शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
2
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
3
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
4
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
5
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाल 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
6
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला
7
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
8
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
9
अन्न पुन्हा गरम करणं आरोग्यासाठी ठरतंय घातक; 'या' ५ गोष्टी टाळाल तरच ठणठणीत राहाल
10
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
11
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश
12
"मॅडम येत आहेत, त्यांना..."; पोलीस असल्याचं सांगून दुकानात घुसले अन् २ लाखांचे दागिने चोरले
13
ISI कडून मिळाले आदेश, बेताब खोऱ्यात लपवली शस्त्रे; NIA च्या अहवालात धक्कादायक खुलासा
14
संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”
15
काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी
16
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
17
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?
18
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
19
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
20
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला 'हे' उपाय केले असता घरात येईल सुख समृद्धी!

विलिनीकरणाचे वेध : नऱ्हे भाग २

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:10 IST

दीपक मुनोत लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : नऱ्हे गावाचा महापलिकेत समावेश होण्यापूर्वी गावात मलनिस्सारण तसेच घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, स्मशानभूमी ...

दीपक मुनोत

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : नऱ्हे गावाचा महापलिकेत समावेश होण्यापूर्वी गावात मलनिस्सारण तसेच घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, स्मशानभूमी आणि पीएमपी टर्मिनलसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. नऱ्हेमधील ʻअभिनवʼ संकुल परिसर हा पायाभूत सुविधांपासून वंचित आहे. रस्ते आणि ड्रेनेज आमच्याकडे कधी होणार, याची नागरिक वाट पाहत आहेत.

येथील नामांकित शैक्षणिक संस्थांच्या परिसरात अतिक्रमण वाढत असल्याने रहादारीस अडचण निर्माण होत आहे.

अभिनव परिसर हा गावातील पायाभूत सुविधांच्या बाबतीत सर्वात दुर्लक्षित राहिला आहे. रस्ते, वीज, पाणी, ड्रेनेज आणि सांडपाणी या बाबतींत अजूनही फारशी कामे झालेली नाहीत. याच परिसरातील ओढे आणि नाल्यांमध्ये मोठ्या वेगाने अतिक्रमण वाढत असून, आता नैसर्गिक जलस्त्रोतांचे संरक्षण करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.

गावठाण परिसरात ड्रेनेजचे ८०% काम झाले असून याबाबत अभिनव परिसर पूर्णतः दुर्लक्षित राहिला आहे. काही ठिकाणी ड्रेनेजची कामे पूर्ण झाली नसल्याने सांडपाणी उघड्यावरच सोडले जात आहे. वीजखांबांवर सीसीटीव्हीची व्यवस्था असल्याने सुरक्षेची चिंता नागरिकांना नाही? मात्र रस्त्यांवर रात्री दिवाबत्तीची सोय कधीपर्यंत पूर्ण होईल याची शाश्वती गावकऱ्यांना नाही.

गावातील महत्त्वाच्या रस्त्यांवर दुतर्फा अतिक्रमण झालेले आहे. ओढे आणि नाल्यांवर तर मोठे अतिक्रमण झालेले असून तेथेही बेकायदा बांधकामांना वेग आला आहे.

स्मशानभूमीसाठी जागा अपुरी पडत आहे.

पुणे-बंगळुरू महामार्गावरील उड्डाणपुलाच्या किनाऱ्यावर कचरा साचलेला त्यापेक्षा अधिक कचरा आणि घाण सांडपाणी हे पुलाशेजारील नाल्यात वाहत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे.

गावात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा महापालिकेच्या जलवाहिनीतून होतो. पण त्यासाठीची वितरण व्यवस्था ग्रामपंचायतीकडे नाही. जलशुद्धीकरण प्रकल्पाला जागा नसल्याने अशुद्ध पाणीपुरवठा होत आहे. पाण्याची टाकी गावात असूनही नागरिकांना दिवसाआड पाणी मिळते.

गावाला मल्लनिस्सारण प्रकल्प, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, स्मशानभूमी आणि पीएमपी टर्मिनलसाठी जागा नसल्याने ग्रामपंचायतीची मोठी पंचाईत झाली आहे. महापालिकेत आमचा समावेश होणार असेल तर आमच्या गावाला या प्रकल्पांसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी गावकऱ्यांची मागणी आहे.

*कोट*

मुख्य रस्त्यावर अवजड वाहनांची नेहमी वर्दळ असते. त्यातून वाहतूक कोंडी निर्माण होते. गावात विरंगुळा केंद्र व तरुणांना खेळण्यासाठी मैदान नाही. विलिनीकरणानंतर महापालिकेकडून या गोष्टींची पूर्तता होईल, अशी अपेक्षा आहे.

-सर्वेश मेहता, व्यावसायिक

-----

गावाला १४ व्या वित्त आयोगाकडून मोठा निधी मिळणार आहे. मात्र, विलिनीकरणामुळे नुकसान होईल. याआधी विलीन झालेल्या अकरा गावांचा विकास महापालिकेला का करता आला नाही?

- अशोक खराडे, ग्रामस्थ