शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आॅनलाईनमुळे कार्यालये झाली ‘आॅफलाईन’

By admin | Updated: April 2, 2017 02:51 IST

आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस असल्याने आर्थिक व्यवहाराच्या दृष्टीने महत्त्वाची असणारी शहरातील विविध कार्यालये दरवर्षीप्रमाणे गजबजलेली पाहायला मिळतील

पिंपरी : आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस असल्याने आर्थिक व्यवहाराच्या दृष्टीने महत्त्वाची असणारी शहरातील विविध कार्यालये दरवर्षीप्रमाणे गजबजलेली पाहायला मिळतील अशी आशा होती. मात्र, आॅनलाईन भरणा पद्धतीमुळे आयकर विभाग, दुय्यम निबंधक, वीजबिल, महापालिका करसंकलन आदी कार्यालयांमध्ये शुकशुकाट पहायला मिळाला. पिंपरी-चिंचवड शहराला उद्योगनगरी म्हटले जाते. या शहरात अनेक लहान-मोठे उद्योग असल्याने शहरातील आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे नागरिकांचा आयकरही मोठ्या प्रमाणात जमा होतो. दरवर्षी या आयकरसंबंधी कागदपत्रांची पूर्तता व तत्सम कामांसाठी आकुर्डी येथील आयकर विभागाच्या कार्यालयात ३१ मार्चला गर्दी पहायला मिळत असते. यंदा मात्र या कार्यालयात शुकशुकाट पहायला मिळाला. शासनाने सध्या नागरिकांच्या सोईसाठी आणि प्रशासनामध्ये पारदर्शकता येण्यासाठी आॅनलाईन अर्जपद्धती आणि कर भरणापद्धती सुरू केली आहे. याबाबत संबंधित विभागाकडून वारंवार जागृती केली जात होती. याचाच परिणाम म्हणून आयकर भरण्यासाठी नागरिकांकडू आॅनलाईन प्रणालीचा वापर केला जाऊ लागला आहे. त्यामुळे आयकर विभागाच्या कार्यालयात नागरिकांची तुरळक ये-जा पाहायला मिळाली. या संगणकप्रणालीचा वापर केला जाऊ लागल्याने कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा आणि नागरिकांचा वेळ आणि त्रासही वाचला आहे. महावितरणकडूनही वर्षाच्या शेवटी थकीत बिले जमा ग्राहकांकडून जमा व्हावीत, यासाठी बिलात सूटही दिली जाते. त्यामुळे आर्थिक वर्षाच्या शेवटी वीजबील भरणाकेंद्राबाहेरही गर्दी पहायला मिळते. मात्र यावर्षी असे चित्र क्वचित पहायला मिळाले. महावितरणने आॅनलाईन बील भरण्यासाठी मोबाईल अ‍ॅप तयार केले आहे. ग्राहकांकडूनही त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. त्यामुळे रांगेतील गर्दी कमी झाल्याचे पहायला मिळत आहे. अशीच परिस्थिती निगडी प्राधिकरण येथील दुय्यम निबंधक कार्यालयात पहायला मिळाली. या कार्यालयातदेखील नेहमीप्रमाणेच नागरिकांची ये-जा पहायला मिळाली. मिळकत कर भरण्यासाठी महानगरपालिकेकडूनही ३१ मार्च ही शेवटची मुदत देण्यात आली होती. महानगरपालिकेच्या विविध क्षेत्रिय कार्यालयांचर तसेच करसंकलन केंद्रांवर नागरिकांची गर्दी पाहायला मिळाली. महापालिकेचा मिळकत कर भरण्यासाठी आॅनलाईन प्रणालीची सोय करण्यात आली आहे. अनेक नागरिकांनी प्रत्यक्ष केंद्रावर जाऊन कर भरणे पसंत केले. शेवटच्या दिवशी विविध कार्यालयांवर दरवर्षी गर्दी होत असते. या गर्दीत अडकायला नको म्हणून अनेकजणांनी दोन-तीन दिवस अगोदरच करसंबंधी कामे उरकून घेतली आहेत. त्यामुळेही विविध कार्यालयातील गर्दी कमी होण्यास मदत झाली आहे. (प्रतिनिधी)