना अनलॉकनंतर सर्व बस व्यवस्थित सुरू झाल्यावर त्या आता अधिक मोठी झेप घेण्याच्या तयारीत आहेत.

किमान ११ व जास्तीत जास्त १५ महिलांचे ४४ बचत गट आहेत. त्यातील बहुतांश महिला माजी सैनिकांच्या पत्नी आहेत, काही विधवा आहेत. सातारा, पुणे व अहमदनगर व अन्य १० जिल्ह्यांमधील त्या रहिवासी आहेत. सातव्या बेळगाव मराठा लाइट इन्फट्रीमधील निवृत्त सैनिक सुरेश गोडसे यांनी या महिलांचे बचत गट तयार केले. त्यांची कंपनी स्थापन केली. प्रत्येकीने ८० हजार रुपये जमा केले. माजी सैनिक कल्याण मंडळाने बचत गटाला १० लाख रुपयांचे अनुदान दिले. बँक ऑफ महाराष्ट्रने साडेसहा लाख रुपये कर्ज दिले. असे प्रत्येक बससाठी करून या कंपनीने प्रति ४१ लाख रुपये किमतीच्या ४४ प्रवासी बस खरेदी केल्या.

पीएमपीएलने बयाणा रक्कम, निविदा ही प्रक्रिया मागे घेत प्रत्येक किलोमीटरला ५७ रूपये १७ पैसे या दराने सर्व बस भाडे तत्वावर स्वीकारल्या. बसचा फक्त वाहक व वेळापत्रक पीएमपीएलचे बाकी चालक, देखभाल दुरूस्तीची सर्व जबाबदारी कंपनीची. रोज किमान २०० किलोमीटरचे भाडे द्यायची हमीही दिली.

हे सगळे नियमित झाले व कोरोना टाळेबंदी लागली. पीएमपीएलची वाहतूक बंद झाली. नव्या गाड्या जागेवर पडून होत्या. बँकेने, पीएमपीलने परिस्थिती लक्षात घेत आर्थिक व्यवहार पुढे ढकलले. टाळेबंदी उठल्यावर पुन्हा सगळे नीट सुरू झाले आहे. पीएमपीएलने दरमहा बिल अदा करावे, अशी विनंती कंपनीने महापौर व पीएमपी अध्यक्षांना केली आहे. आता ही कंपनी सातारा परिसरात मॉल सुरू करण्याच्या तयारीत आहे.

चौकट

“बचत गटातील अनेक महिला आता कंपनीचे कामकाज पाहण्यासाठी तयार होत आहेत. माजी सैनिक कल्याण मंडळाचे राज्याचे उपसंचालक निवृत्त कर्नल राजेंद्र जाधव, तत्कालीन महापौर मुक्ता टिळक व पीएमपी अध्यक्ष नयना गुंडे यांचे मोठे सहकार्य मिळाले,” असे कंपनीचे प्रवर्तक सुरेश गोडसे यांनी सांगितले.