शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

समाजधर्म स्थापण्याची आवश्यकता

By admin | Updated: January 21, 2016 00:57 IST

ज्ञानग्रंथ जाळले तर ज्ञान संपेल, या भावनेने आक्रमणे झाली, धर्मग्रंथ जाळले गेले, मंदिरे भ्रष्ट केली गेली. पण मंदिरांची पुन्हा उभारणी झाली.

पुणे : ज्ञानग्रंथ जाळले तर ज्ञान संपेल, या भावनेने आक्रमणे झाली, धर्मग्रंथ जाळले गेले, मंदिरे भ्रष्ट केली गेली. पण मंदिरांची पुन्हा उभारणी झाली. खरेतर ज्ञान अंतरमनात, हृदयात असते ग्रंथात नाही. ज्यांनी ग्रंथ जाळले, त्यांना समलेले नाही. ही ज्ञानाची गंगा हजारो वर्षे प्रवाहित राहिलेली आहे. देश, संस्कृती, मूल्य, नैतिकता टिकविण्याची जबाबदारी तुमची, आमची आहे. संकुचित भावनेने जाती, भाषांवरुन सुरू असलेली भांडणे दूर सारुन समाजधर्म स्थापित करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी केले. पुरोहितांच्या सर्वांगिण विकासासाठी कार्यरत असलेल्या सद्गुरू ग्रुपतर्फे सर्व वेदातील विशेष गुणवत्ताप्राप्त घनपाठी वैदिक आणि उच्च विद्या प्रवीण असणाऱ्या वैदिकांचा बुधवारी सत्कार करण्यात आला. बालगंधर्व रंगमंदिर येथे झालेल्या राज्यस्तरीय गौरव सोहळ्यात जोशी बोलत होते. जोशी आणि विश्वशांती केंद्र आळंदी माईस पुणेचे अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांच्या हस्ते करण्यात आला. त्या वेळी जोशी बोलत होते. मुंबई येथील सिद्धीविनायक गणपती मंदिर न्यासाचे अध्यक्ष नरेंद्र मुरारी राणे यांच्या हस्ते संकेतस्थळाचा शुभारंभ करण्यात आला. ग्रुपचे अध्यक्ष यशवंत कुलकर्णी, दिवाकर गोरे, अपर्णा पाटील, मंदार शहरकर, प्रकाश दंडगे, अतुलशास्त्री भगरे व्यासपीठावर होते.जोशी म्हणाले, ज्ञानाचा प्रचार प्रसार करणारे पुष्कळ असतील पण तेवढे पुरेसे नाही. विचारांचे आचरण करणारे श्रेष्ठ असतात. ज्यांचा सत्कार करण्यात आला ते आचरण करणाऱ्यांचे प्रतिक आहेत. वेदांना हजारो वर्षांची परंपरा आहे. ही ज्ञानगंगा प्रवाहित होत आली आहे. अनेक आक्रमणे झाली तरी ती नष्ट झालेली नाही. आक्रमणांनंतरही देश उभा आहे. देशाने जगाच्या कल्याणाचाच विचार केला आहे. परंपरा काय आहे हे समजून घ्यावे.प्रा. कराड म्हणाले, जात, पात, धर्माच्या नावाखाली सुरू असलेला विद्धंस थांबविला पाहिजे. जगाला सुखाचा, शांततेचा संदेश देणारा आपला देश आहे. २१वे शतक भारताचे असेल असे बोलले जाते नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान होणे हे त्याचेच संकेत आहेत, असे वाटते. मंदार परळीकर यांनी परिचय करुन दिला. वैदेही शेटे यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)