शहरं
Join us  
Trending Stories
1
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
2
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
3
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
4
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
5
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
6
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
7
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
8
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
9
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
10
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
11
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
12
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
13
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
14
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
15
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
16
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
17
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
18
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
19
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
20
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र

राष्ट्रवादीने दुष्काळाचे राजकारण करू नये

By admin | Updated: September 14, 2015 04:54 IST

महाराष्ट्रावर दुष्काळाचे नैसर्गिक संकट आलेले आहे. त्यावर मात करण्यासाठी राज्यात उपाययोजनांची अंमलबजावणी केली जात आहे

पुणे : महाराष्ट्रावर दुष्काळाचे नैसर्गिक संकट आलेले आहे. त्यावर मात करण्यासाठी राज्यात उपाययोजनांची अंमलबजावणी केली जात आहे. दुष्काळाचे राजकारण करून राष्ट्रवादी काँग्रेसने जनतेची दिशाभूल करू नये, असे आवाहन पालकमंत्री गिरीश बापट यांनी रविवारी केले. दुष्काळ पडल्यास त्याला सामोरे जाण्यासाठी राष्ट्रवादीने गेल्या १५ वर्षांत काहीच केले नसल्याची टीकाही बापट यांनी या वेळी केली.दुष्काळाच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन छेडले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या वतीने प्रत्येक शहरामध्ये पत्रकार परिषद घेऊन दुष्काळाला तोंड देण्यासाठी राज्य शासनाकडून काय उपाययोजना केल्या जात आहेत, याची माहिती दिली जात आहे. त्या अनुषंगाने शहर भाजपच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत बापट बोलत होते. या वेळी खासदार अनिल शिरोळे, आमदार माधुरी मिसाळ, जगदीश मुळीक उपस्थित होते.बापट म्हणाले, ‘‘यंदा पावसाची परिस्थिती गंभीर आहे. पुण्यात सरासरीच्या केवळ ५० टक्के पाऊस झाला़ मराठवाड्यात हेच प्रमाण १० ते १२ टक्के आहे. दुष्काळ पडल्यास त्यावर मात करण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना आवश्यक असते़ मागील सरकारने त्यावर काहीच केलेले नाही. दुष्काळ निवारणासाठी शेतकऱ्यांना आतापर्यंत ५ ते ६ हजार कोटींचे पॅकेज देण्यात आले आहे. मदतीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. दुष्काळसदृश परिस्थिती असलेल्या ठिकाणी तातडीने टँकर पुरविण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. ठिकठिकाणी चारा छावण्या उघडल्या जात आहेत. शासनाने आतापर्यंत १३ जिल्हे दुष्काळग्रस्त जाहीर केले आहेत. तेथील विद्यार्थ्यांची फी माफ केली जाणार आहे. तेथील लोकांना स्वस्त धान्य पुरविले जाणार आहे. वेळ पडली तर कर्ज काढू पण धान्य व पाण्यावाचून शेतकरी राहू देणार नाही. शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ठिंबक सिंचन पध्दतीचा वापर करून पाण्याची बचत करावी.’’धरणातील पाण्याचा बेकायदा उपसा केला जात असल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जात आहे, आतापर्यंत १०० ठिकाणी अशी कारवाई करण्यात आलेली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून दुष्काळाच्या प्रश्नावर केले जात असलेले आंदोलन फसवे आहे, असे बापट यांनी स्पष्ट केले. गेल्या १५ वर्षांत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आघाडी सरकारने काहीच केले नाही़, त्यामुळे दुष्काळाची तीव्रता वाढली असल्याची टीका शिरोळे यांनी केली.