शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

पुण्यात गेल्या पाच वर्षांत उष्माघाताची नाही एकही नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राज्यात पश्चिम महाराष्ट्र आणि त्यातही पुणे जिल्ह्यात उन्हाळ्यात देखील सरासरी तापमान उष्माघाताचे बळी जातील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : राज्यात पश्चिम महाराष्ट्र आणि त्यातही पुणे जिल्ह्यात उन्हाळ्यात देखील सरासरी तापमान उष्माघाताचे बळी जातील एवढे फारसे वाढत नाही. गेल्या पाच वर्षांत जिल्ह्यात उष्माघाताने बळी गेल्याची एकही नोंद नाही. यंदा देखील केवळ एप्रिल महिन्यात दोन दिवस सरासरी तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक झाले होते.

यंदा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासूनच जिल्ह्यात कोरोनाच्या दुस-या लाटेचा प्रादुर्भाव वाढण्यास सुरुवात झाली. रुग्ण संख्या वाढत असल्याने 15 एप्रिल पासूनच जिल्ह्यात निर्बंध लागू करण्यास सुरुवात झाली. त्यात एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात उन्हाचा तडाखा वाढण्यास सुरुवात झाली. परंतु यंदा केवळ दोन दिवसच जिल्ह्याचे सरासरी तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक झाले. त्या लाॅकडाऊन व कोरोनाची धास्तीने लोक घराबाहेर पडलेच नाही. पुणे जिल्ह्यात एप्रिल-मे महिन्यात सरासरी तापमान थोडे अधिक असले तरी उष्माघात होण्याएवढे मात्र वाढत नाही. राज्यातील अन्य जिल्ह्याच्या तुलनेत पुण्याचा उन्हाळा थोडा सुखदच असतो. यामुळेच गेल्या पाच वर्षांत तरी जिल्ह्यात उष्माघाताची एकही नोंद नाही.

जिल्ह्यात एप्रिल ते मे महिन्याच्या दरम्यान तापमान साधारणपणे 35 ते 40 अंश सेल्सिअसपर्यंत जाते. यंदा एप्रिल महिन्यात दोन दिवस तापमानाने चाळिशी ओलांडली, मात्र त्याची तीव्रता जाणवली नाही.

यंदा एप्रिल च्या पहिल्या आठवड्यात कमाल तापमान सरासरीपेक्षा 2 ते 3 अंशाने अधिक होते. 39 अंश सेल्सिअसच्या जवळपास कमाल तापमान होते. या वर्षी च्या हंगामात 2 दिवस तापमान 40 अंश सेल्सिअस च्या वर गेले होते. तर सध्या चक्रीवादळामुळे कमाल व किमान तापमानात चांगली च घट झाली आहे. 18 मे रोजी पुण्यातील कमाल तापमान 31.6 अंश सेल्सिअस इतके होते. ते सरासरीपेक्षा 5.1 अंश सेल्सिअस ने कमी झाले आहे.

-----

उष्माघाताचे बळी

२०१९ - 00

२०२० - 00

२०२१ - 00

------

जिल्ह्यात यंदा उन्हाचे चटके कमीच

जिल्ह्यात एप्रिल अखेर आणि मे महिन्याच्या सुरुवातीला तापमानात वाढ झाली होती. सरासरी तापमान 38 ते 40 अंश सेल्सिअस दरम्यान वाढले होते. परंतु दरवर्षीपेक्षा यंदाचा उन्हाळा जरा थंडच होता. त्यात कोरोना आणि लाॅकडाऊनमुळे लोक घराबाहेरच पडले नाहीत, त्यामुळेच उन्हाचे चटकेदेखील जाणवले नाहीत.

-----

जिल्ह्यात गेल्या चार-पाच वर्षांत उष्माघाताची एकही नोंद नाही. राज्यातील इतर जिल्ह्याच्या तुलनेत पुणे जिल्ह्यातील सरासरी तापमान फारसे वाढत नाही. एप्रिल-मे महिन्यात सरासरी तापमान 38-40 दरम्यानच असते. यंदा तर उन्हाळा फारसा जाणवला देखील नाही.

- डाॅ. भगवान पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी