शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

घाट रस्त्यांचे सर्वेक्षण होण्याची गरज

By admin | Updated: July 29, 2015 00:13 IST

घाट रस्त्यावरून जाणा-या जड वाहनांमुळे रस्त्या लगतच्या दरडी कंपन पावतात. त्याच प्रमाणे काही वर्षांनंतर या दरडींना उन आणि पाऊसामुळे भेगा पडतात. तसेच खडकांमधील ‘जॉईट’

पुणे : घाट रस्त्यावरून जाणा-या जड वाहनांमुळे रस्त्या लगतच्या दरडी कंपन पावतात. त्याच प्रमाणे काही वर्षांनंतर या दरडींना उन आणि पाऊसामुळे भेगा पडतात. तसेच खडकांमधील ‘जॉईट’ कालांतराने वेगळे होत जातात होत जातात. त्यामुळे राज्यातील सर्वच घाट रस्त्याचे सर्वेक्षण केले आणि त्याचा सखोल अभ्यास करून त्यावरील उपाययोजना केल्या तर दरड कोसळून होणारे अपघात टाळता येतील,या संदर्भातील अहवाल भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागातर्फे (जीएसआय)राज्य शासनाला सादर केला जाणार आहे. पुणे मुंबई महामार्गावर आडोशी बोगद्या जवळ दरड कोसळून झालेल्या अपघाताची पाहणी जीएसआयचे भुस्खलन विभागाचे संचालक डॉ. मकरंद बोडसे केली होती. कोणत्या कारणामुळे दरड कोसळली, या पुढील काळात अशा दरडी कोसळू नये म्हणून कोणती काळजी घ्यावी याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले. महामार्गावरील काही भागात दरड कोसळण्याची शक्यता आल्याने सध्या त्यादृष्टीने डागडुजीचे काम केले जात आहे. रस्त्यावर दरड कोसळू नये,यासाठी शासनाने कोणत्या उपाय योजना कराव्यात याबाबत बोडसे यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.केवळ आडोशी बोगद्या जवळ झालेल्या अपघाताकडे पाहून चालणार नाही. तर राज्यातील सर्वच रस्त्यांचा या निमित्ताने विचार झाला पाहिजे, असे नमूद करून बोडसे म्हणाले, घाट रस्त्यांवर दरडी कोसळू नये म्हणूनच तेथे जाळ्या बसविल्या जातात. परंतु, रस्त्यालगत बसविलेल्या जाणा-या जाळ्यांची डिझाईन, त्यांची क्षमता यांचाही करायला हवा. जड वाहनांमुळे सतत कंपन बसून दरडींमधील भेगा वाढत जातात. त्यात पावसाचे पाणी गेल्याने मातीचा आणि दगडाचा ढीगारा रस्त्यावर कोसळतो. जाळ्या मातीचा किती टन बोजा सांभाळू शकतात, त्या किती वर्षांनी बदलणे अपेक्षित आहे, याची तपासणी व्हायला हवी. (प्रतिनिधी)