शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

पदाधिकारी बदल; राष्ट्रवादीची कसोटी

By admin | Updated: February 4, 2016 01:21 IST

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व ३ सभापती गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे यांच्याकडे आपल्या पदाचे राजीनामे देणार आहेत.

पुणे : जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व ३ सभापती गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे यांच्याकडे आपल्या पदाचे राजीनामे देणार आहेत. बांधकाम सभापती मंगलदास बांदल यांनी ‘पक्षाने मी पक्षात आहे का ते अगोदर जाहीर करावे, नंतरच मी राजीनाम्याचा विचार करीन,’ असे ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले आहे. मात्र, हा बदल राष्ट्रवादी काँगे्रससाठी मोठी कसोटी ठरू शकते.पदाधिकाऱ्यांना राजीनामे देण्याचे आदेश मंगळवारी पक्षश्रेष्ठींनी दिले होते. त्यानुसार कामठे यांनी बैैठक घेऊन वरिष्ठांच्या सूचना पदाधिऱ्यांना दिल्या होत्या. त्यानुसार बुधवारी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद, उपाध्यक्ष शुक्राचार्य वांजळे, महिला व बाल कल्याण सभापती वंदना धुमाळ, कृषी व पशुसंवर्धन सभापती सारिका इंगळे, समाजकल्याण सभापती आतिष परदेशी यांनी जिल्हा परिषदेत बैैठक घेऊन राजीनाम्याबाबत चर्चा केली. या वेळी बांधकाम सभापती मंगलदास बांदल मात्र उपस्थित नव्हते. ते वगळता सर्वांनी आपापले राजीनामे देण्याची तयारी दर्शवली असून, ते उद्या जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे यांच्याकडे राजीनामे देणार आहेत. जिल्हा परिषदेतील अध्यक्षांसह ६ पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ अडीच वर्षांचा आहे. मात्र, त्यांच्या निवडीच्या वेळी पक्षाचे नेते अजित पवार यांनी ही निवड सव्वा वर्षासाठी असल्याचे सांगितले होते. (प्रतिनिधी)1जिल्हा परिषदेत सध्या राष्ट्रवादी काँगे्रसचे ४१ सदस्य; तर कॉग्रेसचे ११, शिवसेना १३, भाजप ३, नागरी हित ३, लोकहित आघाडी, मनसे, अपक्ष आणि आघाडी प्रत्येकी एक, असे एकूण ७५ सदस्यांचे पक्षीय बलाबद आहे. यामध्ये गेल्या एक-दोन वर्षांत जिल्ह्यात अनेक राजकीय बदल आले आहेत. त्यात खेडचे आमदार सुरेश गोरे यांच्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर शिवसनेचा उमेदवार निवडून आला आहे. खेड तालुक्यातीलच राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद बुट्टे पाटील भाजपमध्ये गेल्याने त्यांच्या विचाराच्या एक सदस्य कमी झाला आहे. राष्ट्रवादीला बाहेरून पांठिबा दिलेले नागरी हित, अपक्ष या तीन सदस्यांचा पाठिंबा मिळण्याची शक्यता कमी आहे. यात भर म्हणून राष्ट्रवादीतून निलंबित केलेले व सध्या बांधकाम समितीवर असलेले मंगलदास बादल यांनी राजीनामा देणार नसल्याचे स्पष्ट सांगितले आहे. 2राष्ट्रवादी काँग्रेसला बहुमतासाठी ३८ सदस्यांची आवश्यकता आहे. यामध्ये वरील राजकीय बदल लक्षात घेता, राष्ट्रवादीकडे सध्या स्वत:चे असे ३९ च सदस्य आहेत. यानंतरदेखील पदाधिकारी बदल करण्याचा निर्णय घेतल्यास काँग्रेसला सोबत घेण्याचा विचार होऊ शकतो. परंतु या वेळी काँगे्रसकडून उपाध्यक्षपद देण्याचा अग्रह धरला जाऊ शकतो. आगामी जिल्हा परिषद निवडणुका विचार करता राष्ट्रवादी काँगे्रसला सध्या तरी पदाधिकारी बदल खुप मोठी कसोटी ठरू शकते.