शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

नव्या जलवाहिनीला लागली पुन्हा गळती

By admin | Updated: May 30, 2017 02:22 IST

उजनी जलाशयातून एमआयडीसीला पाणीपुरवठा करणाऱ्या नव्या जलवाहिनीला पुन्हा गळती लागली आहे. या जलवाहिनीतून

लोकमत न्यूज नेटवर्कबारामती : उजनी जलाशयातून एमआयडीसीला पाणीपुरवठा करणाऱ्या नव्या जलवाहिनीला पुन्हा गळती लागली आहे. या जलवाहिनीतून मोठ्या प्रमाणात पाणीगळती होत असल्याने एमआयडीसीचापाणीपुरवठा ठप्प झाला आहे. येथील काही शेतकऱ्यांनी जलवाहिनीचा व्हॉल्व्ह तोडून गळती केल्याचा उद्योजकांचा आरोप आहे. त्यामुळे बारामती एमआयडीसीतील उद्योगांवर पुन्हा टँकरने पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे.यापूर्वी जलवाहिनी जीर्ण झाल्याने गळतीचे प्रमाण अधिक होते. उद्योगांना कायम पाणी टँकरने विकत घ्यावे लागले. त्यामुळे उद्योजकांच्या पाठपुराव्यानंतर २२ कोटी रुपयांची नवीन जलवाहिनी बसविण्यात आली. हे कामदेखील तीन ते साडेतीन वर्षे रखडले होते. मात्र, नवीन जलवाहिनीतूनदेखील गळती सुरू झाल्याने उद्योजकांवर मनस्ताप सहन करण्याची वेळ आली आहे. गेल्या १५ दिवसांपासून हा प्रकार सुरू असल्याची उद्योजकांची तक्रार आहे. दर शुक्रवारी हातोड्याचा वापर करून व्हॉल्व्ह तोडला जातो. शनिवारी, रविवारी एमआयडीसी कार्यालय बंद असते. त्यामुळे दोन ते तीन दिवस पाणी वापरायला मिळते, असादेखील पाणीगळती करणाऱ्यांचा हेतू असल्याचे उद्योजकांनी सांगितले....पुन्हा पाणीटंचाईला सामोरे जावे लागेलयाबाबत बारामती चेंबर आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष प्रमोद काकडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले, की सध्या सुरू असलेल्या पाणीगळतीबाबत एमआयडीसी प्रशासन गंभीर नाही. आज एमआयडीसीच्या मुख्य अभियंत्यांशी यासंदर्भात संपर्क साधल्यानंतर हालचालींना सुरुवात झाली. जुन्या जीर्ण जलवाहिनीतून नेहमी गळती होत असे. मात्र, नवीन जलवाहिनीतून गळती सुरू झाली आहे. त्यामुळे हा प्रकार गांभीर्याने न घेतल्यास पुन्हा एमआयडीसीला पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल....एमआयडीसी  प्रशासन हतबलबारामती चेंबर आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे कार्याध्यक्ष दत्ता कुंभार यांनी सांगितले, की गेल्या ४ आठवड्यांपासून हा प्रकार सुरू आहे. एका महिन्यापासून पाण्याचा तुटवडा जाणवत आहे.जी झोनमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुुरू आहे. पोंधवडी, पिंपळे येथील काही शेतकऱ्यांकडून हा प्रकार सुरू आहे. पोलीस कारवाई होत नाही. एमआयडीसी प्रशासन हा प्रकार रोखण्यासाठी हतबल आहे.संरक्षणासाठी पोलीस संरक्षणाची मागणीएमआयडीसीचे कार्यकारी अभियंता ए. के. आगवणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले, की जलवाहिनीतून होणारी गळती थांबविण्यात पूर्णपणे यश आले.पाणीगळतीला कारणीभूत असणाऱ्यांविरोधात भिगवण पोलीस ठाण्यासह बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. जलवाहिनीसाठी पोलीस संरक्षणाची मागणी करण्यात आली आहे.