शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

कॅम्पात आता कारवाई

By admin | Updated: June 17, 2015 23:43 IST

शहराचे बाजारपेठेचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या पिंपरी कॅम्पातील वाहतूककोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस जटिल होत आहे. त्यामुळे तोडगा काढण्यासाठी

पिंपरी : शहराचे बाजारपेठेचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या पिंपरी कॅम्पातील वाहतूककोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस जटिल होत आहे. त्यामुळे तोडगा काढण्यासाठी कठोर कारवाईचे धोरण अवलंबावे लागणार आहे. येत्या २२ जूनपासून रस्त्यावर अडथळा ठरतील अशी अतिक्रमणे हटविण्याची कारवाई वाहतूक पोलीस आणि महापालिका यांच्या वतीने राबविण्याचा निर्णय बुधवारी महापालिकेत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. वेळोवळी वाहतूक नियोजनाबाबत बैठका होतात; परंतु ठोस तोडगा निघत नाही. वाहतूककोंडी जैसे थे हे चित्र बदलण्यासाठी बुधवारी विशेष बैठक घेण्यात आली. बैठकीस महापालिका आयुक्त राजीव जाधव, शहर अभियंता महावीर कांबळे, वाहतूक पोलीस शाखेचे उपायुक्त सारंग आवाड, सहायक आयुक्त महेंद्र रोकडे, निरीक्षक राजेंद्र देशमुख, तसेच खासदार श्रीरंग बारणे, आमदार गौतम चाबुकस्वार आणि डब्बू आसवानी, धनराज आसवानी, महेश वाधवानी हे व्यापारी प्रतिनिधी उपस्थित होते. महापालिका अधिकारी आणि वाहतूक शाखेचे पोलीस अधिकारी यांनी संयुक्तपणे या भागाचा पाहणी दौरा करावा, सम आणि विषम तारखेला ‘नो पार्किंग’ची ठिकाणे निश्चित करता येतील, त्या दृष्टीने अधिकाऱ्यांनी पाहणी करावी, असे या वेळी सर्वांनीच सुचविले. दुकानदार दुकानापुढील जागेत रस्त्यावर अतिक्रमण करतात. दुकानाच्या बाहेर अनेक वस्तू विक्रीसाठी ठेवल्या जातात. त्यामुळे रस्ता अरुंद होऊन नागरिकांना रस्त्याने ये-जा करणेही कठीण होते. त्यामुळे रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्याच्या कारवाईस प्राधान्य द्यावे लागणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. महापालिका अधिकाऱ्यांनी सूचना द्याव्यात. काही दुकानदारांनी रस्त्यापर्यंत, पदपथापर्यंत दुकाने वाढविली आहेत. त्यांना २२ जूनच्या आत अतिक्रमण काढून घेण्यास सांगावे. (प्रतिनिधी)शाळांना सूचना द्यावाहतूककोंडीत भर पडते ती स्कूल बसची. शैक्षणिक संस्थांच्या स्कूलबस रस्त्यावर उभ्या केल्या जातात. शैक्षणिक संस्थांना त्यांची वाहने शाळेच्या वाहनतळावर उभी करण्याची सूचना द्यावी. रस्त्यावरील हातगाड्यांवर कारवाई होत असताना, शैक्षणिक संस्थांच्या वाहनांची त्यांनी योग्य व्यवस्था केली, तर अपघातांचे प्रमाण नियंत्रणात येईल. शिवाय वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल.- श्रीरंग बारणे, खासदार मालवाहू वाहनांना रात्री मुभा द्यावीपिंपरी बाजारपेठेत मालवाहू वाहने दिवसभर फेऱ्या मारत असतात. त्यामुळे वाहतूककोंडीत अधिकची भर पडते. वाहतूककोंडी कमी करायची असेल, तर मालवाहू वाहनांना दिवसा बंदी घातली पाहिजे. त्यांना रात्री ९ नंतर मुभा द्यावी, जेणेकरून बाजारपेठेतील वाहतूककोंडीवर नियंत्रण आणणे शक्य होईल. कोंडीमुळे ग्राहकसुद्धा पिंपरी बाजारपेठेकडे पाठ फिरवू लागले आहेत. - गौतम चाबुकस्वार, आमदार