शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
2
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
3
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
4
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
5
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
6
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
7
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
8
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
9
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
10
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
11
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
12
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
13
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
14
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
15
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
16
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
17
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
18
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
19
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
20
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा न्यायालयात नाही डिजिटल माहिती फलक

By admin | Updated: January 2, 2015 01:01 IST

आपल्या खटल्याची सुनावणी आहे म्हटले, की पक्षकार सकाळपासून न्यायालय कक्षात बसून राहतात.

पुणे : आपल्या खटल्याची सुनावणी आहे म्हटले, की पक्षकार सकाळपासून न्यायालय कक्षात बसून राहतात. दुपारच्या सत्रापर्यंत तर पक्षकारांच्या गजबजीने न्यायालयाचे आवार एखादा बाजार असावा, असे भरलेले असते. आपल्या खटल्याच्या सुनावणीचा पुकारा झाला अन् आपण नसू तर.. या भीतीने पक्षकार दिवसभर ताटकळतच राहतात. याच वेळखाऊ प्रक्रियेला आणि गर्दीला आटोक्यात आणण्यासाठी २०११पासून न्यायालयात केसचे डिजीटल माहिती फलक लावण्याचा अध्यादेश शासनाने काढला होता. मात्र, शिवाजीनगर न्यायालयात अद्यापही हे फलकच नसल्याचे चित्र आहे. यासंबंधी जिल्हा न्यायालयाने मशिनरी व अनुदानाची जबाबदारी सरळ मुंबई उच्च न्यायालयाकडे ढकलून हात झटकले आहेत. न्यायालयीन प्रक्रिया पक्षकारांसाठी सोपी व्हावी या दृष्टीने शासनाने २०११मध्ये अध्यादेश काढून प्रत्येक न्यायालयात डिजिटल केस माहिती फलक लावणे बंधनकारक केले आहे. या डिजीटल केस माहिती फलकात कोणत्या खटल्यांची सुनावणी होणार, निकाली निघालेले खटले, बाद झालेले आणि पुढील तारखा मिळालेल्या खटल्यांची माहिती देणे अपेक्षित आहे. मात्र, अद्यापही शिवाजीनगर येथील जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये हे डिजिटल माहिती फलक उपलब्ध नाहीत, याउलट जिल्हा न्यायालय प्रशासनाने या परिस्थितीसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रशासनाला जबाबदार धरले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने डिजीटल फलकांसाठी आवश्यक असणारे हार्डवेअर तसेच अनुदान न दिल्याने ही यंत्रणा कार्यरत नाही अशी माहिती, माहिती अधिकारात मिळाली आहे.यासंबंधी माहिती अधिकार कार्यकर्ते विहार दुर्वे यांनी माहिती अधिकार कायद्यानुसार, पुणे जिल्हा न्यायालयात डिजिटल फलक नसण्याची कारणे विचारण्यासाठी अर्ज केला होता. यावर जिल्हा न्यायालय प्रशासनाने मुंबई उच्च न्यायालयाकडून यासंबंधी आवश्यक हार्डवेअर मिळाले नसल्याने यंत्रणा कार्यरत नाही तसेच २०११ ते २०१४ या कालावधीत डिजिटल केस माहिती फलक व त्यासाठी आवश्यक अनुदान मुंबई उच्च न्यायालयाकडून मिळालेले नाही तसेच या संदर्भात शासनाचे स्वतंत्र अध्यादेश ही मिळालेले नाही; त्यामुळे यासाठी वेगळे अनुदान मागविले नसल्याचे उत्तर देण्यात आले आहे. (प्रतिनिधी)??शासनाच्या अध्यादेशानंतर मुंबई उच्च न्यायायल व सर्वोच्च न्यायालयात ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. मात्र, जिल्हा न्यायालयाने पक्षकारांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत अद्याप ही यंत्रणा बसविलेली नाही. यामुळे पक्षकारांना माहितीअभावी दिवस-दिवस न्यायालयाच्या आवारामध्ये ताटकळत बसावे लागत आहे.