शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

समाजधर्म स्थापण्याची आवश्यकता

By admin | Updated: January 21, 2016 00:57 IST

ज्ञानग्रंथ जाळले तर ज्ञान संपेल, या भावनेने आक्रमणे झाली, धर्मग्रंथ जाळले गेले, मंदिरे भ्रष्ट केली गेली. पण मंदिरांची पुन्हा उभारणी झाली.

पुणे : ज्ञानग्रंथ जाळले तर ज्ञान संपेल, या भावनेने आक्रमणे झाली, धर्मग्रंथ जाळले गेले, मंदिरे भ्रष्ट केली गेली. पण मंदिरांची पुन्हा उभारणी झाली. खरेतर ज्ञान अंतरमनात, हृदयात असते ग्रंथात नाही. ज्यांनी ग्रंथ जाळले, त्यांना समलेले नाही. ही ज्ञानाची गंगा हजारो वर्षे प्रवाहित राहिलेली आहे. देश, संस्कृती, मूल्य, नैतिकता टिकविण्याची जबाबदारी तुमची, आमची आहे. संकुचित भावनेने जाती, भाषांवरुन सुरू असलेली भांडणे दूर सारुन समाजधर्म स्थापित करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी केले. पुरोहितांच्या सर्वांगिण विकासासाठी कार्यरत असलेल्या सद्गुरू ग्रुपतर्फे सर्व वेदातील विशेष गुणवत्ताप्राप्त घनपाठी वैदिक आणि उच्च विद्या प्रवीण असणाऱ्या वैदिकांचा बुधवारी सत्कार करण्यात आला. बालगंधर्व रंगमंदिर येथे झालेल्या राज्यस्तरीय गौरव सोहळ्यात जोशी बोलत होते. जोशी आणि विश्वशांती केंद्र आळंदी माईस पुणेचे अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांच्या हस्ते करण्यात आला. त्या वेळी जोशी बोलत होते. मुंबई येथील सिद्धीविनायक गणपती मंदिर न्यासाचे अध्यक्ष नरेंद्र मुरारी राणे यांच्या हस्ते संकेतस्थळाचा शुभारंभ करण्यात आला. ग्रुपचे अध्यक्ष यशवंत कुलकर्णी, दिवाकर गोरे, अपर्णा पाटील, मंदार शहरकर, प्रकाश दंडगे, अतुलशास्त्री भगरे व्यासपीठावर होते.जोशी म्हणाले, ज्ञानाचा प्रचार प्रसार करणारे पुष्कळ असतील पण तेवढे पुरेसे नाही. विचारांचे आचरण करणारे श्रेष्ठ असतात. ज्यांचा सत्कार करण्यात आला ते आचरण करणाऱ्यांचे प्रतिक आहेत. वेदांना हजारो वर्षांची परंपरा आहे. ही ज्ञानगंगा प्रवाहित होत आली आहे. अनेक आक्रमणे झाली तरी ती नष्ट झालेली नाही. आक्रमणांनंतरही देश उभा आहे. देशाने जगाच्या कल्याणाचाच विचार केला आहे. परंपरा काय आहे हे समजून घ्यावे.प्रा. कराड म्हणाले, जात, पात, धर्माच्या नावाखाली सुरू असलेला विद्धंस थांबविला पाहिजे. जगाला सुखाचा, शांततेचा संदेश देणारा आपला देश आहे. २१वे शतक भारताचे असेल असे बोलले जाते नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान होणे हे त्याचेच संकेत आहेत, असे वाटते. मंदार परळीकर यांनी परिचय करुन दिला. वैदेही शेटे यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)