शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

नव्या जलवाहिनीला लागली पुन्हा गळती

By admin | Updated: May 30, 2017 02:22 IST

उजनी जलाशयातून एमआयडीसीला पाणीपुरवठा करणाऱ्या नव्या जलवाहिनीला पुन्हा गळती लागली आहे. या जलवाहिनीतून

लोकमत न्यूज नेटवर्कबारामती : उजनी जलाशयातून एमआयडीसीला पाणीपुरवठा करणाऱ्या नव्या जलवाहिनीला पुन्हा गळती लागली आहे. या जलवाहिनीतून मोठ्या प्रमाणात पाणीगळती होत असल्याने एमआयडीसीचापाणीपुरवठा ठप्प झाला आहे. येथील काही शेतकऱ्यांनी जलवाहिनीचा व्हॉल्व्ह तोडून गळती केल्याचा उद्योजकांचा आरोप आहे. त्यामुळे बारामती एमआयडीसीतील उद्योगांवर पुन्हा टँकरने पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे.यापूर्वी जलवाहिनी जीर्ण झाल्याने गळतीचे प्रमाण अधिक होते. उद्योगांना कायम पाणी टँकरने विकत घ्यावे लागले. त्यामुळे उद्योजकांच्या पाठपुराव्यानंतर २२ कोटी रुपयांची नवीन जलवाहिनी बसविण्यात आली. हे कामदेखील तीन ते साडेतीन वर्षे रखडले होते. मात्र, नवीन जलवाहिनीतूनदेखील गळती सुरू झाल्याने उद्योजकांवर मनस्ताप सहन करण्याची वेळ आली आहे. गेल्या १५ दिवसांपासून हा प्रकार सुरू असल्याची उद्योजकांची तक्रार आहे. दर शुक्रवारी हातोड्याचा वापर करून व्हॉल्व्ह तोडला जातो. शनिवारी, रविवारी एमआयडीसी कार्यालय बंद असते. त्यामुळे दोन ते तीन दिवस पाणी वापरायला मिळते, असादेखील पाणीगळती करणाऱ्यांचा हेतू असल्याचे उद्योजकांनी सांगितले....पुन्हा पाणीटंचाईला सामोरे जावे लागेलयाबाबत बारामती चेंबर आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष प्रमोद काकडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले, की सध्या सुरू असलेल्या पाणीगळतीबाबत एमआयडीसी प्रशासन गंभीर नाही. आज एमआयडीसीच्या मुख्य अभियंत्यांशी यासंदर्भात संपर्क साधल्यानंतर हालचालींना सुरुवात झाली. जुन्या जीर्ण जलवाहिनीतून नेहमी गळती होत असे. मात्र, नवीन जलवाहिनीतून गळती सुरू झाली आहे. त्यामुळे हा प्रकार गांभीर्याने न घेतल्यास पुन्हा एमआयडीसीला पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल....एमआयडीसी  प्रशासन हतबलबारामती चेंबर आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे कार्याध्यक्ष दत्ता कुंभार यांनी सांगितले, की गेल्या ४ आठवड्यांपासून हा प्रकार सुरू आहे. एका महिन्यापासून पाण्याचा तुटवडा जाणवत आहे.जी झोनमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुुरू आहे. पोंधवडी, पिंपळे येथील काही शेतकऱ्यांकडून हा प्रकार सुरू आहे. पोलीस कारवाई होत नाही. एमआयडीसी प्रशासन हा प्रकार रोखण्यासाठी हतबल आहे.संरक्षणासाठी पोलीस संरक्षणाची मागणीएमआयडीसीचे कार्यकारी अभियंता ए. के. आगवणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले, की जलवाहिनीतून होणारी गळती थांबविण्यात पूर्णपणे यश आले.पाणीगळतीला कारणीभूत असणाऱ्यांविरोधात भिगवण पोलीस ठाण्यासह बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. जलवाहिनीसाठी पोलीस संरक्षणाची मागणी करण्यात आली आहे.