शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
2
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
3
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
4
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
5
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
6
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
7
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
8
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
9
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
10
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
11
युती होताच दाखवलं शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरच पहिलं भाषण; भाजपनं राज ठाकरेंना डिवचलं
12
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
13
नोकरी गेली तरी भीती नाही, तुमच्या कर्जाचा हप्ता आता विमा कंपनी भरेल; नक्की काय आहे प्रकरण?
14
उल्हासनगरात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपात प्रवेश
15
"आमचा हिंदुत्ववाद केवळ पूजापद्धतीवर आधारित नाही तर..."; CM फडणवीसांनी ठाकरे बंधूंना सुनावलं
16
मेष वार्षिक राशिभविष्य २०२६: 'आत्मिक शांती' आणि प्रगतीचे वर्ष; आव्हाने पेलून गाठता येणार यशाचे शिखर!
17
प्राजक्ताच्या स्वप्नातील राजकुमार आहे तरी कसा? लग्नासाठी तिची एकच अट; सिंगल राहण्यामागचं खरं कारण समोर
18
जालना महापालिकेत भाजपानं युती न केल्यास सर्व पर्याय खुले; शिंदेसेनेचे आमदार खोतकरांचा इशारा
19
Vijay Hazare Trophy : हिटमॅनचा हिट शो जारी! मुंबईच्या संघाकडून खेळण्यासाठी मैदानात उतरला अन्...
20
३१ डिसेंबरला उघडणार या वर्षाचा अखेरचा आयपीओ; प्राईज बँड ₹९०, पाहा GMP सह अनेक डिटेल्स
Daily Top 2Weekly Top 5

पुढील दोन महिने अंक काढणार नाही...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शासनाने काही नियतकालिकांच्या अनुदानात कपात केली आहे. शासकीय नियमावलीनुसार नियतकालिकांची कार्यालये सुरू ठेवण्यास परवानगी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : शासनाने काही नियतकालिकांच्या अनुदानात कपात केली आहे. शासकीय नियमावलीनुसार नियतकालिकांची कार्यालये सुरू ठेवण्यास परवानगी असली, तरी ती सुरू ठेवून उपयोग नाही. कारण नियतकालिके काढण्यासंबंधी महत्त्वपूर्ण असलेला मजकूर, जाहिराती, छपाई या सर्वांची साखळी काहीशी तुटली आहे. नियतकालिके टपाल कार्यालयात स्वीकारली जात असली तरी ती पुढे सरकत नाहीत, अशा असंख्य अडचणींचा सामना नियतकालिकांना करावा लागत आहे. मग अंक काढून ते वाया का घालवायचे? अशी भूमिका घेत पुढील दोन महिने तरी अंक न काढण्याचा निर्णय जवळपास शंभरहून अधिक नियतकालिकांनी घेतला आहे.

नियतकालिकांचा वाचकवर्ग कमी असल्याने विक्रीतून फारसे उत्पन्न मिळत नाही. त्यातील काही नियतकालिकांना शासकीय अनुदान मिळते. त्यात मराठी विज्ञान परिषद पत्रिका, मिळून साऱ्याजणी, पुरुष उवाच, पालकनीती परिवार, पुरोगामी सत्यशोधक, बालविकास, ज्ञानमोचक (त्रैमासिक), वयम, छात्र प्रबोधन आदी विविध नियतकालिकांचा समावेश आहे. या साधारण ३५ ते ४० नियतकालिकांना शासनाकडून ३५ ते ५० हजार रुपयांचे अनुदान मिळते. खर्च अधिक, वर्गणीदार कमी आणि इतर अनेक आर्थिक समस्यांवर मात करीत ही नियतकालिके तग धरून आहेत. मात्र, गतवर्षीची टाळेबंदी आणि आता लागू झालेले कडक निर्बंध यामुळे नियतकालिकांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे अखिल भारतीय नियतकालिक संघटनेकडून सांगण्यात आले आहे.

-------------------

ज्यांना कुणी जाहिराती फारशा देत नाही; पण समाजासाठी जी नियतकालिके आवश्यक असतात. अशा काही निवडक नियतकालिकांनाच शासनाकडून अनुदान मिळते. अन्य नियतकालिके, पाक्षिके, मासिके, साप्ताहिके आहेत, त्यांना कधीच अनुदान मिळत नाही. अशा स्थितीतील नियतकालिकांना गेल्या वर्षी टाळेबंदीचा मोठा फटका बसला. आता पुन्हा हीच स्थिती आहे. सध्या टपाल खात्याकडून अंक स्वीकारले जात असले तरी ते पुढे सरकत नाही. त्यामुळे शंभरहून अधिक नियतकालिकांनी टपाल खात्याला पत्र दिले आहे की, पुढील दोन महिने आम्ही अंक काढू शकत नाही.

सध्या टपाल खात्याला मर्यादा आहेत. ५० टक्के मनुष्यबळात काम करावे लागत आहे. त्यामुळे त्यांचाही दोष नाही. कारण नियतकालिकांना त्यांच्या दृष्टीने शेवटचे प्राधान्य आहे. माझे स्वत:चे चार अंक निघतात. पण तीन अंकाबद्दल बोलू शकतो की ५० टक्के अंक पण वर्गणीदारांपर्यंत पोहोचलेले नाहीत. जे साधारण १ ते ७ एप्रिल दरम्यान टाकले आहेत. आम्ही दिल्लीच्या टपाल खात्याला ३१ जुलैपर्यंत अंक न टाकणे, अंक टाकला तरी तारखा बदलणे याची परवानगी मागितली आहे. त्यासंबंधी केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर, रवीशंकर प्रसाद यांना मेल पाठविला आहे.

- भालचंद्र कुलकर्णी, सरचिटणीस, अखिल भारतीय नियतकालिक संघटना

---------------------------

नियतकालिकांची नोंदणी

भारत- दीड लाख

मराठी नियतकालिके- २० हजार

(प्रत्यक्ष सुरू असलेली आणि दैनिके सोडून साधारणपणे २ हजार)

प्रत्यक्ष सुरू असलेली नियतकालिके ४०० ते ४५० दरम्यान

--------------------------------------------------------------

राज्य साहित्य व संस्कृती मंडळाकडून आम्हाला वर्षाला ४० हजार रुपये अनुदान मिळते. शासनाने अनुदानात कपात केली असली तरी आम्ही स्वखर्चामधून अंक काढत आहोत. त्यात कुठेही खंड पडू दिलेला नाही. सध्या नियतकालिकांची कार्यालये आणि छपाईला परवानगी आहे. त्यामुळे अंक काढण्यास अडचण येत नाही.

-गीताली वि. म, संपादिका, मिळून साऱ्याजणी

---------------------- -