शहरं
Join us  
Trending Stories
1
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
2
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
4
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
5
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
6
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
7
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
8
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
9
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
10
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
11
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
12
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
13
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
14
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
15
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
16
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
17
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
18
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
20
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष

अवकाश मोहिमांसाठी कुशल मनुष्यबळाची गरज- कस्तुरीरंगन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 03:06 IST

अवकाश विज्ञान परिषदेचे उद्घाटन

पुणे : पायभूत सुविधा आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टीनेही भारत प्रगती करत आहे; मात्र भविष्यातील आव्हाने पेलण्यासाठी सक्षम मनुष्यबळाची सध्या नितांत गरज आहे. त्यासाठी देशातील विद्यापीठांमध्ये भरीव कार्य करण्याची आवश्यकता आहे. विद्यापीठांनी संशोधन संस्थांशी करार करून संशोधन संस्कृती निर्माण करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्रो) माजी अध्यक्ष व वरिष्ठ सल्लागार डॉ. के. कस्तुरीरंगन यांनी मंगळवारी केले.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये आयोजित ‘अवकाश विज्ञान’ (स्पेस सायन्सेस) या विषयातील तीनदिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी इस्रोचे अध्यक्ष डॉ. के. सिवन, वैज्ञानिक सल्लागार डॉ. जॉर्ज जोसेफ, उपग्रह कार्यक्रमाचे संचालक डॉ. शिवकुमार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, ‘आयुका’चे संचालक डॉ. सौमेक रॉयचौधरी, ‘नॅशनल सेंटर फॉर रेडिओ अस्ट्रोफिजिक्स’चे संचालक डॉ. यशवंत गुप्ता, स्थानिक समन्वयक डॉ. पी. प्रदीप कुमार आदी उपस्थित होते. डॉ. कस्तुरीरंगन म्हणाले की, अवकाश संशोधनाच्या क्षेत्रात भारत झपाट्याने प्रगती करत आहे. पायाभूत सुविधा देशात उपलब्ध आहेत. सध्या विविध महत्त्वाचे मिशन हाती घेण्यात आले आहेत आणि ती कमी वेळात पूर्ण करण्याचे आव्हान आहे. पूर्वी एखाद्या मिशनचे पाच-पाच वर्षांचे नियोजन असायचे, ते आता केवळ दोन-तीन वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट घेतले जाते. त्यासाठी आता विद्यापीठांना मोठ्या प्रमाणात जोडून घ्यावे लागेल. या प्रकारच्या गुंतवणुकीत पुरेशी वाढ करण्याची गरज आहे.डॉ. सिवन यांनीही कुशल मनुष्यबळाची गरज अधोरेखित केली. ते म्हणाले की, भारताचा २०२५ पर्यंतचा काळ महत्त्वाच्या अवकाश मोहिमांचा असणार आहे. चांद्रयान मोहिमेबरोबरच सूर्यवलयाचा अभ्यास करणारे ‘आदित्य मिशन’, मंगळयान-२, २०२३ साली शुक्र ग्रहाबाबत ‘व्हीनस मिशन’, सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाच्या वातावरणाचा संशोधन करणारे ‘गगनयान’, एटमॉस्फेरित सायन्सेसच्या (वातावरणीय शास्त्र) अनुशंगाने ‘दिशा १’ व ‘दिशा २’ अशा विविध मोहिमा नियोजित आहेत. त्यासाठी कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी आतापासून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करण्याची गरज आहे.सहा ‘स्पेस-टेक्नॉलॉजी इनक्युबेशन’ केंद्रदेशभरातील विद्यापीठे व महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यात ‘इस्रो’कडून सहा ‘स्पेस-टेक्नॉलॉजी इनक्युबेशन’ केंद्रांचे नियोजन करण्यात आले आहे. त्याद्वारे अवकाश विज्ञानात संशोधन करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना भक्कम पाठबळ व मार्गदर्शन दिले जाईल. आगरतळा येथील नॅशनल इन्स्टिट्युट आॅफ टेक्नॉलॉजी आणि जालंधर येथे प्रत्येकी एक केंद्र निश्चित करण्यात आले आहे. उर्वरित केंद्रही लवकरच सुरू केली जातील, असे डॉ. सिवन यांनी सांगितले.

टॅग्स :isroइस्रोtechnologyतंत्रज्ञान