शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

२0 वर्षांपासूनचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यासाठी राष्ट्रवादीचा कस

By admin | Updated: February 18, 2017 02:26 IST

पुरंदर तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक येत्या २१ फेब्रुवारी रोजी होत असून बेलसर-माळशिरस

बेलसर-माळशिरसजेजुरी : पुरंदर तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक येत्या २१ फेब्रुवारी रोजी होत असून बेलसर-माळशिरस गटात चौरंगी लढत होत आहे. यामुळे काँंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजपा यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. या लक्षवेधी लढतीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागलेले आहे. या गटातून काँग्रेसने पंचायत समितीचे विद्यमान सदस्य दत्ता झुरंगे यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची गेली २० वर्षे हा गट ज्यांच्या ताब्यात असणारे माजी जि. प. सदस्य सुदाम इंगळे यांनी इथली उमेदवारी पुन्हा एकदा खेचून आणलेली आहे. तर राज्याचे राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी शिवसेनेकडून अ‍ॅड. शिवाजी कोलते यांना उमेदवारी दिली आहे. भाजपानेही ग्रामीण भागातील पक्षाचा चेहरा म्हणून आधुनिक शेतीचे प्रणेते गणपत कड यांना निवडणुकीत उतरवले आहे. प्रथमाच चौरंगी लढत होत असल्याने निवडणुकीची संपूर्ण समीकरणेच बदललेली आहेत. यामुळे सर्वच पक्षनेतृत्वाचा येथे कस लागणार आहे. विशेष म्हणजे हे चारही उमेदवार पूर्वीचे व आजचे पक्षांतर करणारेच आहेत. या गटातील बेलसर गणातून काँग्रेसने सुनीता बाळासाहेब कोलते यांना तर सेनेने अश्विनी धीरज जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसकडून तृप्ती नीलेश जगताप, तर भाजपाने पल्लवी कैलास जगताप यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेले आहे. माळशिरस गणातून सोनाली कुलदीप यादव या काँग्रेसकडून, वर्षा किशोर खळदकर शिवसेनेकडून, तर मनीषा अरुण यादव या राष्ट्रवादीकडून आपले नशीब आजमावत आहेत. या गणात भाजपाने राष्ट्रवादीच्या नाराज उमेदवारला उमेदवारी दिली होती. मात्र उमेदवाराने आयत्यावेळी माघार घेतल्याने येथे तिरंगी सामना होणार आहे. बेलसर माळशिरस हा गट तसा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुदाम इंगळे यांचा बालेकिल्ला मानला जातो. गेली २० वर्षे हा गट त्यांच्याच ताब्यात राहिलेला आहे. यावेळी प्रथमच त्यांना काँग्रेस, शिवसेना आणि भाजपाकडून मोठे आव्हान निर्माण झालेले आहे. या निवडणुकीतील वैशिष्ट्य म्हणजे गेल्या निवडणुकांत इंगळे यांच्या कन्या सारिका इंगळे यांच्या विरोधात जिल्हा परिषदेची अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या तृप्ती जगताप या त्यांच्याबरोबर बेलसर गणातून निवडणूक लढवित आहेत. तर २००७ मध्ये स्वत: इंगळे यांच्या विरोधात बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी लढवलेल्या अरुण यादव यांच्या पत्नी मनीषा यादव यांना माळशिरस गणासाठी बरोबर घ्यावे लागलेले आहे. पूर्वीच्या दोन्ही बंडखोरांना बरोबर घेऊन निवडणुकीत सुदाम इंगळे उतरलेले आहेत. शिवाय घराणेशाहीचा आरोपही त्यांच्यावर होत आहे. काँग्रेसचे पंचायत समितीचे विद्यमान सदस्य दत्तात्रय झुरंगे या युवा नेत्याला निवडणुकीत उतरवले असून निवडणूक प्रतिष्ठेची बनवली आहे. सेनेचे राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी मनसेतून शिवसेनेत प्रवेश देऊन तालुक्यातील वकील शिवाजी कोलते यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या मागे राज्यमंत्र्यांची ताकद आहे. शिवाय या निवडणुकीसाठी इछुक असणारे व उमेदवारी डावलल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय कोलते यांचे चिरंजीव गौरव कोलते यांनी सेनेच्या उमेदवारलाच विजयी करण्याचा चंग बांधल्याने निवडणुकीत चुरस निर्माण केली आहे. त्यांच्या या भूमिकेचे विजय कोलते यांनी समर्थनच केलेले आहे. मात्र विजय शिवतारे आणि सुदाम इंगळे यांचे राजकीय संबध पाहता मतदारांकडून अनेक शंका व्यक्त होत आहेत. तर भाजपाचे पालकमंत्री गिरीश बापट यांचे खंदे समर्थक आणि आधुनिक शेतीचे पुरस्कर्ते गणपत कड यांनी निवडणुकीची सारीच समीकरणे बिघडवली आहेत. (वार्ताहर)