शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
2
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
3
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
4
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
5
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
6
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
7
IPL 2026 Retention Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
8
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
9
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
10
Viral Video : एका दिवसात किती कमाई करतो मोमो विक्रेता? आकडा ऐकून हैराण व्हाल!
11
वीज बिल न भरल्याने कनेक्शन तोडले; रागात तरुणाने अख्ख्या शहराची लाईट बंद केली, वीज कर्मचाऱ्यांना रात्रभर कामाला लावलं
12
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
13
IND vs SA 1st Test Day 2 Stumps : जड्डूसह कुलदीप-अक्षरचा जलवा! तिसरा दिवस ठरणार निकालाचा?
14
मासिक पाळी येण्यापूर्वी चिडचिड, रडू येतं, मूड जातो, त्याची ५ कारणं- शरीरातले बदल ओळखा पटकन
15
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
16
सोम प्रदोष २०२५: सोम प्रदोषाने आठवड्याची सुरुवात होणार; 'या' ८ राशींना शिवकृपेचे संकेत मिळणार
17
थरारक! विवाहित प्रेयसीची हत्या, मृतदेहाचे तुकडे केले; शीर अन् अवयव बसच्या चाकाखाली चिरडले, मग..
18
कोण आहे डॉ. मुजफ्फर? ज्याला पकडण्यासाठी सीबीआय घेतेय इंटरपोलची मदत! अफगाणिस्तानाशी आहे कनेक्शन
19
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
20
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात निर्यातक्षम शेतकऱ्यांची संख्या वाढवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेेटवर्क पुणे : राज्यातील निर्यातक्षम शेतकऱ्यांच्या संख्येत वाढ करण्यात येणार आहे. द्राक्ष, आंबा, केळी निर्यातीत राज्य देशात ...

लोकमत न्यूज नेेटवर्क

पुणे : राज्यातील निर्यातक्षम शेतकऱ्यांच्या संख्येत वाढ करण्यात येणार आहे. द्राक्ष, आंबा, केळी निर्यातीत राज्य देशात अव्वल असून आता भाजीपाल्यातही आघाडी घेण्याचे धोरण ठरवण्यात आले आहे.

कोविडकाळातही राज्यातून १३ हजार ८७७ कोटी रुपयांची निर्यात झाली. यात बहुतांश फळफळावळ आहे. त्यातही द्राक्षांच्या देशातील एकूण निर्यातीत राज्याचा वाटा ८० टक्के आहे. राज्यातील सुमारे ७० हजार शेतकरी निर्यात वृद्धीसाठी स्थापन केलेल्या संकेतस्थळाचा लाभ घेतात. ही संख्या किमान २ लाख व्हावी असा राज्याच्या निर्यात विभागाचा निर्धार आहे. फळांसह सर्व प्रकारचा भाजीपालाही निर्यात व्हावा यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना निर्यात कक्षाला देण्यात आल्या आहेत. यासाठीच्या संकेतस्थळाला शेतकरी जोडून घेण्याविषयी सांगण्यात आले आहे.

या संकेतस्थळावर शेतकऱ्यांना निर्यातीसाठीचे परदेशातील बाजारपेठेसह मालाचा दर्जा, गुणवत्ता कशी सांभाळावी अशी सर्व माहिती दिली जाते. त्याचबरोबर संकेतस्थळावरून शेतकरी आपापसात माहितीची देवाणघेवाण करू शकतात. यातून एकमेकांच्या यशस्वी-अयशस्वी उपक्रमांची माहिती होते, त्याप्रमाणे उपाय करता येतात.

केंद्र सरकारने निर्यात वृद्धीसाठी अपेडा (कृषी उद्योग प्रक्रिया निर्यात प्राधिकरण) ही संस्था स्थापन केली आहे. त्यांच्याकडून सर्व राज्यांना निर्यातीसाठी सर्व प्रकारचे उत्तेजन, माहिती, मार्गदर्शन केले जाते. त्याच धर्तीवर राज्याच्या कृषी विभागाने स्वतंत्र निर्यात कक्ष स्थापन केला आहे. आतापर्यंत त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यांसाठी ८ ते १० प्रकारची संकेतस्थळ ‘व्हेज नेट’अंतर्गत स्थापन केली आहेत. या निर्यात कक्षाच्या माध्यमातून राज्यात निर्यात वाढवण्याची मोहीम राबवली जात आहे.

चौकट

“मालाची गुणवत्ता उच्च दर्जाची असणे ही निर्यातीसाठीची सर्वांत महत्त्वाची अट आहे. राज्यातील तरुण शेतकरी मोठ्या संख्येने या कसोटीवर खरे उतरत आहेत. येत्या काही वर्षांत शेतमाल निर्यातीत महाराष्ट्राचा वाटा बराच मोठा असेल.”

-गोविंद हांडे, निर्यात सल्लागार, राज्य निर्यात कक्ष