शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
2
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
3
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
4
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
5
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
6
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
7
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
8
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
9
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
10
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
11
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
12
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
13
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
14
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
15
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
16
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
17
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
18
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
19
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
20
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?

अकरावीच्या सव्वा लाख जागा रिक्त, प्रवेश प्रक्रिया बंद केली जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 05:47 IST

राज्यातील पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, अमरावती आणि औरंगाबाद या सहा शहरांमध्ये अकरावीच्या सुमारे सव्वालाख जागा अद्याप रिक्त आहेत. प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांची मंगळवारपासून अखेरची फेरी घेऊन प्रवेश प्रक्रिया बंद केली जाणार आहे. मात्र त्यानंतरही रिक्त जागा फारशा कमी होण्याची शक्यता नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

पुणे : राज्यातील पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, अमरावती आणि औरंगाबाद या सहा शहरांमध्ये अकरावीच्या सुमारे सव्वालाख जागा अद्याप रिक्त आहेत. प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांची मंगळवारपासून अखेरची फेरी घेऊन प्रवेश प्रक्रिया बंद केली जाणार आहे. मात्र त्यानंतरही रिक्त जागा फारशा कमी होण्याची शक्यता नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.राज्यात सहा प्रमुख शहरांमध्ये एकाच वेळापत्रकानुसार अकरावीची आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. शिक्षण विभागाने पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, अमरावती आणि औरंगाबाद असे सहा स्वतंत्र विभाग केले आहेत. मुंबईमध्ये सर्वाधिक २ लाख ९७ हजार ३१५ एवढी प्रवेश क्षमता आहे. या सहा विभागांमध्ये एकूण प्रवेशक्षमता ५ लाख ९ हजार ६१० आहे. त्यासाठी ३ लाख ९३ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. सर्वच ठिकाणी उपलब्ध जागांच्या तुलनेत अर्जांची संख्या कमी आहे.प्रवेशाच्या एकूण सात फेºया झाल्या. एकूण अर्जांपैकी ९७ टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. केंद्रीय प्रवेशामधून सुमारे ३ लाख ४ हजार, तर कोट्यातून सुमारे ८० हजारविद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. त्यामुळे अद्याप १ लाख २४ हजारजागा रिक्त आहेत. त्यापैकी ६६ हजार जागा मुंबईतील आहेत. आठव्या फेरीमध्ये जास्त प्रवेश होण्याची शक्यता नाही. त्यामुळे रिक्त जागांचा आकडा फारसा कमी होण्याची शक्यता नाही.सध्या सुरू असलेल्या आठव्या ‘प्रथम येणाºयास, प्रथम प्राधान्य’ या फेरीसाठी रिक्त जागांची माहिती १८ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता प्रसिद्ध केली जाणार आहे. १९ ते २५ सप्टेंबर या कालावधीत आॅनलाइन प्रवेश निश्चित करता येणार आहे. ही अखेरची संधी असेल, अशी माहिती केंद्रीय प्रवेश समितीकडून देण्यात आली.