शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
2
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
3
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
4
अनंत अंबांनींच्या वनताराला भेटीने मेस्सी आनंदी; प्राण्यांची काळजी घेण्याची पद्धत पाहून प्रभावी
5
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
6
दुचाकी, ट्रॅक्टरसह साडेतीन एकर शेतीही विकली, तरीही व्याजाचा डोंगर वाढताच... सावकाराचा तगादा; शेतकऱ्याने विकली किडनी
7
नॅशनल हेराल्ड केस : ईडीला धक्का; राहुल, सोनिया गांधी यांना दिलासा
8
एकच उच्चशिक्षणासाठी नियामक मंडळ असेल तर... मूल्यांकन होईल 'डिजिटल' आणि पारदर्शक!
9
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
10
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
11
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
12
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
13
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
14
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
15
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
16
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
17
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
18
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
19
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
20
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
Daily Top 2Weekly Top 5

टपऱ्यांना वाढीचा पूर्व भागातील नवा पॅटर्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 02:03 IST

किरकोळ भांडणे वाढली : पालिका प्रशासन आणि राजाश्रयामुळे अनधिकृत पथारीवाल्यांना अभय

माऊली शिंदे कल्याणीनगर : पूर्व पुणे भागामध्ये अनधिकृत पथारीवाल्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या पथारीवाल्यांची जागेवरून दररोज वादावादी आणि किरकोळ भांडणांचे प्रमाण वाढू लागले आहे. या वादावादीमुळे एकप्रकारे गुन्हेगारी वाढू लागली आहे. पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष आणि राजाश्रयामुळे अनधिकृत पथारीवाल्यांना अभय मिळत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.अधिकाधिक नफा मिळविण्यासाठी कार्यकर्ते जास्तीत जास्त पथाºया लावत आहेत. पथारीवाल्यांमध्ये स्पर्धा वाढू लागली आहे. हातगाडी लावण्याआगोदर राजकीय कार्यकर्त्यांचे ना-हरकत प्रमाणपत्र घेण्याचा अलिखित नियम या भागात झाला आहे. व्यवसायातील नफ्यामधून किती हप्ता द्यावा लागणार, हा करारनामा झाल्यांनतर धंदा करू देतात. गरीब, गरजू व्यक्तींना राजाश्रयाशिवाय हातगाडीचा धंदा करता येत नाही.का वाढल्या हातगाड्या?पूर्व पुणे भागामध्ये येरवडा, विश्रांतवाडी, कल्याणीनगर, कोरेगाव पार्क, विमाननगर, वडगावशेरी, खराडी, चंदननगर आणि लोहगाव या भागामध्ये नागरीकरण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या भागात आयटी पार्क आणि सॉफ्टवेअर कंपन्याची संख्या खूप आहे. या आयटीमधील कामगार सिगारेट ओढण्यासाठी आणि खाण्यासाठी रस्त्यावरील हातगाडीवर येतात. कमी भांडवलामध्ये, जागेचे भाडे नाही. यामुळे हातगाडीवाल्यांना अधिक नफा मिळतो. यामुळे आयटी पार्क आणि सॉफ्टवेअर कंपन्यांबाहेरील हातगाड्यांची संख्या वाढली आहे.पथारीचं अर्थकारणयामध्ये परप्रांतीय हातगाड्यांची संख्या सर्वांत जास्त आहे. या परिसरातील दादा, भाई, किंगमेकर, आधारस्तंभ, मार्गदर्शक, माननीय कार्यकर्त्यांना अनधिकृत हातगाडीचा व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन देतात. कार्यकर्ते परप्रांतीय पथारीवाल्यांना रस्त्यावर धंदा करण्यासाठी बसवतात. त्यांच्याकडून दर दिवसाला कमीत कमी दोनशे ते हजार रुपये मिळतात. एका अनधिकृत पथारीच्या मागे कार्यकत्यांना दरमहा वीस ते तीस हजार रुपये मिळतात.असा आहे नवा पॅटर्नअन्यथा, त्याला धमकावण्याचे किंवा इतर त्रास देण्याचे प्रकार होतात. हातगाडीचे नुकसान केले जाते. यामुळे आयटी कंपनीच्या बाहेर आणि मोक्याच्या ठिकाणी रस्त्यावर हातगाडी लावण्यासाठी किरकोळ भांडणे आणि वाद होऊ लागले आहेत. या किरकोळ वादावादीचे रूपांतर कधी तरी गंभीर भांडणामध्ये होते. यामध्ये नाहक एखादा जीव जात आहे. मात्र, तरी या अनधिकृत हातगाड्यांवर कारवाई होत नाही. अतिक्रमण विभागातील अधिकारी ठराविक ठिकाणीच वारंवार कारवाई करतात. कारवाई कधी होणार, याची माहिती हातगाडीवाल्यांना कळते; त्यामुळे दोन ते तीन दिवस हातगाडी लावली जात नाही. अनेकदा रात्रीची हातगाडी लावली जाते. त्यांनतर पुन्हा स्थिती जैसे थे होते.

अतिक्रमणाची कारवाई करण्याना अधिकाºयांना ‘तो माझा कार्यकर्ता आहे. गरिबांवर कारवाई का करता? इतर ठिकाणी कारवाई का करत नाही?’ अशा प्रकारे बोलून किंवा धमकावून राजकीय प्रतिनिधी किंवा माननीयांकडून दबाव आणला जातो. त्यामुळे अतिक्रमण विभागाची कारवाई यशस्वी होत नाही. दर महिना कारवाईचे उदिष्ट पूर्ण करण्यासाठी नाममात्र कारवाई दाखविली जाते. या भागांमध्ये परवानाधारक पथारीवाल्यांपेक्षा अनधिकृत हातगाडीवाल्यांची संख्या जास्त झाली आहे.

टॅग्स :Puneपुणे