शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

समन्वय, संवादाची भूमिका घेणे आवश्यक - संतोष पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 02:51 IST

भारतीय राज्यघटनेला मानून काम करणारी ही चळवळ आहे. व्यवस्थेतील उणिवांवर बोट ठेवणे आणि चुकीच्या गोष्टींना विरोध करण्याचा प्रत्येकाला हक्क आहे. मात्र, आजकाल असहिष्णुता वाढली असून, अभिव्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी केली जात आहे.

भारतीय राज्यघटनेला मानून काम करणारी ही चळवळ आहे. व्यवस्थेतील उणिवांवर बोट ठेवणे आणि चुकीच्या गोष्टींना विरोध करण्याचा प्रत्येकाला हक्क आहे. मात्र, आजकाल असहिष्णुता वाढली असून, अभिव्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी केली जात आहे. अशा वेळी लेखक, कवींनी आपल्या लिखाणातून वास्तव चित्रण करण्याचे धाडस दाखवले पाहिजे. समाजात समानता रुजवायची असेल तर धार्मिक, जातीय तेढ बाजूला ठेवून प्रत्येकाने समन्वयाची, संवादाची भूमिका घेणे आवश्यक आहे, असे मत कवी आणि युवा विद्रोही संमेलनाचे अध्यक्ष संतोष पवार यांनी व्यक्त केले.विद्रोह अर्थात नकार. समाजातील विशिष्ट जातीला, घटकाला दुय्यम वागणूक मिळू नये, सर्व स्तरांतील साहित्याचे स्वागत व्हावे, अशी संकल्पना त्यामागे होती. फुले, शाहू, आंबेडकर चळवळीचे विचार मानणाºया परिवर्तनवादी कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन विद्रोही चळवळीची सुरुवात केली. १९९९मध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मुंबईला भरलेले असताना धारावी येथे पहिले विद्रोही साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते.बाबूराव बागुल या संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यानंतर २० विविध गटांनी मिळून अनेक ठिकाणी संमेलने आयोजित केली. फुले, शाहू, आंबेडकर चळवळ मानणारे, डाव्या विचारसरणीचे, कम्युनिस्ट असे सर्व कार्यकर्ते त्या वेळी एकत्र होते. कालांतराने काही कारणाने विद्रोही चळवळीमध्येही गट पडले. पण, चळवळीचा गाभा कायम राहिला आहे.मी पहिल्या विद्रोही साहित्य संमेलनाला हजेरी लावली. तेव्हा खूप लहान होतो. त्यानंतर चळवळीचा सखोल अभ्यास करू लागलो. कविता लिहीत राहिलो आणि विद्रोही विचारधारेशी समरस झालो. आजवरच्या प्रत्येक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला वादाची पार्श्वभूमी लाभलेली आहे. साहित्यामध्ये अभिजन, बहुजन अशी वर्गवारी होणे चुकीचे आहे. विचारांमध्ये पारदर्शकता असली पाहिजे. आजकाल देशात धार्मिक भावना तीव्र झाल्या आहेत. टोकाला जाऊन हिंसेचा पुरस्कार होऊ लागला आहे. आपल्या अधिकारांसाठी विविध जातींचे मोर्चे निघत आहेत. समाजात समानता रुजवायची असेल तर कोणत्याही विशिष्ट जाती, धर्माचा द्वेष करणे चुकीचे आहे. समाज एकत्रित राहिला पाहिजे, हीच विद्रोही साहित्य चळवळीची कायम भूमिका राहिली आहे. धार्मिक, जातीय तेढ बाजूला ठेवून प्रत्येकाने समन्वयाची, संवादाची भूमिका घेणे आवश्यक आहे. समानतेची चळवळ रुजवताना व्यवस्थेला प्रश्न विचारण्याचे कामही विद्रोही चळवळीने केले आहे. समाजातील सर्व स्तरांमध्ये संवादाची भूमिका कायम राहावी, कोणालाही दुय्यम वागणूक मिळू नये, यासाठीच आजवर प्रयत्न झाले आणि यापुढेही होत राहतील.भारतीय राज्यघटनेला मानून काम करणारी ही चळवळ आहे. व्यवस्थेतील उणिवांवर बोट ठेवणे आणि चुकीच्या गोष्टींना विरोध करण्याचा प्रत्येकाला हक्क आहे. मात्र, आजकाल असहिष्णुता वाढली असून, अभिव्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी केली जात आहे. समाजात पूर्वीपासून कमी-अधिक प्रमाणात असहिष्णुता होतीच; मात्र, सत्तेचे बळ मिळाल्यापासून असहिष्णुतेची तीव्रता वाढली आहे. लेखक, कवींना लिखाणापासून परावृत्त केले जात आहे. सरकारच्या विरोधात लिहिण्यावर बंधने आणली जात आहेत. समाजहिताचा विचार करणाºया, त्यासाठी झटणा-या विचारवंतांच्या हत्या करण्यात आल्या. सत्तेचे केंद्रीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशा वेळी लेखक, कवींनी आपल्या लिखाणातून वास्तव चित्रण करण्याचे धाडस दाखवले पाहिजे. समाजातील घटनांचे प्रतिबिंब त्यांच्या साहित्यकृतीतून उतरले पाहिजे.शासनाच्या चुकीच्या धोरणांचा सजग नागरिकांकडून निषेध केला जाईल, यात शंकाच नाही. कलावंतांचा सहृदयतेने विचार केला जाणे आवश्यक आहे. भ्रमिष्टाचा जाहीरनामा, पिढीपेस्तर प्यादेमात आदी कवितांमधून मी मूलतत्त्ववाद्यांच्या विरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. सध्या ग्रामीण भागातून अनेक कवी पुढे येत आहेत, ही सकारात्मक बाब आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांचा अभ्यास करणारे नवीन लेखक, कवी निर्माण झाल्यास चळवळीला आणखी बळकटी मिळेल, यात शंका नाही.

टॅग्स :Puneपुणे