शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

नव्या जलवाहिनीला लागली पुन्हा गळती

By admin | Updated: May 30, 2017 02:22 IST

उजनी जलाशयातून एमआयडीसीला पाणीपुरवठा करणाऱ्या नव्या जलवाहिनीला पुन्हा गळती लागली आहे. या जलवाहिनीतून

लोकमत न्यूज नेटवर्कबारामती : उजनी जलाशयातून एमआयडीसीला पाणीपुरवठा करणाऱ्या नव्या जलवाहिनीला पुन्हा गळती लागली आहे. या जलवाहिनीतून मोठ्या प्रमाणात पाणीगळती होत असल्याने एमआयडीसीचापाणीपुरवठा ठप्प झाला आहे. येथील काही शेतकऱ्यांनी जलवाहिनीचा व्हॉल्व्ह तोडून गळती केल्याचा उद्योजकांचा आरोप आहे. त्यामुळे बारामती एमआयडीसीतील उद्योगांवर पुन्हा टँकरने पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे.यापूर्वी जलवाहिनी जीर्ण झाल्याने गळतीचे प्रमाण अधिक होते. उद्योगांना कायम पाणी टँकरने विकत घ्यावे लागले. त्यामुळे उद्योजकांच्या पाठपुराव्यानंतर २२ कोटी रुपयांची नवीन जलवाहिनी बसविण्यात आली. हे कामदेखील तीन ते साडेतीन वर्षे रखडले होते. मात्र, नवीन जलवाहिनीतूनदेखील गळती सुरू झाल्याने उद्योजकांवर मनस्ताप सहन करण्याची वेळ आली आहे. गेल्या १५ दिवसांपासून हा प्रकार सुरू असल्याची उद्योजकांची तक्रार आहे. दर शुक्रवारी हातोड्याचा वापर करून व्हॉल्व्ह तोडला जातो. शनिवारी, रविवारी एमआयडीसी कार्यालय बंद असते. त्यामुळे दोन ते तीन दिवस पाणी वापरायला मिळते, असादेखील पाणीगळती करणाऱ्यांचा हेतू असल्याचे उद्योजकांनी सांगितले....पुन्हा पाणीटंचाईला सामोरे जावे लागेलयाबाबत बारामती चेंबर आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष प्रमोद काकडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले, की सध्या सुरू असलेल्या पाणीगळतीबाबत एमआयडीसी प्रशासन गंभीर नाही. आज एमआयडीसीच्या मुख्य अभियंत्यांशी यासंदर्भात संपर्क साधल्यानंतर हालचालींना सुरुवात झाली. जुन्या जीर्ण जलवाहिनीतून नेहमी गळती होत असे. मात्र, नवीन जलवाहिनीतून गळती सुरू झाली आहे. त्यामुळे हा प्रकार गांभीर्याने न घेतल्यास पुन्हा एमआयडीसीला पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल....एमआयडीसी  प्रशासन हतबलबारामती चेंबर आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे कार्याध्यक्ष दत्ता कुंभार यांनी सांगितले, की गेल्या ४ आठवड्यांपासून हा प्रकार सुरू आहे. एका महिन्यापासून पाण्याचा तुटवडा जाणवत आहे.जी झोनमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुुरू आहे. पोंधवडी, पिंपळे येथील काही शेतकऱ्यांकडून हा प्रकार सुरू आहे. पोलीस कारवाई होत नाही. एमआयडीसी प्रशासन हा प्रकार रोखण्यासाठी हतबल आहे.संरक्षणासाठी पोलीस संरक्षणाची मागणीएमआयडीसीचे कार्यकारी अभियंता ए. के. आगवणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले, की जलवाहिनीतून होणारी गळती थांबविण्यात पूर्णपणे यश आले.पाणीगळतीला कारणीभूत असणाऱ्यांविरोधात भिगवण पोलीस ठाण्यासह बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. जलवाहिनीसाठी पोलीस संरक्षणाची मागणी करण्यात आली आहे.