शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

समाजधर्म स्थापण्याची आवश्यकता

By admin | Updated: January 21, 2016 00:57 IST

ज्ञानग्रंथ जाळले तर ज्ञान संपेल, या भावनेने आक्रमणे झाली, धर्मग्रंथ जाळले गेले, मंदिरे भ्रष्ट केली गेली. पण मंदिरांची पुन्हा उभारणी झाली.

पुणे : ज्ञानग्रंथ जाळले तर ज्ञान संपेल, या भावनेने आक्रमणे झाली, धर्मग्रंथ जाळले गेले, मंदिरे भ्रष्ट केली गेली. पण मंदिरांची पुन्हा उभारणी झाली. खरेतर ज्ञान अंतरमनात, हृदयात असते ग्रंथात नाही. ज्यांनी ग्रंथ जाळले, त्यांना समलेले नाही. ही ज्ञानाची गंगा हजारो वर्षे प्रवाहित राहिलेली आहे. देश, संस्कृती, मूल्य, नैतिकता टिकविण्याची जबाबदारी तुमची, आमची आहे. संकुचित भावनेने जाती, भाषांवरुन सुरू असलेली भांडणे दूर सारुन समाजधर्म स्थापित करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी केले. पुरोहितांच्या सर्वांगिण विकासासाठी कार्यरत असलेल्या सद्गुरू ग्रुपतर्फे सर्व वेदातील विशेष गुणवत्ताप्राप्त घनपाठी वैदिक आणि उच्च विद्या प्रवीण असणाऱ्या वैदिकांचा बुधवारी सत्कार करण्यात आला. बालगंधर्व रंगमंदिर येथे झालेल्या राज्यस्तरीय गौरव सोहळ्यात जोशी बोलत होते. जोशी आणि विश्वशांती केंद्र आळंदी माईस पुणेचे अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांच्या हस्ते करण्यात आला. त्या वेळी जोशी बोलत होते. मुंबई येथील सिद्धीविनायक गणपती मंदिर न्यासाचे अध्यक्ष नरेंद्र मुरारी राणे यांच्या हस्ते संकेतस्थळाचा शुभारंभ करण्यात आला. ग्रुपचे अध्यक्ष यशवंत कुलकर्णी, दिवाकर गोरे, अपर्णा पाटील, मंदार शहरकर, प्रकाश दंडगे, अतुलशास्त्री भगरे व्यासपीठावर होते.जोशी म्हणाले, ज्ञानाचा प्रचार प्रसार करणारे पुष्कळ असतील पण तेवढे पुरेसे नाही. विचारांचे आचरण करणारे श्रेष्ठ असतात. ज्यांचा सत्कार करण्यात आला ते आचरण करणाऱ्यांचे प्रतिक आहेत. वेदांना हजारो वर्षांची परंपरा आहे. ही ज्ञानगंगा प्रवाहित होत आली आहे. अनेक आक्रमणे झाली तरी ती नष्ट झालेली नाही. आक्रमणांनंतरही देश उभा आहे. देशाने जगाच्या कल्याणाचाच विचार केला आहे. परंपरा काय आहे हे समजून घ्यावे.प्रा. कराड म्हणाले, जात, पात, धर्माच्या नावाखाली सुरू असलेला विद्धंस थांबविला पाहिजे. जगाला सुखाचा, शांततेचा संदेश देणारा आपला देश आहे. २१वे शतक भारताचे असेल असे बोलले जाते नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान होणे हे त्याचेच संकेत आहेत, असे वाटते. मंदार परळीकर यांनी परिचय करुन दिला. वैदेही शेटे यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)