शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
4
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
5
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
6
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
7
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
8
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
9
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
10
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
11
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
12
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
13
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
14
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
15
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
16
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
17
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
18
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
19
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
20
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले

वैयक्तिक नव्हे; तर सांघिक कामगिरीवर लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 00:42 IST

पवन शहा : भारतीय संघाची प्रेरणा सदैव पाठीशी, साहचर्याची भावना गरजेची

कर्णधारपद म्हणून नव्याने संघाची धुरा वाहत असताना काही गोष्टींत नक्कीच बदल करावा लागेल. अर्थात यात फलंदाजीवर कुठलाही परिणाम होऊ देणार नाही. ती काळजी घेणार आहे. बऱ्याचदा एका भूमिकेतून दुसºया भूमिकेत गेल्यानंतर त्यातील महत्त्वपूर्ण बदलांना स्वीकारणे गरजेचे असते. त्याशिवाय प्राप्त परिस्थितीवर मात करणे अवघड असते. यापुढील काळात बांग्लादेशचा दौरा असल्याने तिथे जाऊन तेथील हवामानाशी जुळवून घेणे आवश्यक आहे. याशिवाय खेळपट्टीचा अभ्यास केल्याशिवाय पुढील रणनीती ठरवणे महागात पडते. यापूर्वी सहकाºयांसोबतच्या आठवणी सांगायच्या झाल्यास श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत सध्या आहे त्या संघासोबत खेळण्याची संधी मिळाली होती. आता पुन्हा त्याच खेळाडूंसोबत आशियाई करंडक स्पर्धेसाठी मैदानात उतरायचे आहे.

फरक इतकाच आता सांघिकपातळीवरील नेतृत्वात घ्यावा लागणारा सक्रिय सहभाग. शिस्त, वेळेचे व्यवस्थापन, सरावावर द्यावा लागणारा भर यांसारख्या अनेक गोष्टींचा काळजीपूर्वक अभ्यास करावा लागणार आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे एका सांघिक पातळीवर सर्वांना एकत्र आणावे लागणार आहे. सर्वांच्या कलेनुसार, एकमेकांना समजून सर्वांच्याच मतांचा आदर करून, त्यावर सामूहिकरीत्या विचार करून कृतिशील अंमलबजावणी करण्यावर भर देणार आहे. दोन ते तीन वर्षांपासून संघातील सर्वच खेळाडूंंना ओळखत असल्याने आमच्यात छान ट्यूनिंग तयार झाले आहे. एकमेकांच्या क्षमता, ताकदीच्या बाजू, कमकुवत क्षेत्र यांविषयी एकमेकांसोबत मोकळ्यापणाने चर्चा करण्याइतपत आमच्या मैत्रीमध्ये मोकळेपणा निर्माण झाल्याने याचा सकारात्मक परिणाम आमच्या सर्वांच्या कामगिरीवर होणार आहे. पर्यायाने संघाची ताकद वाढणार आहे. या सर्वांबाबत मला आपल्या वरिष्ठ संघाचा आदर्श घ्यावासा वाटतो. आता इंग्लंडमधील दौºयात त्यांनी ज्या पद्धतीने आपल्या कामगिरीमध्ये कमबॅक केले आहे ते दाद देण्यासारखे आहे. कठीण काळात असताना कशा पद्धतीने जोरदार पुनरागमन करायचे, हे आपल्या भारतीय संघाकडून शिकता येते. हे त्यांनी इंग्लंडच्या दौºयातून दाखवून दिले. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याचा आदर्श नेहमीच डोळ्यासमोर आहे. त्याच्या कर्णधारपदाबद्दल जगभरात त्याची वाहवा होते. संयम, चतुराई, निर्णयक्षमता आणि सहकाºयांना ज्या पद्धतीने तो पाठिंंबा देतो त्यातून अतिशय प्रतिकूल परिस्थितीत असलेला संघदेखील आत्मविश्वासाने यशाला गवसणी घालताना दिसतो. धोनीचा आदर्श नेहमीच प्रेरणादायी आहे. यापूर्वी संघात फलंदाज म्हणून एक वेगळी भूमिका वाट्याला होती. आता फलंदाज आणि कर्णधार अशा दुहेरी भूमिकेत सामोरे जावे लागणार आहे. संघाचा कर्णधार म्हणून मैदानात उभे राहताना आपल्या खेळाडूंना सातत्याने प्रोत्साहन देत राहणे, त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देणे महत्त्वाचे असते. खेळाडूंचा आत्मविश्वास वाढीस लावण्यासाठी कर्णधार म्हणून निर्णय घेणे आवश्यक असते. सर्वांकडून विजयी कामगिरी करून घेण्यावर यापुढील काळात भर असणार आहे. त्यासाठी सर्वांची परिश्रम घेण्याची तयारी आहे. एखाद्या खेळाडूला वेळीच संधी देऊन त्याच्याकडून उत्कृ ष्ट कामगिरी करून घेणे हे कर्णधाराचे काम आहे. संघात सर्वच जण चांगले मित्र आहेत. फरक इतकाच, की मित्रत्वाच्या नात्याबरोबर कर्णधार म्हणून शिरपेचात नवीन तुरा खोवला गेला आहे. खेळात हार जीत सुरू असतेच. मात्र याबरोबर मैदानावर प्रत्येकाने शंभर टक्के प्रयत्न करून आपल्यातील सर्वोत्कृष्ट द्यावे, यावर प्रामुख्याने भर असणार आहे.श्रीलंकेच्या दौºयावर असल्यापासून संघातील सर्वांसोबत आपुलकीचे आणि भावनिक नाते तयार झाले आहे. आता तर केवळ फलंदाज म्हणून नव्हे, तर कर्णधारपदी भूमिका साकारताना सामूहिक पातळीवर विचार करावा लागणार आहे. खेळपट्टीवर इतर अकरा खेळाडूंसमवेत आपले कौशल्य पणाला लागणार असून त्यातून यशाला गवसणी घालण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. संघातील सर्वच सहकाºयांसोबत योग्य समन्वय साधल्यास यश आपलेच आहे. आगामी आशियाई करंडक स्पर्धेसाठी कर्णधार म्हणून पिंपरीच्या पवन शहा याची निवड झाली आहे. त्यानिमित्ताने त्याच्याशी साधलेला संवाद...

 

टॅग्स :Puneपुणे