शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२९ पर्यंत मीच महाराष्ट्राचा CM, हेच कार्यक्षेत्र, दिल्ली अजून दूर”: देवेंद्र फडणवीस
2
मुंबईत महायुती, इतरत्र स्वतंत्र; मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट संकेत, विरोधकांवर जोरदार हल्लाबोल
3
निवडणूक आयोगाकडून आता देशभर SIRची तयारी; दिल्लीत दोन दिवसीय परिषद, अधिकाऱ्यांकडून आढावा
4
तेलावरून तापले राजकारण; ट्रम्प पुन्हा म्हणाले, भारत रशियन तेलाची खरेदी कमी करणार
5
मुंबईत महायुती एकत्र, काँग्रेसला सेना- मनसे नकोच; आयोगाच्या आदेशाआधीच नगरपालिकांसाठी तयारी
6
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर प्रतिबंध लादण्याचा प्रयत्न निंदनीय”: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
7
सरकारने केली शेतकरी, बेरोजगारांची फसवणूक: चेन्नीथला, काँग्रेसची राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा
8
रेल्वे अपघातात पती गमावला, तिने लढा दिला; २३ वर्षांनंतर ‘सुप्रीम’ निर्णयाने न्याय मिळाला
9
सुवर्णाची झळाळी, शिर्डी साईमंदिरात उत्साहात दिवाळी; २.५० कोटींच्या रत्नजडित दागिन्यांची आरास
10
चांदीत ८ दिवसांत २६ हजारांची घसरण; सोन्याच्या दरालाही मोठा फटका, १ दिवसात ११ हजारांनी उतरले
11
सत्या नाडेला यांना वार्षिक पगार ₹८४६ कोटी मिळणार; एआयमुळे दिली मायक्रोसॉफ्टला ओळख
12
AUS W vs ENG W : 'चारचौघी' स्वस्तात आटोपल्या; मग ऑस्ट्रेलियाच्या या दोघी इंग्लंडला पुरुन उरल्या!
13
बोगस नोंदणी विरोधात सत्ताधारी आमदाराची कोर्टात धाव; एकाच पत्त्यावर हजारो मतदार, काय आहे प्रकार?
14
पुतिन यांची 'खतरनाक हसीना' जागी झाली, जगातील गुप्तचर यंत्रणा सतर्क, काय आहे नवीन मिशन?
15
क्रॉस बॉर्डरवर भारताचा दबदबा वाढणार; ६ महिन्यात भारतीय सैन्यात सज्ज होणार '२० भैरव बटालियन'
16
उद्धव ठाकरे पुन्हा राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी; अचानक भेटीमागचं 'राज'कारण काय?
17
भाजपाची नाराजी नको, एकनाथ शिंदे करणार कारवाई; रवींद्र धंगेकरांची शिंदेसेनेतून हकालपट्टी होणार?
18
१६०० वर्षांपासून हजारो लाकडाच्या खांबांवर उभं आहे युरोपमधील हे सुंदर शहर, असं आहे त्यामागचं गुपित
19
अमेरिका, ब्रिटनमध्ये पडझड, उद्या भारतात परिणाम दिसणार? सोने-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात कोसळणार  
20
Video: शिवरायांच्या वेशभूषेत फोटो काढण्यास वसई किल्ल्यावर रोखले; परप्रांतीय सुरक्षा रक्षकाचा प्रताप

मानवी जीवनामध्ये नामस्मरणाला मोठे महत्त्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 00:57 IST

तुलसीजी भार्गवमहाराज : श्रीमद्भागवत कथा महोत्सव

दौंड : मानवी जीवनात नामस्मरणाला अत्यंत महत्त्व असून, नामस्मरणाने दुष्ट विचारांचा प्रभाव मनावर होत नाही. सदैैव भगवंताचे नामस्मरण केल्याने सर्व मनोवांच्छित इच्छा पूर्ण होऊ शकतात, असे मत श्रीमती तुलसीजी भार्गव महाराज यांनी व्यक्त केले.

दौंड येथे श्रीयोग वेदांत सेवा समितीच्या वतीने आयोजित श्रीमद्भागवत कथा महोत्सव आयोजित केला आहे. पहिल्याच दिवशी कथा महोत्सवाला मोठी गर्दी होती. आजच्या कथेत ‘श्री गणेशजी-श्री भगवान वेदव्यास दर्शन’ यांचा जिवंत देखावा दाखविण्यात आला. भगवंताच्या नामस्मरणात खूप मोठी ताकद असून नामस्मरणाने एकाग्रता वाढते, चित्त शुद्ध होते, वाचासिद्धी प्राप्त होऊ शकते. परिणामी मन कायम आनंदी राहत असून, मानवाला सद्बुद्धी प्राप्त होऊन मनुष्य आपले जीवन सफल करू शकतो, असे मत या वेळी तुलसीजी भार्गव यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शहरातून सवाद्य मंगलकलश यात्रा काढण्यात आली. त्यानंतर तुलसीजी भार्गव महाराज यांच्या हस्ते श्रीमद्भागवतचे पूजन करण्यात आले. येथील वर्षा मंगल गार्डन कार्यालयात दररोज दुपारी ४ ते सायंकाळी ७ या दरम्यान हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

जन्म-मरणापासून मुक्त व्हावेतुलसीजी भार्गव महाराज समधुर अमृतमय वाणीतून भक्तांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, मानवाने सत्प्रवृतीचे नेहमीच आचरण करावे. आयुष्यात ज्ञानोपासना करुन जीवनाचे सार्थक करावे आणि जन्म-मरणापासून मुक्त व्हावे, असा मौल्यवान संदेश या वेळी त्यांनी दिला.

टॅग्स :Puneपुणे