शहरं
Join us  
Trending Stories
1
हृदयद्रावक! मुलाचा वाढदिवस करून घरी परतणाऱ्यांवर काळाचा घाला; अपघातात ७ नातेवाईकांचा मृत्यू
2
१०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्यांना २६% दर कपात; ७० टक्के लोकांना फायदा: फडणवीसांची घोषणा
3
NEET परीक्षेत अपयशी ठरली, मग UPSC ची तयारीही सोडली: आता ७२ लाखांचं पॅकेज घेणारी युवती आहे कोण?
4
मुंबईत ४० लाखांचा पगारही कमी? 'या' आयटी तरुणाची कहाणी ऐकून तुम्हालाही बसेल धक्का!
5
८ दिवस रस्त्यावर आंदोलन, सरकार दखल घेईना; बिऱ्हाड आंदोलक मनसे प्रमुख राज ठाकरेंना भेटणार
6
धर्मांतरानंतर गायब झाल्या हिंदू मुली, छांगुर बाबाच्या आणखी एका चेल्याची पोलखोल; मेरठशीही थेट कनेक्शन!
7
मुंबईत लँडिंग आधी पायलटने 'PAN PAN PAN' मेसेज पाठवला; इंडिगोच्या विमानात नेमके काय घडले?
8
विशीतल्या हिरोसोबत रोमान्स करणार करीना कपूर, आगामी सिनेमात साकारणार भूताची भूमिका
9
Stock Market Today: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात; निफ्टी २५,२०० च्या वर, SBI, Hindalco, Eicher Motors मध्ये खरेदी
10
जीजू अन् मेहुणीचा सुरू होता बेडरूम रोमान्स, इतक्यात पती आला; पुढे जे घडलं त्यानं अख्खं गाव सुन्न झालं!
11
ज्येष्ठांसाठी जॅकपॉट आहे Post Officeची ही स्कीम; फक्त एकदा गुंतवा पैसे, दर महिन्याला ₹२०,५०० चं इन्कम फिक्स
12
Bihar Election: मोफत वीज देणार, ऑगस्टपासून योजना लागू; नितीश कुमारांनी केली घोषणा, किती यूनिट वीज देणार मोफत?
13
त्रिभाषा सूत्र १०० टक्के आम्ही महाराष्ट्रात लागू करणारच; CM देवेंद्र फडणवीसांची ठाम भूमिका
14
"मी तुझ्यावर प्रेम करतो, लग्न करशील?", जिनिलियाला चाहत्याचा मेसेज, अभिनेत्री म्हणाली- "मी विचार केला असता पण..."
15
राज्यातील आजी-माजी मंत्री, बडे अधिकारी हनी ट्रॅपमध्ये? कोण कोण अडकले...
16
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
17
फडणवीसांशी बोलले...! पुढे दोन पावलांवर ठाकरे-शिंदे आमने-सामने, बाजूला बसणे सोडा बघणेही टाळले
18
Viral Video : चोरी करायला जिममध्ये गेला, मिळाली अशी शिक्षा की आयुष्यभर लक्षात राहील!
19
Video: "जर मी मेले तर..." प्रसिद्ध अभिनेत्याचा ४ बायकांसोबत संसार; तिसरीला छळलं? Ex वाईफचा गंभीर आरोप
20
एक इंजिन फेल झाले, इंडिगोचे विमान मुंबईच्या दिशेने वळवले; दिल्ली-गोवा फ्लाईटचे आपत्कालीन लँडिंग

निवडणूक स्थगित झालेल्या संस्थांची संख्या ६५ हजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: कोरोनामुळे राज्य सरकारने स्थगिती दिलेल्या राज्यातील सहकारी संस्थांची संख्या आता ६५ हजार इतकी झाली आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे: कोरोनामुळे राज्य सरकारने स्थगिती दिलेल्या राज्यातील सहकारी संस्थांची संख्या आता ६५ हजार इतकी झाली आहे. इतक्या सर्व संस्थांच्या निवडणुका घ्याव्या लागणार असल्याने त्याचा राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणावर ताण येणार आहे.

सरकारने ५ वेळा कोरोनाच्या कारणावरून या निवडणुकांना स्थगिती दिली. यातील बहुसंख्य संस्था सहकारी गृहनिर्माण संस्था आहेत. त्यांचे सभासद २५० पेक्षा जास्त आहेत. प्रत्येक ५ वर्षांनी त्यांच्या संचालक मंडळाची निवडणूक होते. अध्यक्ष, उपाध्यक्ष व अन्य पदाधिकाऱ्यांची संचालक मंडळातून निवड होते. सहकारी संस्था निवडणूक कायदा त्यासाठी तयार केला आहे. त्याचे नियम पाळून संचालक मंडळाला कामकाज करावे लागते.

संचालक मंडळाची ५ वर्षांची मुदत संपली की निवडणूक प्राधिकरण नव्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करत असते. निवडणूक अधिकारी निश्चित करण्यापासून ते मतदार यादीपर्यंत व प्रत्यक्ष मतदान घेऊन निकाल जाहीर करेपर्यंतचे काम प्राधिकरणाला करावे लागतात.

आता ६५ हजार संस्थांची निवडणूक घ्यायची तर त्यासाठी प्राधिकरणाला स्वतंत्र नियोजन करावे लागणार आहे. सरकारी अधिकारी नियुक्ती, मतदार याद्या या सर्व प्रक्रियेचा ताण त्यांच्यावर येणार असून त्याचे नियोजन कसे करायचे या चिंतेत प्राधिकरण प्रशासन आहे. इतके सरकारी अधिकारी, कर्मचारी कसे उपस्थित करायचे असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.

याशिवाय प्रत्येक संस्थेतील अनेक सभासद संचालक मंडळाची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असतात. पॅनेल वगैरे करून, सभासदांमध्ये प्रचार करत ही निवडणूक लढवली जाते. निवडणूकीला वारंवार स्थगिती मिळत असल्याने या इच्छुक सभासदांमध्ये रोष निर्माण झाला आहे. त्यातून विद्यमान संचालक मंडळावर भ्रष्टाचारासारखे आरोपही केले जात आहेत. राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका होतात, तर मग सहकारी संस्थांच्या साध्या निवडणूकांना सरकार का सातत्याने स्थगिती देत आहे असा त्यांचा प्रश्न आहे.

------------

मुदत संपलेल्या संस्थांची संख्या वाढतच जाणार आहे, मात्र नियोजन करून या निवडणुका घेण्यात येतील. जानेवारीपासून निवडणूका होणार होत्या. त्यासाठी संस्थांचे चार वर्ग करून त्याप्रमाणे कार्यक्रमही जाहीर करण्यात आला होता. अधिकारी नियुक्त करण्यात आले होते, मात्र आता पुन्हा ३१ मार्चपर्यंत स्थागिती मिळाल्याने कार्यक्रम स्थगित ठेवला आहे.

- यशवंत गिरी- सचिव, राज्य सहकार निवडणूक प्राधिकरण