शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

गुलाबी थंडी पिकांसाठी ठरतेय पोषक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 22:51 IST

खेड व शिरूरचा पश्चिम भाग : रब्बीच्या पिकांना मिळणार दिलासा

शेलपिंपळगाव : आकाशातील ढगाळ वातावरण नाहीसे होऊ लागल्याने हवामानातील दमटपणा दूर होऊन पहाटे-पहाटे बोचऱ्या थंडीची चाहूल लागू लागली आहे. परिणामी रब्बी हंगामातील बहुतांशी सर्वच पिकांच्या वाढीसाठी ही थंडी लाभदायी ठरत आहे. दमट हवामानाचा रब्बीच्या पिकांवर विपरीत परिणाम होऊन रोगराई गतिशील बनू लागली होती. त्यामुळे रोगराईवर नियंत्रण ठेवण्यासाठी पिकांना रासायनिक औषधांचा डोस द्यावा लागत होता. मात्र मागील दोन-तीन दिवसांपासून थंडीचे आगमन होऊ लागल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळत आहे.

खेडच्या पूर्व, तसेच शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात चासकमान व भामा-आसखेड धरणातील पाणी उपलब्ध होत आहे. परिणामी खरीप व रब्बीच्या मुख्य दोन हंगामात विविध पिकांचे उत्पादन घेण्याकडे शेतकºयांचा कल वाढत आहे. विशेषत: या हंगामात कांदा, हरभरा, ज्वारी, मका, फुलझाडे, पालेभाज्या व फळपिकांकडे शेतकरी अधिक आकर्षित झालेला असून या पिकांव्यातिरिक्त कोबी, फ्लॉवर, मका, पालेभाज्या, वेलवर्गीय व तोडीव पिकांची शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात लागवड केलेली आहे. मात्र बहुतांशी सर्वच पिकांना ढगाळ वातावरणामुळे उष्ण हवामानाचा मोठा फटका सहन करावा लागत होता.चालू वर्षी खरीप हंगामात दूषित हवामानाशी दोन हात करीत पिकांचे उत्पादन काढण्याची वेळ शेतकºयांवर ओढावली होती. खरिपानंतर रब्बी हंगामातील पीक उत्पादनावर शेतकºयांची मदार असून रब्बीची पिके फुलविण्यात ते अधिक मेहनत घेत आहेत. गेल्या महिन्यापासून हवामानात प्रचंड उष्णता जाणवत होती. त्यातच आॅक्टोबर हिटमुळे रब्बीच्या पिकांवर रोगराईचे सावट निर्माण झाले होते.४सध्या रात्रीच्या वेळी हवामानात गारवा निर्माण होऊन बोचरी थंडी जाणवू लागली आहे. थंडीचे आगमन शेतकºयांच्यादृष्टीने आंनदायी वार्ता आहे. थंडीमुळे पिकांवरील रोगराई कमी होऊन पिकांची वाढ चांगली होण्यास मदत होणार आहे. ज्वारी, हरभरा, तसेच प्रमुख कांदापिकासाठी थंडी अधिक फायदेशीर ठरणार आहे.पोषक थंडी...४खेड तसेच शिरूर तालुक्यात प्रामुख्याने कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. दोन धरणांमधील शिल्लक पाणी ही शेतकºयांसाठी जमेची बाजू ठरत आलेली आहे. मात्र मागील दिवसांत पिकांना हवामानाची साथ मिळत नसल्याने शेतकºयांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला आहे.४सध्या वातावरणात तयार होत असलेला थंडावा पिकाला पोषक ठरू लागला आहे. वाढत्या थंडीमुळे कांद्याची पात टवटवीत होण्यास, तसेच पिकाची जलद वाढ होण्यास अधिक मदत होणार आहे.तोडणीच्या पिकांनाही फायदा...रब्बी हंगामातील तोडीव पिकांना बाजारात चांगली मागणी असल्याने त्यांचे बाजारभावही तेजीत आहेत. परिणामी मिरची, गवार, भेंडी, वालवड, वांगी आदी पिकांचे उत्पादन शेतकरी घेत आहे. परंतु तोडीव पिकांना रोगराईचा फटका बसला आहे.थंडीच्या आगमनाने ही पिके पुन्हा एकदा टवटवीत होणार आहेत.शेतकºयांना काहीसा दिलासा मिळत आहे. 

टॅग्स :PuneपुणेCrop Insuranceपीक विमा