शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

शहरातील वृक्षसंख्येत पाच वर्षांत साडेआठ लाखांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:15 IST

पुणे : देशातील मोजक्या ‘ग्रीन सिटीज्’मध्ये मोडणाऱ्या पुणे शहराची ही ओळख पक्की करण्याच्या दृष्टीने महापालिकेने केलेल्या प्रयत्नांमुळे गेल्या पाच ...

पुणे : देशातील मोजक्या ‘ग्रीन सिटीज्’मध्ये मोडणाऱ्या पुणे शहराची ही ओळख पक्की करण्याच्या दृष्टीने महापालिकेने केलेल्या प्रयत्नांमुळे गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत शहरातील वृक्षसंख्येत जवळपास साडेआठ लाखांची वाढ झाली आहे. वृक्षराजी आणखी वाढविण्याच्या हेतूने शहरातील टेकड्यांवर हरितक्षेत्र विकसित करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून, त्यासाठी २६.२५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

२०२०-२१ च्या पर्यावरण सद्यःस्थिती अहवालानुसार, शहरातील वृक्षांची संख्या ४७ लाख १३ हजारांवर पोचली असून, लोकसंख्येच्या तुलनेत हे प्रमाण प्रतिव्यक्ती १.३९ वृक्ष एवढे आहे. २०१६-१७ च्या पर्यावरण अहवालानुसार, शहरातील वृक्षांची संख्या ३८ लाख ६० हजार इतकी होती, तरलोकसंख्येच्या तुलनेत वृक्षांचे हे प्रमाण प्रतिव्यक्ती १.२३ वृक्ष इतके होते. २०१६ नंतर शहरात मेट्रो, रस्तेसुधार, दुमजली उड्डाणपूल इत्यादी मोठ्या प्रकल्पांना सुरुवात झाली. मात्रहे प्रकल्प राबवीत असताना पर्यावरणाची हानी होऊ नये, यासाठी महापालिका आग्रही होती. यासह महापालिकेने केलेल्या विशेष प्रयत्नांमुळे गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत शहरातील वृक्षांच्या संख्येत २२.५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. 'जीपीएस' प्रणालीच्या साहाय्याने पुणे महापालिकेच्या कार्यक्षेत्रात वृक्षगणना करण्यात आली. त्यानुसार शहरात वृक्षांच्या एकूण ४२९ प्रजाती आढळून आल्या आहेत. महापालिकेत नुकत्याच समाविष्ट झालेल्या २३ गावांमधील वृक्षांची गणना यात झालेली नाही. कात्रज येथील 'राजीव गांधी प्राणिसंग्रहालय व वन्यप्राणी संशोधन केंद्रा'मुळे शहरात सर्वाधिक ११ लाख १३ हजार वृक्ष धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरात आहेत. तर दाट लोकवस्तीमुळे सर्वात कमी वृक्ष भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरात आहेत. या भागात केवळ १२ हजार वृक्ष आहेत. पर्वती, भांबुर्डा, वारजे आणि धानोरी येथील एकूण १,८२६ एकर वनक्षेत्र पुणे महापालिकेच्या हद्दीत आहे. वन विभागाच्या साहाय्याने पुणे महापालिकेतील 'संयुक्त वन व्यवस्थापन समिती'द्वारे येथील टेकड्यांवरील वृक्षांचे संवर्धन केले जाते. याशिवायपुणे जिल्ह्यातील पडीक जमिनींची माहितीही एकत्रित करण्यात आली आहे. त्यांपैकी किती जमिनींवर छोटी वनक्षेत्रे तयार करता येतील, याची यादी तयार करण्यात आली आहे. त्यासाठी पर्यावरणप्रेमी आणि स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली गेली आहे. पहिल्या टप्प्यात वारजे येथील ५०,तर महंमदवाडी येथील ४५ एकर जमिनीचे छोट्या वनक्षेत्रात रूपांतर केले जाणार आहे.

---------------------

कोटः पायाभूत सुविधांचा विकास करताना त्यात पहिला बळी पर्यावरणाचा जातो, हा आजवरचा अनुभव आहे. मात्रपुणे महापालिकेच्या इतिहासातील सर्वाधिक पायाभूत सुविधा प्रकल्प सुरू असताना हरितक्षेत्र मात्र कमी न होता वृद्धिंगत झाले आहे. शाश्वत विकासाच्यादृष्टीने नियोजन आणि कृती हे यामागचे मुख्य कारण आहे.

हेमंत रासने, अध्यक्ष, स्थायी समिती