शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिहारच्या निकालानंतर काँग्रेसनं स्वबळाचा निर्णय घेतलाच असेल तर..."; उद्धवसेनेचे शालजोडे
2
सारा तेंडुलकर काशी विश्वनाथ मंदिरात, भक्तीभावाने झाली नतमस्तक, साधेपणाने जिंकलं मन, PHOTOS
3
झोप येत नव्हती म्हणून जागेवरून उठला अन्...; सौदी बस अपघातात एकमेव बचावलेल्या 'शोएब'ची कहाणी
4
आजचे राशीभविष्य - १८ नोव्हेंबर २०२५, या राशीसाठी आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक दृष्टीने आजचा दिवस लाभदायी
5
रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन भारत दौऱ्यावर येण्याआधी मंत्री जयशंकर मॉस्कोत, काय झाली चर्चा?
6
Raigad: रायगडमधील १० नगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी झुंबड!
7
Mumbai: दहिसर-भाईंदर मेट्रो ९ च्या कामावर सुपरवायझरचा मृत्यू; कंत्राटदाराला ५० लाखांचा दंड!
8
CNG: मुंबई, ठाण्यात गॅसकोंडी, ४५ टक्के रिक्षा-टॅक्सी बंद; सीएनजीच्या तुटवड्याने प्रवाशांचे मोठे हाल!
9
Mumbai: बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी शिवसैनिकांचा सागर; ठाकरे बंधूंनी वाहिली आदरांजली!
10
Bihar: एनडीए सरकारचा शपथविधी २० नोव्हेंबरला; कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री? वाचा
11
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
12
saudi arabia: सौदी अरेबियात भीषण अपघात! मक्केहून मदिनेला जाणाऱ्या बसची टँकरला धडक; ४२ भारतीयांचा मृत्यू
13
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
14
Sheikh Hasina: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मृत्युदंड!
15
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
16
Reservation: आरक्षण मर्यादा ओलांडू नका; अन्यथा निवडणुका स्थगित करणार, न्यायालयाचा महाराष्ट्र सरकारला इशारा
17
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
18
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
19
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
20
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या संकटाशी लढताना स्वातंत्र्यपूर्व काळातील क्रांतीकारकांची मानसिकता अंगीकारण्याची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2020 16:14 IST

जुलमी राजवटीतुन भारत देशाला मुक्त करण्यासाठी स्वातंत्र्यवीरांनी अनेक यातना निमूटपणे सहन केल्या..

ठळक मुद्देहुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या ११२ व्या जयंतीनिमित्त राजगुरुनगर येथे अभिवादन कार्यक्रम

राजगुरुनगर: देशाच्या स्वातंत्र्य लढयात इंग्रजांशी कडवा संघर्ष करताना क्रांतिकारकांनी स्वत:वर अत्यंत कठोर नियम लादून घेतले होते. त्यांच्या योगदानातुन आणि बलिदानातुन देशाला स्वातंत्र्य मिळाले. सध्याच्या कोरोनाच्या जागतिक संकटाला सामोरे जाताना स्वातंत्रपूर्व काळातील क्रांतीकारकांची ही मानसिकता अंगीकारण्याची गरज असल्याचे प्रतिपादन माजी खासदार तथा शिवसेनेचे उपनेते शिवाजी आढळराव पाटील यांनी केले.

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अग्रगण्य क्रांतिवीर हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या ११२ व्या जयंतीनिमित्त राजगुरुनगर येथे सोमवारी (दि २४) अभिवादन कार्यक्रम झाला. राजगुरुनगर बस स्थानक आवारातील हुतात्मा राजगुरू,भगतसिंग व सुखदेव यांच्या स्मृती शिल्पाना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यावर आढळराव पाटील बोलत होते. अभिवादन कार्यक्रमात प्रांताधिकारी संजय तेली,तहसीलदार सुचित्रा आमले,खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष देवेंद्र बुट्टे पाटील,सेनेच्या विजया शिंदे, मुकुंद आवटे,कोंडीभाऊ टाकळकर आदी उपस्थित होते. हुतात्मा राजगुरू यांचे जन्मस्थान असलेल्या राजगुरू वाड्यावर अभिवादन कार्यक्रम झाला.खेड पोलीस ठाण्याचे निरीक्षक सतीश गुरव यांच्या हस्ते वाड्यावर ध्वजारोहण करण्यात आले.हुतात्मा राजगुरू स्मारक समितीचे सुशील मांजरे,संदीप वाळुंज,शैलेश रावळ,विठ्ठल पाचारणे,अमित टाकळकर यावेळी उपस्थित होते.

आढळराव पाटील म्हणाले, जुलमी राजवटीतुन भारत देशाला मुक्त करण्यासाठी स्वातंत्र्यवीरांनी अनेक यातना निमूटपणे सहन केल्या. आजच्या संकट काळात या योगदानाचे स्मरण करा आणि स्वत:सह समाजाचे हित जोपासण्याचे ध्येय निश्चित करा असे आवाहन माजी खासदार तथा शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केले.

 

टॅग्स :Khedखेडcorona virusकोरोना वायरस बातम्याShivajirao Adhalraoशिवाजीराव आढळराव