शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

समन्वय, संवादाची भूमिका घेणे आवश्यक - संतोष पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 02:51 IST

भारतीय राज्यघटनेला मानून काम करणारी ही चळवळ आहे. व्यवस्थेतील उणिवांवर बोट ठेवणे आणि चुकीच्या गोष्टींना विरोध करण्याचा प्रत्येकाला हक्क आहे. मात्र, आजकाल असहिष्णुता वाढली असून, अभिव्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी केली जात आहे.

भारतीय राज्यघटनेला मानून काम करणारी ही चळवळ आहे. व्यवस्थेतील उणिवांवर बोट ठेवणे आणि चुकीच्या गोष्टींना विरोध करण्याचा प्रत्येकाला हक्क आहे. मात्र, आजकाल असहिष्णुता वाढली असून, अभिव्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी केली जात आहे. अशा वेळी लेखक, कवींनी आपल्या लिखाणातून वास्तव चित्रण करण्याचे धाडस दाखवले पाहिजे. समाजात समानता रुजवायची असेल तर धार्मिक, जातीय तेढ बाजूला ठेवून प्रत्येकाने समन्वयाची, संवादाची भूमिका घेणे आवश्यक आहे, असे मत कवी आणि युवा विद्रोही संमेलनाचे अध्यक्ष संतोष पवार यांनी व्यक्त केले.विद्रोह अर्थात नकार. समाजातील विशिष्ट जातीला, घटकाला दुय्यम वागणूक मिळू नये, सर्व स्तरांतील साहित्याचे स्वागत व्हावे, अशी संकल्पना त्यामागे होती. फुले, शाहू, आंबेडकर चळवळीचे विचार मानणाºया परिवर्तनवादी कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन विद्रोही चळवळीची सुरुवात केली. १९९९मध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मुंबईला भरलेले असताना धारावी येथे पहिले विद्रोही साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते.बाबूराव बागुल या संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यानंतर २० विविध गटांनी मिळून अनेक ठिकाणी संमेलने आयोजित केली. फुले, शाहू, आंबेडकर चळवळ मानणारे, डाव्या विचारसरणीचे, कम्युनिस्ट असे सर्व कार्यकर्ते त्या वेळी एकत्र होते. कालांतराने काही कारणाने विद्रोही चळवळीमध्येही गट पडले. पण, चळवळीचा गाभा कायम राहिला आहे.मी पहिल्या विद्रोही साहित्य संमेलनाला हजेरी लावली. तेव्हा खूप लहान होतो. त्यानंतर चळवळीचा सखोल अभ्यास करू लागलो. कविता लिहीत राहिलो आणि विद्रोही विचारधारेशी समरस झालो. आजवरच्या प्रत्येक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला वादाची पार्श्वभूमी लाभलेली आहे. साहित्यामध्ये अभिजन, बहुजन अशी वर्गवारी होणे चुकीचे आहे. विचारांमध्ये पारदर्शकता असली पाहिजे. आजकाल देशात धार्मिक भावना तीव्र झाल्या आहेत. टोकाला जाऊन हिंसेचा पुरस्कार होऊ लागला आहे. आपल्या अधिकारांसाठी विविध जातींचे मोर्चे निघत आहेत. समाजात समानता रुजवायची असेल तर कोणत्याही विशिष्ट जाती, धर्माचा द्वेष करणे चुकीचे आहे. समाज एकत्रित राहिला पाहिजे, हीच विद्रोही साहित्य चळवळीची कायम भूमिका राहिली आहे. धार्मिक, जातीय तेढ बाजूला ठेवून प्रत्येकाने समन्वयाची, संवादाची भूमिका घेणे आवश्यक आहे. समानतेची चळवळ रुजवताना व्यवस्थेला प्रश्न विचारण्याचे कामही विद्रोही चळवळीने केले आहे. समाजातील सर्व स्तरांमध्ये संवादाची भूमिका कायम राहावी, कोणालाही दुय्यम वागणूक मिळू नये, यासाठीच आजवर प्रयत्न झाले आणि यापुढेही होत राहतील.भारतीय राज्यघटनेला मानून काम करणारी ही चळवळ आहे. व्यवस्थेतील उणिवांवर बोट ठेवणे आणि चुकीच्या गोष्टींना विरोध करण्याचा प्रत्येकाला हक्क आहे. मात्र, आजकाल असहिष्णुता वाढली असून, अभिव्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी केली जात आहे. समाजात पूर्वीपासून कमी-अधिक प्रमाणात असहिष्णुता होतीच; मात्र, सत्तेचे बळ मिळाल्यापासून असहिष्णुतेची तीव्रता वाढली आहे. लेखक, कवींना लिखाणापासून परावृत्त केले जात आहे. सरकारच्या विरोधात लिहिण्यावर बंधने आणली जात आहेत. समाजहिताचा विचार करणाºया, त्यासाठी झटणा-या विचारवंतांच्या हत्या करण्यात आल्या. सत्तेचे केंद्रीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशा वेळी लेखक, कवींनी आपल्या लिखाणातून वास्तव चित्रण करण्याचे धाडस दाखवले पाहिजे. समाजातील घटनांचे प्रतिबिंब त्यांच्या साहित्यकृतीतून उतरले पाहिजे.शासनाच्या चुकीच्या धोरणांचा सजग नागरिकांकडून निषेध केला जाईल, यात शंकाच नाही. कलावंतांचा सहृदयतेने विचार केला जाणे आवश्यक आहे. भ्रमिष्टाचा जाहीरनामा, पिढीपेस्तर प्यादेमात आदी कवितांमधून मी मूलतत्त्ववाद्यांच्या विरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. सध्या ग्रामीण भागातून अनेक कवी पुढे येत आहेत, ही सकारात्मक बाब आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांचा अभ्यास करणारे नवीन लेखक, कवी निर्माण झाल्यास चळवळीला आणखी बळकटी मिळेल, यात शंका नाही.

टॅग्स :Puneपुणे