शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
3
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
4
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
5
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
6
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
7
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
8
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
9
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
10
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
11
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
12
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
13
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
14
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
15
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
16
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
17
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
18
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
19
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
20
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी

कॅम्पात आता कारवाई

By admin | Updated: June 17, 2015 23:43 IST

शहराचे बाजारपेठेचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या पिंपरी कॅम्पातील वाहतूककोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस जटिल होत आहे. त्यामुळे तोडगा काढण्यासाठी

पिंपरी : शहराचे बाजारपेठेचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या पिंपरी कॅम्पातील वाहतूककोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस जटिल होत आहे. त्यामुळे तोडगा काढण्यासाठी कठोर कारवाईचे धोरण अवलंबावे लागणार आहे. येत्या २२ जूनपासून रस्त्यावर अडथळा ठरतील अशी अतिक्रमणे हटविण्याची कारवाई वाहतूक पोलीस आणि महापालिका यांच्या वतीने राबविण्याचा निर्णय बुधवारी महापालिकेत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. वेळोवळी वाहतूक नियोजनाबाबत बैठका होतात; परंतु ठोस तोडगा निघत नाही. वाहतूककोंडी जैसे थे हे चित्र बदलण्यासाठी बुधवारी विशेष बैठक घेण्यात आली. बैठकीस महापालिका आयुक्त राजीव जाधव, शहर अभियंता महावीर कांबळे, वाहतूक पोलीस शाखेचे उपायुक्त सारंग आवाड, सहायक आयुक्त महेंद्र रोकडे, निरीक्षक राजेंद्र देशमुख, तसेच खासदार श्रीरंग बारणे, आमदार गौतम चाबुकस्वार आणि डब्बू आसवानी, धनराज आसवानी, महेश वाधवानी हे व्यापारी प्रतिनिधी उपस्थित होते. महापालिका अधिकारी आणि वाहतूक शाखेचे पोलीस अधिकारी यांनी संयुक्तपणे या भागाचा पाहणी दौरा करावा, सम आणि विषम तारखेला ‘नो पार्किंग’ची ठिकाणे निश्चित करता येतील, त्या दृष्टीने अधिकाऱ्यांनी पाहणी करावी, असे या वेळी सर्वांनीच सुचविले. दुकानदार दुकानापुढील जागेत रस्त्यावर अतिक्रमण करतात. दुकानाच्या बाहेर अनेक वस्तू विक्रीसाठी ठेवल्या जातात. त्यामुळे रस्ता अरुंद होऊन नागरिकांना रस्त्याने ये-जा करणेही कठीण होते. त्यामुळे रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्याच्या कारवाईस प्राधान्य द्यावे लागणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. महापालिका अधिकाऱ्यांनी सूचना द्याव्यात. काही दुकानदारांनी रस्त्यापर्यंत, पदपथापर्यंत दुकाने वाढविली आहेत. त्यांना २२ जूनच्या आत अतिक्रमण काढून घेण्यास सांगावे. (प्रतिनिधी)शाळांना सूचना द्यावाहतूककोंडीत भर पडते ती स्कूल बसची. शैक्षणिक संस्थांच्या स्कूलबस रस्त्यावर उभ्या केल्या जातात. शैक्षणिक संस्थांना त्यांची वाहने शाळेच्या वाहनतळावर उभी करण्याची सूचना द्यावी. रस्त्यावरील हातगाड्यांवर कारवाई होत असताना, शैक्षणिक संस्थांच्या वाहनांची त्यांनी योग्य व्यवस्था केली, तर अपघातांचे प्रमाण नियंत्रणात येईल. शिवाय वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल.- श्रीरंग बारणे, खासदार मालवाहू वाहनांना रात्री मुभा द्यावीपिंपरी बाजारपेठेत मालवाहू वाहने दिवसभर फेऱ्या मारत असतात. त्यामुळे वाहतूककोंडीत अधिकची भर पडते. वाहतूककोंडी कमी करायची असेल, तर मालवाहू वाहनांना दिवसा बंदी घातली पाहिजे. त्यांना रात्री ९ नंतर मुभा द्यावी, जेणेकरून बाजारपेठेतील वाहतूककोंडीवर नियंत्रण आणणे शक्य होईल. कोंडीमुळे ग्राहकसुद्धा पिंपरी बाजारपेठेकडे पाठ फिरवू लागले आहेत. - गौतम चाबुकस्वार, आमदार