शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

संशोधनावर भर देण्याची गरज

By admin | Updated: April 10, 2017 01:37 IST

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने देशातील उच्च शिक्षण देणारी सर्व विद्यापीठे व महाविद्यालयांचे मूल्यांकन करून

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने देशातील उच्च शिक्षण देणारी सर्व विद्यापीठे व महाविद्यालयांचे मूल्यांकन करून मानांकन दिले. त्यात अभिमत विद्यापीठामध्ये राज्यात प्रथम क्रमांक मिळाला. शिक्षण, संशोधन, नोकरीची संधी, सर्वसमावेशकता, लोकांचे मत या निकषांच्या आधारे हे मानांकन मिळाले. विद्यापीठांनी संशोधनावर भर देण्याची गरज आहे, असे पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

डॉ. पी. डी. पाटील म्हणाले, ‘‘केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने देशातील उच्च शिक्षण देणारी सर्व विद्यापीठे व महाविद्यालयांचे मूल्यांकन करून त्यांना मानांकन दिले. नॅशनल इन्स्टिट्यूट रँकिंग फ्रेमवर्क (एनआयआरएफ) या संस्थेच्या वतीने हे मूल्यांकन केले. त्यात शिक्षण पायाभूत सुविधा, शिक्षणप्रणाली, शिक्षणक्षेत्रात असणारे योगदान, संशोधनातील उत्कृष्ट कामगिरीमुळे देशातील गुणवत्ताधारक अभिमत विद्यापीठांच्या यादीमध्ये पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठास राज्यात पहिला क्रमांक मिळाला. ही आनंददायी बाब आहे. गेल्या ३५ वर्षांत विद्यापीठाच्या माध्यमातून केलेल्या तपश्चर्येचे हे फळ आहे. भारताचे दिवंगत राष्ट्रपती मिसाईलमॅन डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी ‘युवक हीच राष्ट्राची प्रमुख शक्ती आहे आणि त्या माध्यमातून आपण महासत्ता बनू शकतो’ असा आशावाद तरुणाईच्या डोळ्यांत पाहिला. याच उद्देशाने शिक्षणातून समाज घडविण्याचे कार्य केले जात आहे. ‘ज्ञानाच्या माध्यमातून सबलीकरण’ हे ध्येय ठेवून ते साध्य करण्यासाठी यशस्वी वाटचाल सुरू आहे. आमच्या अथक प्रयत्नांमुळे हे विद्यापीठ केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर भारतातील नावाजलेले शैक्षणिक केंद्र म्हणून प्रसिद्ध पावले आहे. गुणात्मक शिक्षणासाठी प्रयत्न केले जात आहेत. एनआयआरएफ संस्थेच्या वतीने शिक्षण (टीचिंग-लर्निंग), संशोधन (रीसर्च), शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना मिळणारी नोकरीची संधी (गॅ्रज्युएट आउटकम), सर्वसमावेशकता (आउटरिच इनक्लिब्लिटी), लोकांचे मत (परसेप्शन) या निकषांच्या आधारे विद्यापीठांचे मूल्यांकन करून मानांकन दिले आहे. मेडिकल, डेंटल, फिजिओथेरपी, नर्सिंग, बायोटेक्नॉलॉजी, आॅप्टोमेट्री अशा एकूण सात शाखा आहेत. विद्यापीठाच्या विविध विभागांमध्ये ुसुमारे चार हजार विद्यार्थी शिक्षण घेत असून, आजवर ८३५ विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या विषयांवर संशोधन प्रकल्प पूर्ण केले आहेत. देशातील विविध भागांतील मुले पीएचडीही करीत आहेत. संशोधनाची गुणवत्ता तपासण्यासाठी इतरांनी त्या संशोधनाचा किती वेळा आधार घेतला, याची तपासणी एनआयआरएफ संस्थेकडून करण्यात आली. संशोधनाचा दर्जा तपासण्यासाठी त्या संशोधनाचा देशातील व परदेशातील संशोधकांनी आधार घेतला का, याचा आढावा एनआयआरएफने घेतला. तसेच विद्यापीठातील संशोधन चांगल्या पद्धतीने व्हावे, यासाठी विद्यापीठाकडून विविध पातळ्यांवर प्रयत्न करण्यात आले, याचेही परीक्षण केले. गुणात्मक शिक्षण देण्याबरोबरच संशोधन अधिक प्रमाणावर व्हावे, यासाठी प्रयत्न केले जात आहेत.गेल्या तीन-चार वर्षांत आंतरराष्ट्रीय पातळीवर संशोधनाचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. वैैद्यकीय क्षेत्रात आधुनिक शिक्षणासाठी आम्ही आग्रही आहोत. आपल्याकडे सुपरस्पेशालिटी डॉक्टरांची कमतरता आहे. विविध विषयांतील सुपरस्पेशालिटी डॉक्टर तयार करण्यासाठी वाटचाल सुरू आहे. विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवरील नवीन उपचारपद्धती, तसेच अत्याधुनिक उपकरणे हाताळण्यात यावीत, यासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. शिक्षणातील गुणात्मकता वाढीस लागावी, तसेच विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर शिक्षण मिळावे, यासाठी स्वीडनच्या विद्यापीठाच्या माध्यमातून भारतातील काही विद्यार्थी स्वीडनला आणि स्वीडनचे काही विद्यार्थी आपल्या विद्यापीठात शिक्षण घेत आहेत. तीन वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे. विद्यापीठाला राज्यात पहिले मानांकन मिळाल्याने जबाबदारी वाढली आहे. त्यामुळे भविष्यकाळात विद्यापीठात मोठ्या प्रमाणावर संशोधन कसे होईल, जागतिक पातळीवर विद्यार्थी आणि शिक्षकांचे संशोधन प्रकल्प सादर कसे होतील, यासाठी प्रयत्न करणार आहोत. महत्त्वाची बाब म्हणजे एनआयआरएफच्या यापुढील काळात होणाऱ्या सर्वेक्षणात विद्यापीठ देशातील २० संस्थांमध्ये कसे येईल, या दृष्टीने वाटचाल केली जाणार आहे.