शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्याविरुद्ध तिहेरी कट, डोनाल्ड ट्रम्प का संतापले?; ‘सिक्रेट सर्व्हिस’ला चौकशीचे आदेश
2
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
3
भारताच्या ड्रग्ज तस्करांवरील कारवाईमुळे दाऊद इब्राहिमला धक्का; आता दक्षिण आफ्रिका आणि मेक्सिकोमधील नवीन ठिकाणांचा घेतोय शोध
4
भरला संसार मोडून प्रियकरासोबत पळाली ३ मुलांची आई, जाताना पैसे अन् दागिनेही लुटून गेली; पतीची पोलिसांत धाव
5
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
6
VIRAL : पत्नीच्या चारित्र्यावर संशय आला, पती अचानक बेडरूममध्ये शिरला अन् बेड उघडताच समोर आलं भयाण वास्तव!
7
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
8
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
9
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
10
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
11
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
12
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
13
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
14
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
15
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
16
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
17
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
18
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
19
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
20
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

शहरात पाणीकपात नाही!

By admin | Updated: January 9, 2015 00:40 IST

शहराला येत्या ७ महिन्यांसाठी ९ टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्याचा निर्णय कालवा समितीच्या बैठकीत गुरुवारी घेण्यात आला.

पुणे : शहराला येत्या ७ महिन्यांसाठी ९ टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्याचा निर्णय कालवा समितीच्या बैठकीत गुरुवारी घेण्यात आला. १५ जुलैपर्यंत शहराच्या तसेच शेतीच्याही पाण्यात कोणतीही कपात केली जाणार नसल्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी स्पष्ट केले. मुंढवा येथील प्रकल्पामध्ये सांडपाण्यावर प्रक्रिया केलेले सुमारे दोन टीएमसी पाणी शेतीसाठी उपलब्ध होणार असल्याने ही पाणीकपात टळली आहे.पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली खडकवासला कालवा समितीची बैठक झाली. या बैठकीला जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, महापौर दत्तात्रय धनकवडे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अनिल शिरोळे यांच्यासह आमदार उपस्थित होते. बैठकीनंतर गिरीश बापट यांनी झालेल्या निर्णयांची माहिती दिली.बापट म्हणाले, ‘‘धरणक्षेत्रामध्ये कमी पाऊस झाल्याने ७ ते ८ टक्के धरणसाठा कमी आहे. उपलब्ध पाणीसाठ्यातून शेती, शहराला पिण्याचे पाणी, औद्योगिक वापर, २३ ग्रामपंचायती यांना पाणीपुरवठा केला जातो. कमी पाणीसाठ्यामुळे पाणीवाटपाचे नियोजन करताना मोठी कसरत करावी लागत आहे. मुंढवा येथील सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पाचे काम ३१ मार्चपर्यंत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर जुलैपर्यंत २ टीएमसी पाण्यावर प्रक्रिया होऊन ते शेतीसाठी उपलब्ध होणार आहे. ८ हजार हेक्टर शेतीसाठी हे पाणी मिळेल. कपात केली नसली तरी पुणेकरांनी पाणी काटकसरीने वापरावे.’’ (प्रतिनिधी)सध्या उपलब्ध २०.६४ टीएमसी पाणीसाठ्यापैकी ८.९५ टीएमसी पाणी शहरासाठी दिले जाणार असून, उर्वरित पाणी शेतीसाठी दिले जाईल. शहराला रोज १२०० एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे. त्याप्रमाणे १५ जुलैपर्यंत सुरळीत पुरवठा केला जाणार आहे. सांडपाण्यावर शुद्धीकरण करणे, पर्यावरण विभागाने बंधनकारक केले आहे. त्यानुसार मुंढवा येथील सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प तातडीने मार्गी लागण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. बेबी कॅनॉलमधील ३० मोऱ्या दुरुस्तीसाठी १५ कोटी रुपयांचा निधी तातडीने मंजूर करण्यात आला आहे. सध्या हे काम निविदा स्तरावर आहे, ते लवकर पूर्ण होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. - गिरीश बापट, पालकमंत्री४गेल्या तीन वर्षांत शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात आॅगस्टच्या पहिल्या अथवा दुसऱ्या आठवड्यात चांगाला पाऊस झाल्यानंतरच पाणीसाठ्यात वाढ होत आहे. त्यामुळे पालिकेकडून यंदा १५ आॅगस्टपर्यंत पाणीसाठा राखीव ठेवावा, अशी मागणी पाटबंधारे विभागाकडे केली होती. ४तसेच तत्कालीन उपमुख्यमंत्र्यांनी या नियोजनाबाबत गांभीर्याने विचार सुरू असल्याचे अनेकदा सांगितले होते. त्यामुळे आजच्या बैठकीत पाणीसाठा १५ आॅगस्टपर्यंत राखीव ठेवण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र, ३१ जुलै पर्यंत आहे तेवढेच पाणी पालिकेस देण्याची भूमिका पाटबंधारे विभागाने घेतल्याने महापालिकेकडूनही या मागणीस झुकते माप देण्यात आले आहे. मात्र, मागील दोन वर्षाप्रमाणेच यंदाही पावसाने ओढ दिल्यास पाण्याचे संकट कायम राहण्याचे चित्र आहे.मुळशी धरणातून पाणी मिळण्यासाठी प्रयत्न४मुळशी धरणाची क्षमता २२ टीएमसी इतकी आहे. या पाण्यावर वीजनिर्मिती केली जाते. त्यातून मुंबई व रेल्वेला वीजपुरवठा केला जातो. मुळशी धरणातील संपूर्ण पाणी वीजनिर्मितीसाठी तहहयात देण्याचा करार झाला आहे. ४दुष्काळाच्या परिस्थितीत एकदाच खास बाब म्हणून पुणे शहराला पाणी देण्यात आले. या धरणातून भविष्यात पुणे शहरासाठी पाणी मिळावे याकरिता टाटा कंपनीसोबत पत्रव्यवहार करणार असल्याची माहिती गिरीश बापट यांनी दिली.