शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
4
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
5
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
6
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
7
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
8
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
9
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
10
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
11
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
12
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
13
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
14
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
15
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
16
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
17
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
18
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
19
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
20
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."

कधीही या कधीही जा! ना विचारणा, ना लिखापढी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: कोरोना विषाणूचा विळखा सगळ्या शहराभोवती घट्ट पडत असताना शहराच्या व जिल्ह्याच्याही सगळ्या सीमा मोकळ्याच आहेत. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे: कोरोना विषाणूचा विळखा सगळ्या शहराभोवती घट्ट पडत असताना शहराच्या व जिल्ह्याच्याही सगळ्या सीमा मोकळ्याच आहेत. रेल्वे, बसस्थानकातून रोज हजारो प्रवासी परजिल्ह्यातून शहरात येत असूनही त्यांची तपासणी होताना दिसत नाही किंवा कसली नोंदही केली जात नाही.

कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याची रोजची आकडेवारी सांगत आहे. शहर परिसरात होत असलेल्या स्वॅब तपासणीत कोरोना संसर्गित रूग्णांची संख्या आता २ हजारांवर गेली आहे. मात्र प्रशासनात त्याचे गांभीर्य फक्त चर्चेतच दिसते आहे.

परजिल्ह्यातून आलेल्यांची तपासणी करणे, नोंद ठेवणे, रूग्ण आढळल्यास त्याचे विलगीकरण करणे या साध्या उपाययोजनाही केल्या जात नाहीत.

शहरात पुणे व शिवाजीनगर अशी दोन रेल्वे स्थानके आहेत. पुण्यात स्वारगेट, शिवाजीनगर (वाकडेवाडी) तीन बसस्थानके आहेत. त्याशिवाय पिंपरी चिंचवड मधील रेल्वे व बसस्थानके वेगळी. यापैकी रेल्वे प्रशासानाने केलेली प्राथमिक उपाययोजना वगळता कुठेही कसलीही काळजी घेतली जाताना दिसत नाही.

प्रवासी जातात, येतात, त्यांंना ना कोणी कसली विचारणा करते, ना कसली तपासणी होते. नावनोंदणी वगैरे तर दूरच! त्यासाठी कर्मचारी नाहीत. एसटीचे चालक वाहकच विनामास्क दिसतात. सॅनिटायझर औषधालाही नाही. एसटी आली की प्रवाशांची गर्दी ठरलेलीच. तिथे शिस्त नावालाही नाही. दिवसा ही स्थिती, रात्री तर यापेक्षाही वाईट अवस्था आहे. विशेषतः एसटी स्थानकांमध्ये रात्री कोणाचेही लक्ष नसते. लांबच्या गावांहून येणारे प्रवासी गाडीतून स्थानकात ऊतरून सरळ बाहेरचा रस्ता धरतात.

शहराच्या कात्रज, येरवडा वगैरे उपनगरातील सीमांवरही खासगी गाड्यांची, आतील प्रवाशांची कसलीही तपासणी केली जात नाही. तशी काहीही व्यवस्थाच नाही. पोलिसांकडून नाकाबंदी केली जाते तशी व्यवस्था असण्याची गरज असतानाही सर्व सीमा मोकळ्याच आहेत.

रेल्वे स्थानकात प्राथमिक व

व्यवस्था

रेल्वे स्थानकात प्राथमिक व्यवस्था

रेल्वेने फलाट तिकीट ५० रूपये केले आहे. तसेच प्रवास करणाऱ्याशिवाय इतरांना अगदीच गरज असेल तरच फलाटावर प्रवेश दिला जातो. प्रवाशांना मास्क सक्तीचा केला आहे. तरीही रोजचे २५ हजारांपेक्षा जास्त प्रवासी जाययेत असल्याने त्यांच्या नोंदी वगैरे होत नाहीत, मात्र मास्क नसेल तर रेल्वेचे कर्मचारी त्यांना हटकतात व मास्क घालायला लावतातच.

------

एसटी स्थानकांमध्ये आनंदच

एसटीच्या शहरातील तिन्ही स्थानकांवर आनंदीआनंदच आहे. तिन्ही ठिकाणी रोजची लाखभर प्रवाशांची ये-जा आहे. कसलीही नोंद होत नाही. मास्क अनेकदा नसतोच व असला तरी तो गळ्यात अडकवलेला असतो. सॅनिटायझरचे स्थानकांमधील स्टँड कोरडे पडलेले असतात, तिकडे कोणी फिरकतही नाही.

-----

सीमा मोकळ्याच

जिल्ह्यात व शहरात येणारे सर्व रस्ते दिवसा व रात्रीही मोकळेच असतात. तिथेही खासगी वाहनांची, प्रवाशांची तपासणी वगैरे होत नाही.

------

पुणे शहर व जिल्हा सर्व क्षेत्राचे केंद्र असल्याने रोजचे काही लाख प्रवासी इथे येत असतात. ही संख्या लक्षात घेतल्यास प्रशासनाला मर्यादा येतात. मात्र तरीही रेल्वे, एसटी पोलिस यांना सूचना केलेल्या आहेत. शंका आल्यास त्यांच्याकडून त्वरीत दखल घेतली जातेच. आता अधिक काळजी घेण्यास सांगितले आहे.

राजेश देशमुख- जिल्हाधिकारी, पुणे.