शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

पाणी नाही तर प्रभाग समितीची बैठकही नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:19 IST

पुणे : जोपर्यंत नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा होत नाही, तोपर्यंत प्रभाग समितीची बैठक होऊ देणार नाही, असा पवित्रा सर्वपक्षीय नगरसेवकांनी ...

पुणे : जोपर्यंत नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा होत नाही, तोपर्यंत प्रभाग समितीची बैठक होऊ देणार नाही, असा पवित्रा सर्वपक्षीय नगरसेवकांनी घेतला. पाण्याच्या समस्येवरून नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरत शुक्रवारी आयोजित केलेली बैठक बंद पाडली.

एकीकडे धरणात गतवर्षीपेक्षा दोन टीएमसी जादा पाणीसाठा असून पाणीकपात केली जाणार नसल्याचे प्रशासन म्हणते आहे. तर, दुसरीकडे शहरातील मध्यवर्ती भागातच पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या प्रभाग समितीची बैठक शुक्रवारी आयोजित केलेली होती. या बैठकीला प्रभाग समिती अध्यक्षांसह सर्व बारा नगरसेवक व अधिकारी उपस्थित होते. बैठक सुरू होताच नगरसेवकांनी प्रभाग क्रमांक १७,१८ आणि १९ मधील पाणी समस्येवर उपाय करण्याची मागणी केली.

शहराला पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या खडलवासला धरणासाखळीत मुबलक पाणी असतानाही शहरातील नागरिकांना पाणी का मिळत नाही, असा सवाल केला. नागरिकांकडून वारंवार तक्रारी येत असून उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाण्याची मागणी वाढल्याचे नगरसेवकांनी सांगितले. प्रशासनाकडून कोणत्याही ठोस आश्वासनाशिवाय ही चर्चा सुरू राहिल्याने नगरसेवक संतापले. त्यांनी ही बैठक रद्द करीत जोपर्यंत या भागाला पाणी मिळणार नाही, तोपर्यंत प्रभाग समितीची बैठक होऊ देणार नसल्याचा पवित्रा घेतला. बैठकीला उपस्थित असलेल्या उपायुक्त अविनाश सकपाळ यांनी पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांना फोन लावून याविषयी उपाययोजना करण्याबाबत नगरसेवक आक्रमक असल्याचे सांगितले. पावसकर यांनी येत्या दोन दिवसांत पाण्याचा प्रश्न मार्ग लावत पाणीपुरवठा सुरळीत करू, असे आश्वासन दिले. जर दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही तर, सर्वपक्षीय १२ नगरसेवक पालिका आयुक्तांना घेराव घालणार असल्याचे नगरसेवक विशाल धनवडे यांनी सांगितले.