शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
मुंबईतील प्रतिष्ठित कॉलेजमध्ये विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप
4
इराणसाठी इस्लामिक देश बनले काळ, अमेरिकेने रचला चक्रव्यूह; ४० हजार जवान अलर्टवर
5
IND vs ENG : आम्ही बुमराहला घाबरत नाही! तो सर्वोत्तम गोलंदाज असला तरी... मॅच आधी काय म्हणाला बेन स्टोक्स?
6
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
7
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...
8
'देशात लवकरच इंग्रजीत बोलणाऱ्यांना लाज वाटायला लागेल'; अमित शाह यांचे विधान, काय म्हणाले?
9
इराणचे सर्वेसर्वा खामेनेई मुळचे भारतातील...; पणजोबा इराणला गेले, वडिलांनी क्रांती घडविली अन्...
10
अमेरिकेच्या एन्ट्रीची शक्यता! इराण-इस्रायल युद्धाने जगाची चिंता वाढवली, पेट्रोल-डिझेल महागणार?
11
सोन्याची झळाळी झाली कमी; चांदी एका झटक्यात ₹२०६९ नं स्वस्त, पाहा काय आहेत नवे दर
12
इस्रायलविरोधात एकही मुस्लिम देश इराणच्या बाजूने नाही; आता खमेनी सरकारपुढे कोणता मार्ग?
13
ज्येष्ठ योगिनी एकादशी: ‘असे’ करा व्रतपूजन, समस्यांतून व्हाल मुक्त; अपार यश-प्रगती लाभेल!
14
४० जणांच्या जमावाकडून घरावर हल्ला, दगडविटांचा केला वर्षाव, महिला, लहान मुले कुणालाच सोडलं नाही  
15
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
16
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
17
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
18
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
19
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
20
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?

विलिनीकरणाचे वेध : नऱ्हे भाग २

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:10 IST

दीपक मुनोत लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : नऱ्हे गावाचा महापलिकेत समावेश होण्यापूर्वी गावात मलनिस्सारण तसेच घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, स्मशानभूमी ...

दीपक मुनोत

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : नऱ्हे गावाचा महापलिकेत समावेश होण्यापूर्वी गावात मलनिस्सारण तसेच घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, स्मशानभूमी आणि पीएमपी टर्मिनलसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. नऱ्हेमधील ʻअभिनवʼ संकुल परिसर हा पायाभूत सुविधांपासून वंचित आहे. रस्ते आणि ड्रेनेज आमच्याकडे कधी होणार, याची नागरिक वाट पाहत आहेत.

येथील नामांकित शैक्षणिक संस्थांच्या परिसरात अतिक्रमण वाढत असल्याने रहादारीस अडचण निर्माण होत आहे.

अभिनव परिसर हा गावातील पायाभूत सुविधांच्या बाबतीत सर्वात दुर्लक्षित राहिला आहे. रस्ते, वीज, पाणी, ड्रेनेज आणि सांडपाणी या बाबतींत अजूनही फारशी कामे झालेली नाहीत. याच परिसरातील ओढे आणि नाल्यांमध्ये मोठ्या वेगाने अतिक्रमण वाढत असून, आता नैसर्गिक जलस्त्रोतांचे संरक्षण करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.

गावठाण परिसरात ड्रेनेजचे ८०% काम झाले असून याबाबत अभिनव परिसर पूर्णतः दुर्लक्षित राहिला आहे. काही ठिकाणी ड्रेनेजची कामे पूर्ण झाली नसल्याने सांडपाणी उघड्यावरच सोडले जात आहे. वीजखांबांवर सीसीटीव्हीची व्यवस्था असल्याने सुरक्षेची चिंता नागरिकांना नाही? मात्र रस्त्यांवर रात्री दिवाबत्तीची सोय कधीपर्यंत पूर्ण होईल याची शाश्वती गावकऱ्यांना नाही.

गावातील महत्त्वाच्या रस्त्यांवर दुतर्फा अतिक्रमण झालेले आहे. ओढे आणि नाल्यांवर तर मोठे अतिक्रमण झालेले असून तेथेही बेकायदा बांधकामांना वेग आला आहे.

स्मशानभूमीसाठी जागा अपुरी पडत आहे.

पुणे-बंगळुरू महामार्गावरील उड्डाणपुलाच्या किनाऱ्यावर कचरा साचलेला त्यापेक्षा अधिक कचरा आणि घाण सांडपाणी हे पुलाशेजारील नाल्यात वाहत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे.

गावात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा महापालिकेच्या जलवाहिनीतून होतो. पण त्यासाठीची वितरण व्यवस्था ग्रामपंचायतीकडे नाही. जलशुद्धीकरण प्रकल्पाला जागा नसल्याने अशुद्ध पाणीपुरवठा होत आहे. पाण्याची टाकी गावात असूनही नागरिकांना दिवसाआड पाणी मिळते.

गावाला मल्लनिस्सारण प्रकल्प, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, स्मशानभूमी आणि पीएमपी टर्मिनलसाठी जागा नसल्याने ग्रामपंचायतीची मोठी पंचाईत झाली आहे. महापालिकेत आमचा समावेश होणार असेल तर आमच्या गावाला या प्रकल्पांसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी गावकऱ्यांची मागणी आहे.

*कोट*

मुख्य रस्त्यावर अवजड वाहनांची नेहमी वर्दळ असते. त्यातून वाहतूक कोंडी निर्माण होते. गावात विरंगुळा केंद्र व तरुणांना खेळण्यासाठी मैदान नाही. विलिनीकरणानंतर महापालिकेकडून या गोष्टींची पूर्तता होईल, अशी अपेक्षा आहे.

-सर्वेश मेहता, व्यावसायिक

-----

गावाला १४ व्या वित्त आयोगाकडून मोठा निधी मिळणार आहे. मात्र, विलिनीकरणामुळे नुकसान होईल. याआधी विलीन झालेल्या अकरा गावांचा विकास महापालिकेला का करता आला नाही?

- अशोक खराडे, ग्रामस्थ