शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

बालसाहित्याकडे गांभीर्याने पाहाण्याची गरज : डॉ. सदानंद मोरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2019 19:08 IST

बालसाहित्य हा एक अवघड लेखन प्रकार

ठळक मुद्देबालसाहित्यिकार स्वाती राजे लिखित ‘अंधाराचं गाव’,‘पूल’ आणि ‘शोध’ या कथांच्या पुस्तकांचे प्रकाशन

पुणे : बालसाहित्य लिहिणारे फार कमी लेखक आहेत. कारण बालसाहित्य हा एक अवघड लेखन प्रकार आहे. लहान मुलांसाठी लिहिताना काल्पनिकतेबरोबरच वास्तवाचे देखील भान असावे लागते. बालसाहित्याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असून, आपणही लहान होतो. हा विचार प्रत्येकाने केला पाहिजे, असे मत राज्याच्या साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष आणि संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.रोहन प्रकाशनातर्फे आयोजित कार्यक्रमात बालसाहित्यिकार स्वाती राजे लिखित ‘अंधाराचं गाव’,‘पूल’ आणि ‘शोध’ या कथांच्या पुस्तकांचे प्रकाशन डॉ. मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी  स्वाती राजे, चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी, ‘किशोर’ नियतकालिकाचे संपादक किरण केंद्रे, छात्र प्रबोधनचे महेंद्र सेठिया, रोहन प्रकाशनचे प्रदीप चंपानेरकर आणि रोहन चंपानेरकर आदी मान्यवर उपस्थित होते.डॉ.  मोरे म्हणाले, बालसाहित्याला स्वाती राजे यांनी नेहमी केंद्र्रस्थानावर ठेवले आहे. त्यांनी सहज आणि सोप्या पद्धतीत बालसाहित्याचे लेखन केले आहे. आपण सगळ्यांनीच बालसाहित्य आणि भाषा धोरणाकडे गांभिर्याने पाहण्याची गरज आहे.  किरण केंद्रे्रे  यांनी बालवयातच मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्याची गरज आहे. बालसाहित्यात सातत्याने प्रयोग व्हायला हवेत. लेखक कितीही मोठा असला तरी त्याने मुलांसाठी लिहिताना नेहमी बालवयात शिरूनच लेखन केल पाहिजे, असे सांगितले.स्वाती राजे म्हणाल्या, जगभरात भटकंती करत असताना जे साहित्य दिसले ते आपल्याकडे का नाही, याची सातत्याने खंत वाटते. आपल्या समाजातून बालसाहित्यकार म्हणून एक पिढी पुढे आली का? असा प्रश्नही पडतो. बालसाहित्याचा फारसा गांभीर्याने अभ्यास झालेला नाही. याविषयी केवळ खंत व्यक्त न करता नवे प्रयोग बालसाहित्यात आणण्याचा प्रयत्न मी करते आहे. यावेळी स्वाती राजे यांनी आपल्या ‘पूल’ या पुस्तकाचे वाचन केले.छायाचित्र ओळी - बालसाहित्यिका स्वाती राजे लिखित पुस्तकांच्या प्रकाशनाप्रसंगी डॉ. सदानंग मोरे, (डावीकडून) चंद्रमोहन कुलकर्णी, रोहन चंपानेरकर, किरण केंद्रे, डॉ. मोरे, महेंद्र सेठिया, स्वाती राजे आणि राजेश भावसार. 

टॅग्स :PuneपुणेSadanand Moreसदानंद मोरेliteratureसाहित्य