शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

ना धर्मांतर, ना विरोध...आम्ही नांदतो सौख्यभरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “आमच्यावर ना कुणी धर्मांतराची सक्ती केली ना आम्हाला कधी कुटुंबीयांनी त्रास दिला. विशिष्ट धर्माच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : “आमच्यावर ना कुणी धर्मांतराची सक्ती केली ना आम्हाला कधी कुटुंबीयांनी त्रास दिला. विशिष्ट धर्माच्या चालीरितींचे पालन करण्याचीही बळजबरी आम्हावर आजवर कोणी केलेली नाही. आमच्या प्रेमविवाहाला अनेक वर्षे झाली. आम्ही सुखाने नांदतो आहोत. हिंदू-मुस्लिम या भिन्न धर्मियांच्या विवाहांना वेगळे वळण का लावले जात आहे हे समजत नाही,” या प्रतिक्रिया आहेत हिंदु-मुस्लिम विवाह यशस्वी झालेल्या जोडप्यांच्या.

विविध धर्मांमधील तरूणींना प्रेमाच्या जाळयात ओढून त्यांच्याशी निकाह करून ‘लव्ह जिहाद’ धर्मांतर करण्याचे षडयंत्र रचले जात असल्याची राळ सध्या उठवली जात आहे. या संदर्भाने ‘लोकमत’ने हिंदू-मुस्लिम जोडप्यांशी संवाद साधला.

विशाल विमल आणि डॉ. आरजू तांबोळी हे दोघेही चळवळीतले कार्यकर्ते. विशाल हिंदू तर आरजू मुस्लिम. आठ वर्षांपूर्वी ओळख झाली आणि ओळखीचे रूपांतर मैत्री व प्रेमात आणि प्रेमातून विवाह कधी झाला हे दोघांनाही कळले नाही. विशाल सांगतो, “हिंदूंच्या आणि मुस्लिमांच्या कायद्यानुसार धर्मांतर केल्याशिवाय आम्हाला लग्न करता येत नाही. पण आम्ही ‘स्पेशल मँरेज अँक्ट १९५४ नुसार लग्न केले. यात दोघांनाही धर्मांतर करण्याची गरज नसते. एकप्रकारे सरकारच तुमचे पौराहित्य करते. मात्र धर्मांतर करण्यासाठी आमच्यावरही दबाव टाकण्यात आला होता. पण आम्ही आमच्या निर्णयावर ठाम होतो. त्यामुळे तिचं नाव देखील बदलेले नाही. दोघांच्या कुटुंबीयांनी आमचा या लग्नाचा स्वीकार केला हे जास्त महत्वाचे. त्यांच्याशी आमचा सुरूवातीपासूनच संवाद होता. उलट तिच्या कुटुंबीयांशी इतर नातेवाईंकानी संवाद तोडला. पण आम्ही सर्वांची नाराजी दूर करण्यात ५० टक्क्यांपर्यंत यशस्वी झालो आहोत.”

-----------------------------------------------