शहरं
Join us  
Trending Stories
1
युपी विधानसभा, रेल्वे स्टेशन आणि शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी; राजधानीत हायअलर्ट
2
एक व्यक्ती इथे नाही, त्याची उणीव...; धनंजय मुंडेंना परळीतील सभेत वाल्मिक कराडची आठवण
3
UAE ला जात होतं इंडिगो विमान, अचानकच 10000 वर्षांनंतर झाले ज्वालामुखीचे स्फोट अन् मग...!
4
“आता गृह मंत्रालय घेतले, पुढे भाजपावाले नितीश कुमारांचे CM पद काढून घेतील”; कुणाचा दावा?
5
सोन्याच्या खाणीत गुंतवणूक करा, 5 वर्षांची कर सूट मिळवा; अफगाणिस्तानची भारताला मोठी ऑफर
6
शिंदेसेनेला पुन्हा एकदा सहकाऱ्याचा धक्का, नगराध्यक्षपदाच्या उमेदवारचा भाजपमध्ये प्रवेश
7
७०० कोटींचा खर्च केला, पण वंदे भारत ट्रेनची सेवा नाहीच; प्रवाशांची गैरसोय, नाराजी वाढली?
8
Dharmendra : "ते मला नेहमी म्हणायचे की...", धर्मेंद्रजींच्या निधनानंतर सचिनसह विराटही झाला भावूक
9
आता मुंबईतही बिबट्याची दहशत! दिंडोशी म्हाडाच्या बंगल्यात बिबट्याचा संचार
10
“भावनिक वातावरण तयार करून मते मिळवण्याचा प्रयत्न”; राज ठाकरेंच्या विधानावर भाजपाचे उत्तर
11
जुना, वापरलेला फोन खरेदी करताय? थांबा! एका चुकीमुळे होऊ शकते हजारोंचे नुकसान, आताच जाणून घ्या..
12
रिलायन्स जिओला ग्राहक वैतागले! कॉलवेळी ऐकायलाच येत नाहीय..., प्रचंड समस्या, बीएसएनएल परवडले...
13
मोठा पेच...! धर्मेंद्र यांच्या ४५० कोटींच्या संपत्तीचे वारसदार कोण? दोन पत्नी, ६ मुले... 
14
Dharmendra Last Rites: देओल कुटुंबीयांचा आधार हरपला; अभिनेते धर्मेंद्र अनंतात विलीन, सनी देओलने दिला मुखाग्नी
15
"सरकारनं माझं ऐकलं नाही तर संसदेच्या छतावरून उडी मारेन"; जेव्हा राजकारणात दिसली धर्मेंद्र यांची 'शोले स्टाईल'
16
Women’s Kabaddi World Cup 2025: कबड्डीतही भारताच्या लेकी जगात भारी! सलग दुसऱ्यांदा जिंकली वर्ल्ड कप स्पर्धा
17
आधी कारने धडक, मग १९ सेकंदात १९ कुऱ्हाडीचे घाव; गुरुग्राममध्ये डिलिव्हरी बॉयवर जीवघेणा हल्ला!
18
आधुनिक तंत्रज्ञान, पूर्णपणे मेड इन इंडिया; भारतीय नौदलात ‘INS माहे’ची धमाकेदार एन्ट्री...
19
प्रेमात धोका! मिस कॉलने जोडले नाते, प्रियकराने तोडले! गर्भवती प्रेयसीचा गर्भपात करून स्टेशनवर सोडून पळाला
20
डॉ. गौरी गर्जे यांचा मृत्यू अनैसर्गिक; डॉक्टरांच्या खुलाशाने खळबळ, शवविच्छेदन अहवालात कोणत्या नोंदी?
Daily Top 2Weekly Top 5

देशातील वृत्तपत्रे ही लोकशाहीची खरी ताकद - प्रतिभाताई पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 03:03 IST

संरक्षणासाठी आपण पोलिसांकडे धाव घेतो. अन्यायाच्या विरोधात न्यायालयाचे दार ठोठावतो. समाजात राहत असताना येणाऱ्या विविध प्रश्नांच्या उत्तरासाठी शासनाकडे दाद मागतो. मात्र यापैकी कुणाकडूनही दखल न घेतली गेल्यास लोक आपले गा-हाणे वृत्तपत्रांकडे मांडतात. त्यामुळे वृत्तपत्रे ही लोकशाहीची खरी ताकद असल्याचे मत माजी राष्ट्रपती डॉ. प्रतिभाताई पाटील यांनी व्यक्त केले.

पुणे - संरक्षणासाठी आपण पोलिसांकडे धाव घेतो. अन्यायाच्या विरोधात न्यायालयाचे दार ठोठावतो. समाजात राहत असताना येणाऱ्या विविध प्रश्नांच्या उत्तरासाठी शासनाकडे दाद मागतो. मात्र यापैकी कुणाकडूनही दखल न घेतली गेल्यास लोक आपले गा-हाणे वृत्तपत्रांकडे मांडतात. त्यामुळे वृत्तपत्रे ही लोकशाहीची खरी ताकद असल्याचे मत माजी राष्ट्रपती डॉ. प्रतिभाताई पाटील यांनी व्यक्त केले.महाराष्ट्र संपादक परिषद आयोजित पत्रकारिता साहित्यगौरव पुरस्कार सोहळ्यातील पुरस्कारार्थींच्या सन्मान सोहळ्यात त्या बोलत होत्या. महाराष्ट्र राज्य पतसंस्था फाऊंडेशनचे अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार काकासाहेब कोयटे कार्यक्रमाला प्रमुख म्हणून उपस्थित होते. ‘लोकमत’चे संपादक विजय बाविस्कर अध्यक्षस्थानी होते़ परिषदेचे अध्यक्ष संजय मलमे, कार्याध्यक्ष रमेश खोत, सचिव एकनाथ बिरवटकर, कोषाध्यक्ष अनंत पाध्ये व्यासपीठावर उपस्थित होते.ज्येष्ठ संपादक प्रकाश पोहरे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याबरोबरच न्यूज १८ लोकमतचे दिनेश केळुस्कर (स्व. शि. म. परांजपे स्मृती पुरस्कार), अशोक वानखेडे (दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर स्मृती पुरस्कार), नीला खोत (लोकमान्य टिळ्क स्मृती पुरस्कार), नवनाथ दिघे (विष्णूशास्त्री चिपळूणकर स्मृती पुरस्कार), राजेश जगताप (आचार्य अत्रे स्मृती पुरस्कार), शौकतअली मिरसाहेब (प्रबोधनकार ठाकरे स्मृती पुरस्कार), संदीप आचार्य (गो. ग. आगरकर स्मृती पुरस्कार), देवेंद्र पळणीटकर (भुरीबाई केसरीमलजी जैन पुरस्कार) आदी मान्यवरांना पुरस्काराने गौरविण्यात आले.प्रतिभाताई पाटील म्हणाल्या, समाजातील अनिष्ट प्रथांना पायबंद घालण्यासाठी वृत्तपत्रांना पुढाकार घ्यावा लागतो. त्यामुळे लोकशाहीत वृत्तपत्रांच्या जबाबदाºयांना अधिक महत्त्व आहे. प्रकाश पोहरे म्हणाले, ‘आपल्यामधला पत्रकार कधीही मरू न देणे, ही काळजी संपादकाला घ्यावी लागते़ संपादकपद सांभाळणे आव्हानात्मक असून नवीन पिढीने या क्षेत्रात येताना पुरेशी तयारी करणे गरजेचे आहे़’सर्व पुरस्कारविजेत्या पत्रकार, संपादकांना शुभेच्छा देऊन विजय बाविस्कर यांनी पत्रकारितेचा गाभा आणि गाभारा शाबूत ठेवण्याचे आवाहन केले़पुरस्कारविजेत्यांच्या वतीने संदीप आचार्य यांनी मनोगत व्यक्त केले़ प्रा. हेमंत सामंत यांनी सूत्रसंचालन केले.