शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
2
दुबार मतदार दिसले तर तिथेच फोडून काढायचे; राज ठाकरे यांचा घणाघात, पडदा हटवला, पुरावे दाखवले
3
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार
4
गौरी खानचं 'टोरी' रेस्टॉरंट : ₹१५०० चे मोमोज, ₹११०० चं सॅलड; मॅश बटाट्याची किंमत ऐकून अवाक् व्हाल
5
रोहित आर्याबाबत मोठा खुलासा! कोथरुडचा घरमालक उलटे १.७५ लाख द्यायला तयार झालेला; शेवटी...
6
जीएसटी कपात, दसरा अन् दिवाळी; ऑक्टोबरमध्ये पडला 'वाहनांचाही पाऊस'! महिंद्रा, ह्युंदाई, टाटानेच नाही तर स्कोडानेही...
7
दोस्तीतच कुस्ती! ६ महिन्यांपूर्वी लग्न झाले, ५ मिनिटांत घरी पोहोचणार होता; पण रस्त्यातच मित्रांनी संपवले
8
जबरदस्त शक्तीप्रदर्शन होणार...! एकाचवेळी ५५ देश आपल्या युद्धनौका भारताच्या समुद्रात पाठविणार; नौदलाने हुंकार भरला...
9
8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय रे भाऊ? नवीन वेतन कसं ठरणार? जाणून घ्या
10
Retirement: स्टार खेळाडूनं चाहत्यांना दिला मोठा धक्का, अचानक केली निवृत्तीची घोषणा!
11
प्रबोधिनी एकादशी २०२५: देवउठनी एकादशीला विष्णू खरोखरच ४ महिन्यांच्या योगनिद्रेतून जागे होतात का?
12
"नरेंद्र मोदींची छाती ११२ इंचाची, अवघ्या ५ तासांत पूर्ण पाकिस्तानवर कब्जा केला असता, पण..."
13
पाच वर्षांत अफाट परतावा देणारे शेअर्स कोणते, गुंतवणूकदारांसाठी संकेत काय? तुमच्याकडे आहे का?
14
BCCI: "आणखी दोन-तीन दिवस वाट पाहू, जर ट्रॉफी परत मिळाली नाही तर...", बीसीसीआयची कडवी भूमिका
15
“मविआचे ३१ खासदार निवडून आले, तेव्हा मतचोरी झाली का”; भाजपाचा सवाल, राज ठाकरेंबद्दल म्हणाले... 
16
Andhra Pradesh Stampede: आंध्र प्रदेशच्या व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी; ९ भक्तांचा मृत्यू 
17
आज पुन्हा घसरलं सोनं-चांदी, लग्नसराईला सुरुवात होण्यापूर्वी किती स्वस्त झाला? पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
भारतानं मिळवलं दहशतवादावर नियंत्रण, २०१३ नंतर कुठेही मोठा दहशतवादी हल्ला नाही - अजित डोवाल
19
"७५ वर्षांत काश्मीर ताब्यात घेता आले नाही अन्..."; तालिबानने पाकिस्तानच्या दुखऱ्या बाजूवर मीठ रगडले....
20
'या' रेल्वे कंपनीला मुंबई मेट्रोकडून मिळालं २४८१ कोटी रुपयांचं काम, फोकसमध्ये राहणार शेअर्स

रात्रशाळा शिक्षकांच्या नोकरीवर गदा

By admin | Updated: May 28, 2017 03:59 IST

राज्यशासनाने १७ मे रोजी काढलेल्या आदेशामुळे रात्र शाळेला असलेल्या शाळेत अर्धवेळ नोकरी करणाऱ्या शिक्षकांना यापुढे रात्रशाळेत शिकवता येणार नाही.

- लोकमत न्यूज नेटवर्क

बिबवेवाडी : राज्यशासनाने १७ मे रोजी काढलेल्या आदेशामुळे रात्र शाळेला असलेल्या शाळेत अर्धवेळ नोकरी करणाऱ्या शिक्षकांना यापुढे रात्रशाळेत शिकवता येणार नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील सुमारे १७६ शाळेतील १,३५८ शिक्षकांच्या नोकरीवर गदा आल्याचा आरोप रात्रशाळा महासंघाने केला आहे. ३० हजारहून अधिक विद्यार्थी या रात्रशाळेत शिक्षण घेत आहेत. ज्या विद्यार्थांना कामामुळे किंवा अन्य काही कारणांमुळे दिवसा शिकता येत नाही, असे विद्यार्थी या शाळेत शिकत असतात. या शाळेत शिकण्यासाठी वयाची कुठलीही अट नसते. दररोज रात्री किंवा सायंकाळी साडे तीन तास ही शाळा चालवली जाते. पुण्यात पाच रात्रशाळा असून त्या पैकी एक शाळा पुणे महानगरपालिकेकडून चालवली जाते. यातील एक शाळा ही इंग्रजी माध्यमातून चालवली जाते. सुमारे १०० वर्षांपासून आपल्या देशात या रात्रशाळा सुरूआहेत. इतर शाळेत शिकवणारे शिक्षकच या शाळेत शिकवण्याचे कार्य करीत आहेत. भाजपा सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे दिवसा शिकवणाऱ्या शिक्षकांना यापुढे रात्र शाळेत शिकवता येणार नाही. त्यामुळे राज्यातील सुमारे १,३५८ शिक्षकांच्या नोकरीवर गदा आली आहे. या संदर्भात शासनाने निर्णय बदलला नाही तर उपोषण व न्यायालयीन लढा देणार असल्याचे रात्रशाळा महासंघाच्या वतीने प्राचार्य संजय सातपुते, पूना नाईट स्कूलचे प्राचार्य गंगाधर रासगे, चिंतामणी रात्र प्रशालेचे प्राचार्य संजय पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. शिक्षण विभागात गेली अनेक वर्ष विनाअनुदान तत्वावर बिनपगारी शिक्षक नोकरी करत होते. तेव्हा त्यांना वेतन देण्याचा विचार शासनाने का केला नाही. या निर्णयामुळे १,३५८ शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागणार आहे. त्यांचे कुटुंबच उद्ध्वस्त होणार आहे. यासाठी राज्यसरकाने सकारात्मक दृष्टीने पाहण्याची गरज आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.- एस. एस. कोड (शाळेची संहिता) प्रमाणे शिक्षकाला एक पूर्ण वेळ व एक अर्धवेळ काम करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. तरी शासनाच्या या निर्णयामुळे या शिक्षकावर हा अन्याय झालेला आहे. या शिक्षकापैकी अनेक शिक्षक हे तोडक्या मानधनावर विनाअनुदानित संस्थेत काम करीत आहेत. त्यामुळे त्यांचा तर संसारच रस्त्यावर येण्याची भीती निर्माण झाली आहे.