शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

विलिनीकरणाचे वेध : नऱ्हे भाग २

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:10 IST

दीपक मुनोत लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : नऱ्हे गावाचा महापलिकेत समावेश होण्यापूर्वी गावात मलनिस्सारण तसेच घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, स्मशानभूमी ...

दीपक मुनोत

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : नऱ्हे गावाचा महापलिकेत समावेश होण्यापूर्वी गावात मलनिस्सारण तसेच घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, स्मशानभूमी आणि पीएमपी टर्मिनलसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. नऱ्हेमधील ʻअभिनवʼ संकुल परिसर हा पायाभूत सुविधांपासून वंचित आहे. रस्ते आणि ड्रेनेज आमच्याकडे कधी होणार, याची नागरिक वाट पाहत आहेत.

येथील नामांकित शैक्षणिक संस्थांच्या परिसरात अतिक्रमण वाढत असल्याने रहादारीस अडचण निर्माण होत आहे.

अभिनव परिसर हा गावातील पायाभूत सुविधांच्या बाबतीत सर्वात दुर्लक्षित राहिला आहे. रस्ते, वीज, पाणी, ड्रेनेज आणि सांडपाणी या बाबतींत अजूनही फारशी कामे झालेली नाहीत. याच परिसरातील ओढे आणि नाल्यांमध्ये मोठ्या वेगाने अतिक्रमण वाढत असून, आता नैसर्गिक जलस्त्रोतांचे संरक्षण करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.

गावठाण परिसरात ड्रेनेजचे ८०% काम झाले असून याबाबत अभिनव परिसर पूर्णतः दुर्लक्षित राहिला आहे. काही ठिकाणी ड्रेनेजची कामे पूर्ण झाली नसल्याने सांडपाणी उघड्यावरच सोडले जात आहे. वीजखांबांवर सीसीटीव्हीची व्यवस्था असल्याने सुरक्षेची चिंता नागरिकांना नाही? मात्र रस्त्यांवर रात्री दिवाबत्तीची सोय कधीपर्यंत पूर्ण होईल याची शाश्वती गावकऱ्यांना नाही.

गावातील महत्त्वाच्या रस्त्यांवर दुतर्फा अतिक्रमण झालेले आहे. ओढे आणि नाल्यांवर तर मोठे अतिक्रमण झालेले असून तेथेही बेकायदा बांधकामांना वेग आला आहे.

स्मशानभूमीसाठी जागा अपुरी पडत आहे.

पुणे-बंगळुरू महामार्गावरील उड्डाणपुलाच्या किनाऱ्यावर कचरा साचलेला त्यापेक्षा अधिक कचरा आणि घाण सांडपाणी हे पुलाशेजारील नाल्यात वाहत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे.

गावात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा महापालिकेच्या जलवाहिनीतून होतो. पण त्यासाठीची वितरण व्यवस्था ग्रामपंचायतीकडे नाही. जलशुद्धीकरण प्रकल्पाला जागा नसल्याने अशुद्ध पाणीपुरवठा होत आहे. पाण्याची टाकी गावात असूनही नागरिकांना दिवसाआड पाणी मिळते.

गावाला मल्लनिस्सारण प्रकल्प, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, स्मशानभूमी आणि पीएमपी टर्मिनलसाठी जागा नसल्याने ग्रामपंचायतीची मोठी पंचाईत झाली आहे. महापालिकेत आमचा समावेश होणार असेल तर आमच्या गावाला या प्रकल्पांसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी गावकऱ्यांची मागणी आहे.

*कोट*

मुख्य रस्त्यावर अवजड वाहनांची नेहमी वर्दळ असते. त्यातून वाहतूक कोंडी निर्माण होते. गावात विरंगुळा केंद्र व तरुणांना खेळण्यासाठी मैदान नाही. विलिनीकरणानंतर महापालिकेकडून या गोष्टींची पूर्तता होईल, अशी अपेक्षा आहे.

-सर्वेश मेहता, व्यावसायिक

-----

गावाला १४ व्या वित्त आयोगाकडून मोठा निधी मिळणार आहे. मात्र, विलिनीकरणामुळे नुकसान होईल. याआधी विलीन झालेल्या अकरा गावांचा विकास महापालिकेला का करता आला नाही?

- अशोक खराडे, ग्रामस्थ