शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या कालव्याचे ‘फेसाळलेले’ पाणी विहिरींमध्ये!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2016 01:34 IST

पुण्याचे घाण पाणी प्रक्रिया न करताच बेबी कॅनॉलमध्ये येत असून, हे पाणी कॅनॉललगतच्या गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींमध्ये जात आहे

पुणे/ लोणी काळभोर : पुण्याचे घाण पाणी प्रक्रिया न करताच बेबी कॅनॉलमध्ये येत असून, हे पाणी कॅनॉललगतच्या गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींमध्ये जात आहे. परिणामी, येथील ग्रामस्थांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे महापालिकेने या ठिकाणी ताबडतोब आरो प्लँट उभारावेत, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव सायकर व दशरथ काळभोर यांनी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीत केली असून, तसे निवेदन खासदार आढळराव-पाटील यांनाही दिले आहे. पुणे महापालिकेने सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी जुना मुठा उजव्या कालव्यात सोडल्याने १९६५ नंतर म्हणजे तब्बल ५० वर्षांनंतर पाणी आल्यामुळे यापुढे कायमस्वरूपी बारमाही शेतीसिंचनासाठी पाणी मिळणार, यामुळे हवेलीतील बळीराजा आनंदला होता. परंतु या पाण्याने वेगळीच समस्या निर्माण झाली आहे. पाण्याला उग्र वास येत असून, पाणी जेथे आदळेल तेथे फेसाचा डोंगर तयार होत आहे. कालव्यालगतच्या विहिरी व बोअरवेलमधील पाण्याचा रंग काळसर-हिरवट होत असून, त्यालाही उग्र वास येत आहे.बुधवारी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैैठकीत जिल्हा परिषद सदस्य बाजीराव सायकर व दशरथ काळभोर यांनी कालव्यालगतच्या गावांना या पाण्याचा खूप त्रास होत आहे. लोक आजारी पडत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेने सदर गावांना पिण्याच्या पाण्यासाठी आरो प्लँट मंजूर करून द्यावा, अशी विनंती केली आहे. मुळा-मुठालगतच्या गावांना जसे शुद्धीकरण केंद्र बसविली आहेत, तशीच कालव्यालगतच्या गावांत बसवावे. तोपर्र्यंत येथे टँकरने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी केली आहे. कालव्यात पाणी सोडण्यासाठी मुंढवा जॅक्वेलमध्ये ६०० अश्वशक्तीच्या ८ मोटारी बसवण्यात आल्या असून, सध्या त्यांतील दोन चालू करण्यात आलेल्या आहेत. आगामी वर्षात किलोमीटर ८३ ते १११ मधील कामे पूर्ण करून पुणे महापालिकेने प्रक्रिया केलेले सर्वच्या सर्व म्हणजे ६.५0 टीएमसी पाणी सोडण्याचे नियोजित आहे. पाणी आले, मात्र सुमारे ६ ते ८ फूट उंचीचा फेस तयार होतो. जोराचा वारा आला की तो कालव्यालगत असलेल्या घरांत घुसतो. यामुळे येथील रहिवाशांना वेगळ्यांच समस्यांना सामोरे जावे लागत आहे. हा केमिकलयुक्त फेसाचा डोंगर पाहिला की खरेच महानगरपालिकेने सांडपाण्यावर प्रक्रिया केली आहे का ? असा प्रश्न उपस्थित होतो.आरोग्य केंद्रात आजअखेर कालव्यालगत राहणारा एकही रुग्ण आलेला नाही. आम्ही खबरदारी म्हणून ग्रामपंचायत लोणी काळभोर व कदमवाकवस्तीच्या नळ पाणीपुरवठा योजनेच्या सर्व विहिरीचे पाणी तपासणीसाठी पाठवले आहे. त्याचा अहवाल पुढील आठवड्यात येणे अपेक्षित आहे. त्यामध्ये मानवी आरोग्यास घातक घटक आढळून आले, तर त्याबाबत आमचे वरिष्ठ व संबंधित ग्रामपंचायतींना तत्काळ कळवून नागरिकांचे आरोग्य अबाधित राहावे म्हणून आवश्यक ती सर्व काळजी घेण्यात येईल.- डॉ. डी. जे. जाधव, आरोग्य अधिकारी, लोणी काळभोर