शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
2
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
3
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
4
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
5
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
6
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
7
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
8
नीलेश घायवळ न्यायालयाकडून फरार घोषित; संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता
9
FIH Hockey Men’s Junior World Cup 2025 : भारताच्या युवा हॉकी संघाचे PM मोदींकडून खास शब्दांत कौतुक, म्हणाले...
10
"एकदा भावाचा टी-शर्ट घालून मॅच खेळायला गेले अन्..."; महिला क्रिकेटर शेफालीचा धमाल किस्सा
11
IND vs SA : विकेटमागे जितेशची चपळाई! क्विंटन डी कॉकवर ओढावली 'नर्व्हस नाइंटी'ची नामुष्की (VIDEO)
12
"ते पार्ट टाइम पॉलिटिशियन, त्यांना गोपनीय परदेश दौऱ्यांचा छंद..."; मुस्लीम महिला नेत्या राहुल गांधींवर स्पष्टच बोलल्या
13
Indigo ला साडेसाती भोवली? दोन शत्रू ग्रहांमुळे अशी ‘दशा’ झाली; २०२७ पर्यंत आव्हान कायम अन्…
14
लुथरा बंधूंची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली; HC म्हणाले, “जिवाला धोका असल्याचा पुरावा...”
15
"मी स्वतःच फॉर्म भरला नाही, आता दंगलखोरांच्या पक्षासमोर...!" SIR वरून ममतांचा हल्लाबोल
16
इम्रान खानच्या तुरुंगात अडचणी आणखी वाढणार! पाकिस्तानने २४ तासात घेतले ५ मोठे निर्णय
17
"'मी गोमांस खातो, कोण मला अडवतं?', म्हणणाऱ्या मंत्र्यासोबत अमित शाह जेवताहेत, हिम्मत असेल तर...!"; उद्धव ठाकरे यांचं थेट आव्हान
18
T20 World Cup 2026 Tickets Live: ICC चा ऐतिहासिक निर्णय! फक्त १०० रुपयांत बूक करा वर्ल्ड कपचं तिकीट
19
"खुर्चीसाठी स्वत:चं पायपुसणं करून घेणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
20
IND vs SA 2nd T20I : अखेर सूर्या भाऊनं डाव साधला! टॉसचा बॉस होण्यासाठी यावेळी आजमावला हा फंडा
Daily Top 2Weekly Top 5

घटनाबदलाची हिंमत कोणातही नाही : सुशीलकुमार शिंदे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 13:39 IST

भारतीय संविधान प्रखर, सर्वांना न्याय देणारे आहे. अधूनमधून काहीजणांकडून घटनेत बदल करु, असे ऐकायला मिळते...

ठळक मुद्देडॉ. यशवंत मनोहर यांना नारायण सुर्वे जीवनगौरव पुरस्कार

पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यात वैचारिक वाद होतेच; मात्र घटना समिती स्थापन झाल्यावर गांधींनी आंबेडकरांचे नाव सुचवले आणि भारताला एकसंध राज्यघटना मिळाली. भारतीय संविधान प्रखर, सर्वांना न्याय देणारे आहे. अधूनमधून काहीजणांकडून घटनेत बदल करु, असे ऐकायला मिळते. प्रत्यक्षात कोणाचीही घटनाबदलाची हिंमत नाही,अशा शब्दांत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सत्ताधा-यांचा समाचार घेतला.भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या सभागृहात सोमवारी नारायण सुर्वे स्मृती पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेतर्फे यंदाचा नारायण सुर्वे जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ कवी, साहित्यिक आणि विचारवंत डॉ. यशवंत मनोहर यांना शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी अध्यक्षस्थानी ज्येष्ठ वात्रटिकाकार रामदास फुटाणे तर प्रमुख पाहूणे म्हणून विखे-पाटील फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. अशोक विखे-पाटील उपस्थित होते.  नारायण सुर्वे भला माणूस पुरस्कार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. गिरीश गांधी, ज्येष्ठ साहित्यिक विजय खरे यांना नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार, नारायण सुर्वे स्नेहबंध पुरस्कार रयत शिक्षण संस्थेच्या एस.एम. जोशी कॉलेजचे प्राचार्य डॉ. अरविंद बुरूंगले यांना, नारायण सुर्वे सनद पुरस्कार प्रसिद्ध कवयित्री कल्पना दुधाळ यांना आणि नारायण सुर्वे कामगारभूषण पुरस्कार श्री खंडेराय प्रतिष्ठान शिक्षण संस्थेचे संस्थापक गणपतराव बालवडकर यांना प्रदान करण्यात आले.शिंदे म्हणाले, ‘काळानुसार समाज बदलतो, विचार बदलतात. त्याप्रमाणे धर्माची व्याख्याही बदलायला हवी. धर्माचा अन्वयार्थ बदलण्याची ताकद क्रांतिकारी नवकवींमध्ये आहे. या कवींवर आंबेडकरवादी शिक्का करण्याचे काम काही जण करतात, प्रत्यक्षात परिस्थिती तशी नाही. आंबेडकर केवळ दलितांचे नेते नव्हते. त्यांनी कायम दूरदृष्टीने आणि सर्वसमावेशक विचार केला.’यशवंत मनोहर म्हणाले, ‘सुशीलकुमार शिंदे हे सुसंस्कृत राजकारणी आणि भल्या माणसांचे भले करणारा भला माणूस आहे. असे राजकारणी यापुढील काळात दिसणार नाहीत. सध्याच्या काळात सभ्यपणा राजकारणाला कळत नाही आणि परवडतही नाही. लोकांनी सुसंस्कृत राजकारणाची परंपराच सोडून दिली आहे. त्या काळात कवितेचा मातीशी संबंध उरला नव्हता. नवकवितेमध्ये आम्ही आम्हालाच सापडेनासे झालो होतो. जगण्याच्या प्रश्नांचे प्रतिबिंब कवितेत सापडत नव्हते. त्यावेळी नारायण सुर्वे आपली कविता घेऊन पुढे आले. ते ख-या अर्थाने युगप्रवर्तक कवी होते. संविधान आले नसते तर आम्ही अंधारात मिटुन गेलो असतो,आमच्या प्रतिभेला धुमारे फुटले नसते.’रामदास फुटाणे म्हणाले, ‘कवी प्रज्ञा आणि प्रतिभावंत असतीलही; मात्र, अनुभूती असलेले कवी शून्य आहेत. देश तोडण्याचे प्रयत्न अनेक वर्षे सुरु आहे. माणसाने जाती, धर्म निर्माण केले आणि ते जपण्यासाठी रक्तपात होतो. हजारो वर्षांचा संघर्ष मोडून काढून देश जोडण्याचे काम कवींना, साहित्यिकांना करायचे आहे. केवळ, देशाचा विचार न करता जगातील शांतताप्रिय माणसे जोडण्याचे काम साहित्यिकांना करायचे आहे.’ पुरस्कारार्थींनी मनोगत व्यक्त केले. सचिन ईटकर यांनी प्रास्ताविक केले. ..................कोणती भांग प्यायले होते?संमेलनाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आजच मी डॉ. अरुणा ढेरे यांची भेट घेऊन अभिनंदन केले. अध्यक्षीय भाषणामध्ये इंदिरा संत यांचा उल्लेख करण्याची मी त्यांना विनंती केली. रसिकांनी त्यावेळी संत यांना पराभूत केले आणि रमेश मंत्री यांना निवडून दिले. त्यावेळी मतदार कोणत्या कंपनीची भांग प्यायले होते, असा सवाल मनोहर यांनी उपस्थित केला. 

टॅग्स :PuneपुणेPoliticsराजकारणSushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदेGovernmentसरकार