शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

शहरात पाणीकपात नाही!

By admin | Updated: January 9, 2015 00:40 IST

शहराला येत्या ७ महिन्यांसाठी ९ टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्याचा निर्णय कालवा समितीच्या बैठकीत गुरुवारी घेण्यात आला.

पुणे : शहराला येत्या ७ महिन्यांसाठी ९ टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्याचा निर्णय कालवा समितीच्या बैठकीत गुरुवारी घेण्यात आला. १५ जुलैपर्यंत शहराच्या तसेच शेतीच्याही पाण्यात कोणतीही कपात केली जाणार नसल्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी स्पष्ट केले. मुंढवा येथील प्रकल्पामध्ये सांडपाण्यावर प्रक्रिया केलेले सुमारे दोन टीएमसी पाणी शेतीसाठी उपलब्ध होणार असल्याने ही पाणीकपात टळली आहे.पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली खडकवासला कालवा समितीची बैठक झाली. या बैठकीला जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, महापौर दत्तात्रय धनकवडे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अनिल शिरोळे यांच्यासह आमदार उपस्थित होते. बैठकीनंतर गिरीश बापट यांनी झालेल्या निर्णयांची माहिती दिली.बापट म्हणाले, ‘‘धरणक्षेत्रामध्ये कमी पाऊस झाल्याने ७ ते ८ टक्के धरणसाठा कमी आहे. उपलब्ध पाणीसाठ्यातून शेती, शहराला पिण्याचे पाणी, औद्योगिक वापर, २३ ग्रामपंचायती यांना पाणीपुरवठा केला जातो. कमी पाणीसाठ्यामुळे पाणीवाटपाचे नियोजन करताना मोठी कसरत करावी लागत आहे. मुंढवा येथील सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पाचे काम ३१ मार्चपर्यंत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर जुलैपर्यंत २ टीएमसी पाण्यावर प्रक्रिया होऊन ते शेतीसाठी उपलब्ध होणार आहे. ८ हजार हेक्टर शेतीसाठी हे पाणी मिळेल. कपात केली नसली तरी पुणेकरांनी पाणी काटकसरीने वापरावे.’’ (प्रतिनिधी)सध्या उपलब्ध २०.६४ टीएमसी पाणीसाठ्यापैकी ८.९५ टीएमसी पाणी शहरासाठी दिले जाणार असून, उर्वरित पाणी शेतीसाठी दिले जाईल. शहराला रोज १२०० एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे. त्याप्रमाणे १५ जुलैपर्यंत सुरळीत पुरवठा केला जाणार आहे. सांडपाण्यावर शुद्धीकरण करणे, पर्यावरण विभागाने बंधनकारक केले आहे. त्यानुसार मुंढवा येथील सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प तातडीने मार्गी लागण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. बेबी कॅनॉलमधील ३० मोऱ्या दुरुस्तीसाठी १५ कोटी रुपयांचा निधी तातडीने मंजूर करण्यात आला आहे. सध्या हे काम निविदा स्तरावर आहे, ते लवकर पूर्ण होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. - गिरीश बापट, पालकमंत्री४गेल्या तीन वर्षांत शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात आॅगस्टच्या पहिल्या अथवा दुसऱ्या आठवड्यात चांगाला पाऊस झाल्यानंतरच पाणीसाठ्यात वाढ होत आहे. त्यामुळे पालिकेकडून यंदा १५ आॅगस्टपर्यंत पाणीसाठा राखीव ठेवावा, अशी मागणी पाटबंधारे विभागाकडे केली होती. ४तसेच तत्कालीन उपमुख्यमंत्र्यांनी या नियोजनाबाबत गांभीर्याने विचार सुरू असल्याचे अनेकदा सांगितले होते. त्यामुळे आजच्या बैठकीत पाणीसाठा १५ आॅगस्टपर्यंत राखीव ठेवण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र, ३१ जुलै पर्यंत आहे तेवढेच पाणी पालिकेस देण्याची भूमिका पाटबंधारे विभागाने घेतल्याने महापालिकेकडूनही या मागणीस झुकते माप देण्यात आले आहे. मात्र, मागील दोन वर्षाप्रमाणेच यंदाही पावसाने ओढ दिल्यास पाण्याचे संकट कायम राहण्याचे चित्र आहे.मुळशी धरणातून पाणी मिळण्यासाठी प्रयत्न४मुळशी धरणाची क्षमता २२ टीएमसी इतकी आहे. या पाण्यावर वीजनिर्मिती केली जाते. त्यातून मुंबई व रेल्वेला वीजपुरवठा केला जातो. मुळशी धरणातील संपूर्ण पाणी वीजनिर्मितीसाठी तहहयात देण्याचा करार झाला आहे. ४दुष्काळाच्या परिस्थितीत एकदाच खास बाब म्हणून पुणे शहराला पाणी देण्यात आले. या धरणातून भविष्यात पुणे शहरासाठी पाणी मिळावे याकरिता टाटा कंपनीसोबत पत्रव्यवहार करणार असल्याची माहिती गिरीश बापट यांनी दिली.