शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

मानवी जीवनामध्ये नामस्मरणाला मोठे महत्त्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 00:57 IST

तुलसीजी भार्गवमहाराज : श्रीमद्भागवत कथा महोत्सव

दौंड : मानवी जीवनात नामस्मरणाला अत्यंत महत्त्व असून, नामस्मरणाने दुष्ट विचारांचा प्रभाव मनावर होत नाही. सदैैव भगवंताचे नामस्मरण केल्याने सर्व मनोवांच्छित इच्छा पूर्ण होऊ शकतात, असे मत श्रीमती तुलसीजी भार्गव महाराज यांनी व्यक्त केले.

दौंड येथे श्रीयोग वेदांत सेवा समितीच्या वतीने आयोजित श्रीमद्भागवत कथा महोत्सव आयोजित केला आहे. पहिल्याच दिवशी कथा महोत्सवाला मोठी गर्दी होती. आजच्या कथेत ‘श्री गणेशजी-श्री भगवान वेदव्यास दर्शन’ यांचा जिवंत देखावा दाखविण्यात आला. भगवंताच्या नामस्मरणात खूप मोठी ताकद असून नामस्मरणाने एकाग्रता वाढते, चित्त शुद्ध होते, वाचासिद्धी प्राप्त होऊ शकते. परिणामी मन कायम आनंदी राहत असून, मानवाला सद्बुद्धी प्राप्त होऊन मनुष्य आपले जीवन सफल करू शकतो, असे मत या वेळी तुलसीजी भार्गव यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शहरातून सवाद्य मंगलकलश यात्रा काढण्यात आली. त्यानंतर तुलसीजी भार्गव महाराज यांच्या हस्ते श्रीमद्भागवतचे पूजन करण्यात आले. येथील वर्षा मंगल गार्डन कार्यालयात दररोज दुपारी ४ ते सायंकाळी ७ या दरम्यान हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

जन्म-मरणापासून मुक्त व्हावेतुलसीजी भार्गव महाराज समधुर अमृतमय वाणीतून भक्तांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, मानवाने सत्प्रवृतीचे नेहमीच आचरण करावे. आयुष्यात ज्ञानोपासना करुन जीवनाचे सार्थक करावे आणि जन्म-मरणापासून मुक्त व्हावे, असा मौल्यवान संदेश या वेळी त्यांनी दिला.

टॅग्स :Puneपुणे