शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
3
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
4
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
5
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
6
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
7
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
8
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
9
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
10
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
11
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
12
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
13
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
14
जळगाव जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी सागर चित्रे! उपाध्यक्षपदी ॲड. स्मिता झाल्टे; विजयी उमेदवारांचा जल्लोष
15
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
16
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
17
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
18
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
19
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
20
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 

स्मार्ट सिटीला नाही पोलीस ठाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 02:31 IST

कायदा सुव्यवस्था ऐरणीवर; फिर्यादींना यावे लागते चतु:शृंगीला, अंतर सहा किलोमीटर

- प्रकाश कोकरे पुणे : शासनाने बाणेर-बालेवाडी, औंध, पाषाण परिसराला स्मार्ट सिटी असे घोषित केले असले, तरी या भागात अत्यावश्यक पोलीस ठाणे नाही. जर नागरिकांना फिर्याद द्यायची असेल, तर चतु:शृंगी पोलीस ठाण्याला पाच ते सात किलोमीटर अंतर पार करून जावे लागते. त्यामुळे स्मार्ट सिटीची कायदा सुव्यवस्था ऐरणीवर आली आहे. जवळ पोलीस ठाणे नसल्यामुळे गुन्हा घडल्याच्या ठिकाणी पोलिसांना पोहोचण्यासाठी देखील वेळ लागतो.या भागातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी स्वतंत्र पोलीस ठाण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे. स्मार्ट सिटीचा परिसर हा २५ ते ३० किलोमीटरचा आहे. या मोठ्या भागासाठी स्वतंत्र पोलीस ठाण्याची अत्यंत गरज आहे. स्मार्ट सिटी लोकसंख्येत वेगाने वाढ होत आहे.सध्या या भागाची लोकसंख्या अंदाजे दीड लाखाच्या घरात आहे. चतु:शृंगी पोलीस चौकीवर अतिरिक्त भार पडत असल्यामुळे त्याच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत आहे.या भागात अनेक आयटी कंपन्या; तसेच बऱ्याच बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत. त्यामुळे या भागात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होत आहे. त्यामुळे या गावठाणांचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलून गेला आहे. जमीन खरेदी-विक्रीमधून मोठ्या प्रमाणात या भागात पैसा आल्यामुळे अनेक गुन्हेगारी कृत्ये होत आहेत. पोलिसांची ज्या प्रकारची भीती असावी त्याप्रकारची दिसून येत नाही, त्यामुळे गुन्हेगारीत वाढ झाली आहे. त्यामुळे पोलिसांचा वचक राहिला नाही. या परिसरासाठी चतु:शृंगी पोलीस स्टेशनच्या माध्यमातून काम पाहिले जाते.पोलीस ठाण्याची इमारत प्रतीक्षेतपरंतु, बाणेर-बालेवाडीसाठी कमिन्स कंपनीच्या माध्यमातून कंपनीच्या आवारात पोलीस चौकी बांधून देण्यात आली आहे. कंपनीने ही वास्तू पोलीस प्रशासनाला सुपूर्द करण्यात आली आहे; परंतु दोन वर्षांपासून ही चौकी चालू करण्यात आली नसून, कोणत्याही प्रकारच्या गुन्ह्यांची नोंदसुद्धा या ठिकाणी करून घेतली जात नाही. त्यामुळे या परिसरामध्ये जबरी चोरी, फसवणूक, सोनसाखळीचोरी, वाहनचोरी, दंगा, घरफोडी अशा प्रकारच्या गुन्ह्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. परिसरात संध्याकाळी पोलिसांमार्फत घातल्या जाणाºया गस्तीचे प्रमाण कमी आहे.स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार चतु:शृंगी पोलीस स्टेशनमध्ये चौकशी केली असता, मनुष्यबळ कमी आहे किंवा शासनाची परवानगी मिळाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे बाणेर-बालेवाडीच्या नागरिकांकडे प्रशासनाने जाणूनबुजून दुर्लक्ष असल्याचे पाहायला मिळत आहे. चतु:शृंगी पोलीस स्टेशनपासून बाणेर-बालेवाडी हे अंतर जास्त आहे, तसेच अपुरे मनुष्यबळ असल्यामुळे पोलिसांना त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे गुन्हेगार पसार होत आहेत. स्वतंत्र पोलीस ठाणे पुरवण्याची मागणी जोर धरू लागली आहे.गस्ती पथकांची संख्या तीन आहे. १ बीट मार्शल आहे. परिसरात मदतकेंद्र सुरू केले आहे. स्वतंत्र पोलीस ठाण्यासाठी शासनाची मंजुरी मिळालेली नाही. आॅनलाइन गुन्ह्यांच्या नोंदी जरी होत असल्या, तरी प्रत्यक्षात तक्रारदाराला चतु:शृंगी पोलीस ठाण्याला यावे लागते.- दयानंद ढोमे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चतु:शृंगी

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणेPoliceपोलिस