शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

कॅम्पात आता कारवाई

By admin | Updated: June 17, 2015 23:43 IST

शहराचे बाजारपेठेचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या पिंपरी कॅम्पातील वाहतूककोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस जटिल होत आहे. त्यामुळे तोडगा काढण्यासाठी

पिंपरी : शहराचे बाजारपेठेचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या पिंपरी कॅम्पातील वाहतूककोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस जटिल होत आहे. त्यामुळे तोडगा काढण्यासाठी कठोर कारवाईचे धोरण अवलंबावे लागणार आहे. येत्या २२ जूनपासून रस्त्यावर अडथळा ठरतील अशी अतिक्रमणे हटविण्याची कारवाई वाहतूक पोलीस आणि महापालिका यांच्या वतीने राबविण्याचा निर्णय बुधवारी महापालिकेत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. वेळोवळी वाहतूक नियोजनाबाबत बैठका होतात; परंतु ठोस तोडगा निघत नाही. वाहतूककोंडी जैसे थे हे चित्र बदलण्यासाठी बुधवारी विशेष बैठक घेण्यात आली. बैठकीस महापालिका आयुक्त राजीव जाधव, शहर अभियंता महावीर कांबळे, वाहतूक पोलीस शाखेचे उपायुक्त सारंग आवाड, सहायक आयुक्त महेंद्र रोकडे, निरीक्षक राजेंद्र देशमुख, तसेच खासदार श्रीरंग बारणे, आमदार गौतम चाबुकस्वार आणि डब्बू आसवानी, धनराज आसवानी, महेश वाधवानी हे व्यापारी प्रतिनिधी उपस्थित होते. महापालिका अधिकारी आणि वाहतूक शाखेचे पोलीस अधिकारी यांनी संयुक्तपणे या भागाचा पाहणी दौरा करावा, सम आणि विषम तारखेला ‘नो पार्किंग’ची ठिकाणे निश्चित करता येतील, त्या दृष्टीने अधिकाऱ्यांनी पाहणी करावी, असे या वेळी सर्वांनीच सुचविले. दुकानदार दुकानापुढील जागेत रस्त्यावर अतिक्रमण करतात. दुकानाच्या बाहेर अनेक वस्तू विक्रीसाठी ठेवल्या जातात. त्यामुळे रस्ता अरुंद होऊन नागरिकांना रस्त्याने ये-जा करणेही कठीण होते. त्यामुळे रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्याच्या कारवाईस प्राधान्य द्यावे लागणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. महापालिका अधिकाऱ्यांनी सूचना द्याव्यात. काही दुकानदारांनी रस्त्यापर्यंत, पदपथापर्यंत दुकाने वाढविली आहेत. त्यांना २२ जूनच्या आत अतिक्रमण काढून घेण्यास सांगावे. (प्रतिनिधी)शाळांना सूचना द्यावाहतूककोंडीत भर पडते ती स्कूल बसची. शैक्षणिक संस्थांच्या स्कूलबस रस्त्यावर उभ्या केल्या जातात. शैक्षणिक संस्थांना त्यांची वाहने शाळेच्या वाहनतळावर उभी करण्याची सूचना द्यावी. रस्त्यावरील हातगाड्यांवर कारवाई होत असताना, शैक्षणिक संस्थांच्या वाहनांची त्यांनी योग्य व्यवस्था केली, तर अपघातांचे प्रमाण नियंत्रणात येईल. शिवाय वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल.- श्रीरंग बारणे, खासदार मालवाहू वाहनांना रात्री मुभा द्यावीपिंपरी बाजारपेठेत मालवाहू वाहने दिवसभर फेऱ्या मारत असतात. त्यामुळे वाहतूककोंडीत अधिकची भर पडते. वाहतूककोंडी कमी करायची असेल, तर मालवाहू वाहनांना दिवसा बंदी घातली पाहिजे. त्यांना रात्री ९ नंतर मुभा द्यावी, जेणेकरून बाजारपेठेतील वाहतूककोंडीवर नियंत्रण आणणे शक्य होईल. कोंडीमुळे ग्राहकसुद्धा पिंपरी बाजारपेठेकडे पाठ फिरवू लागले आहेत. - गौतम चाबुकस्वार, आमदार