शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
6
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
7
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
8
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
11
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
12
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
13
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
14
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
15
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
16
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
17
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
18
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
19
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
20
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

मराठी रंगभूमी दिन :अभिनेत्री भारती गोसावी यांच्याशी विशेष संवाद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2019 17:48 IST

गेली अनेक वर्ष रंगभूमीवर कार्यरत असणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री भारती गोसावी यांना मराठी रंगभूमीदिनानिमित्त जयंतराव टिळक जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यावेळी त्यांच्याशी साधलेला विशेष संवाद. 

पुणे : गेली अनेक वर्ष रंगभूमीवर कार्यरत असणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री भारती गोसावी यांना मराठी रंगभूमीदिनानिमित्त जयंतराव टिळक जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यावेळी त्यांच्याशी नम्रता फडणीस यांनी साधलेला विशेष संवाद. 

आपल्याला जाहीर झालेल्या जयंतराव टिळक जीवनगौरव पुरस्काराविषयी काय वाटते ?पुरस्काराबद्दल अत्यंत आनंदी आहे. जवळपास ६० ते ६५ वर्षे रंगभूमीवर काम करीत आहे. त्याची दखल घेतली गेली, याबाबत निश्चितचं समाधानी आहे. आयुष्यभर केवळ नाटक एके नाटकच केलं. संपूर्ण आयुष्य रंगभूमीसाठी समर्पित केलं. त्याचं कुठं तरी चीज झालं असल्यासारखं वाटत आहे.

रंगभूमीचा प्रवास कसा सुरू झाला?सुरुवातीच्या काळात भानुविलासला पृथ्वी थिएटर आणि बालगंधर्व यांची नाटकं व्हायची. ती आई आणि वडिलांबरोबर पाहायला जायचे. वडिलांच्या पुढाकारानं नाटकात प्रवेश झाला. १९५८मध्ये पहिल्यांदा  ‘संगीत सौभद्र’च्या माध्यमातून रंगभूमीवर पाऊल टाकलं. छोटा गंधर्व, हिराबाई बडोदेकर यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर राज्य नाट्य, कामगार कल्याण व विविध एकांकिकांमध्ये भाग घेतला.

या प्रवासात कामगार मंडळींची कशा प्रकारे साथ लाभली? तो अनुभव कसा होता?माझ्या प्रवासात कामगार मंडळींचे खूप मोलाचे सहकार्य मिळाले. मी जिल्हाधिकारी कार्यालय, मामलेदार, आयकर विभाग, पोलीस खाते, एसआरपी अशा ठिकाणी जाऊन त्यांची नाटकं बसवायचे नि त्यात कामही करायचे. सुरुवातीच्या काळात माझ्यासाठी हेच व्यासपीठ होते. एसआरपीएफमध्ये चार वर्षे जाऊन नाटकं बसवली. एसआरपीएफची गाडी रोज मला घरी तालमीसाठी न्यायला यायची.  मला दोन आॅफिसर गाडी जवळच लावून घ्यायला यायचे. तेव्हा वाड्यातले सगळे लोक आश्चर्याने पाहायचे. गाडीपाशी गर्दी जमायची. हिनं काय केलंय, की पोलीस तिला घेऊन जातात? असं लोकांना वाटायचं. मी फक्त गाडीत बसून मजा बघायचे. नाशिकला सैनिकी प्रशिक्षण केंद्रात प्रयोग केला होता. त्या प्रयोगानंतर सर्वांनी मला ‘सॅल्यूट’ केला.एका कलाकाराला त्यांनी दिलेला सन्मान मी आजही विसरू शकलेले नाही.

आज कलाकारांना खरंच सन्मान मिळतो, असं वाटतं का?आजच्या काळात कलाकारांना पूर्वीसारखा सन्मान मिळत नाही, हे खरं आहे. नवीन पिढी ज्येष्ठ कलाकारांना म्हणावा तसा आदर देत नाही. या ज्येष्ठांनी काय केली असतील कामं; पण आम्ही आता करतोय तेच बरोबर आहे. याचं थोडं वाईट वाटतं.रंगभूमीकडून अनेक कलाकार मालिका नि चित्रपटाकडे वळतात. तुम्हाला हे आकर्षण वाटलं नाही का?नाटकात इतकी व्यस्त होते, की चित्रपटामध्ये जायला वेळच मिळाला नाही. भालजी पेंढारकर, राजा ठाकूर यांच्याकडून चित्रपटासाठी आॅफर आल्या होत्या; पण जावसं वाटल नाही.

टॅग्स :cultureसांस्कृतिकTheatreनाटकmarathiमराठीartकला