शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
2
मोठी बातमी! पहलगाम नंतर पूंछ होते निशाण्यावर, दहशतवाद्यांचा मोठा कट फसला; ५ आयईडी जप्त
3
उदय कोटक यांचा रियल इस्टेट क्षेत्रात धमाका, केली देशातील सर्वात महागडी ४०० कोटींची प्रॉपर्टी डील
4
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
5
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ
6
लोकप्रिय 'पंचायत' सीरिजला सचिवजी देणार होते नकार? जितेंद्र कुमार म्हणाला, "मला वाटलं..."
7
"बॉलिवूड चोर आहे!" नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, म्हणाला- "लोक या गोष्टींना कंटाळतात..."
8
Samsung ला ४४००००००००० रुपयांचा टॅक्स भरण्याचे आदेश; कंपनीने लावला Reliance Jio वर आरोप, प्रकरण काय?
9
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
10
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
11
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
12
Pahalgam Attack Update: जम्मू काश्मिरातील तुरुंगावर दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट, दहशतवादी आणि ओजीडब्ल्यू आहेत बंद
13
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
14
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
15
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...
16
"२ वर्ष अख्खं जग थांबलं होतं तेव्हा माझं घर यांच्यामुळे चाललं", प्रसाद ओकने कोणाला दिलं श्रेय?
17
'पाकिस्तान भारताविरुद्ध ४ दिवसही टीकू शकत नाही, कराची अन् लाहोरमध्ये गुरुकुल उघडणार'; बाबा रामदेव यांनी सुनावले
18
Maharashtra HSC Result 2025: बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
19
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
20
...म्हणून बाबिलने अर्जुन कपूर, अनन्या पांडेचं नाव घेतलं; अभिनेत्याच्या 'त्या' व्हिडिओनंतर टीमकडून स्पष्टीकरण

नाट्यसंमेलन ‘ताप’दायक

By admin | Updated: March 27, 2017 03:16 IST

मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून महाराष्ट्र तापायला सुरुवात झाली आहे. अशा परिस्थितीत ऐनउन्हाळ्याच्या ‘ताप’दायक

पुणे : मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून महाराष्ट्र तापायला सुरुवात झाली आहे. अशा परिस्थितीत ऐनउन्हाळ्याच्या ‘ताप’दायक वातावरणात उस्मानाबाद येथे ९७ व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे कलाकार मंडळींना संमेलनाला जाण्यापूर्वीच चांगला ‘घाम’ फुटला आहे. संयोजकांनी उन्हाच्या बचावासाठी ‘एक ते चार बंद’ असा मध्यंतराचा पर्याय शोधून काढला असला तरी नाट्यसृष्टीतील दिग्गज कलावंत मंडळी संमेलनाकडे फिरकण्याची शक्यता धूसर आहे. त्यामुळे हे संमेलन सर्वसमावेशक न ठरता त्यावर ‘स्थानिक’ संमेलन अशा शिक्का बसण्याची शक्यता आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात दरवर्षी नाट्यसंमेलन घेण्यात येते. यंदाच्या निवडणुकांमुळे हे संमेलन पुढे ढकलावे लागले. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात तुलनेने कमी त्रास होईल, या कारणाने सुरुवातीला पहिल्या आठवड्यातच संमेलन घेतले जाणार होते. त्यानुसार ७ ते ९ एप्रिल अशा संमेलनाच्या तारखा निश्चित करण्यात आल्या होत्या. मात्र दहावीसह शालेय परीक्षांच्या काळामुळे संमेलनाच्या तारखा पुन्हा पुढे ढकलाव्या लागल्या आणि संमेलन दि. २१ ते २३ एप्रिलदरम्यान घेण्यावर शिक्कामोर्तब झाले. उन्हाळी हंगामातच संमेलनाचे आयोजन करण्यात आल्याने नाट्यकलावंतांसह बाहेरगावहून संमेलनाला हजेरी लावणाऱ्या रसिकांना संमेलनापूर्वीच चांगला घाम फुटला आहे. उस्मानाबाद येथे तापमानाचा पारा हा ४० अंशांच्यावर असतो. याचा विचार करून संयोजकांनी उन्हाचा तडाखा टाळण्यासाठी दुपारी १ ते ४ बंद पुकारून संमेलन सकाळी ८ ते दुपारी १ आणि दुपारी ४ ते रात्री १२ असे घेण्यात येईल, असे जाहीर केले. मात्र, सकाळी बाहेर पडणाऱ्या कलावंतांनी या बंदच्या वेळेत करायचे काय? बाहेरगावाहून येणारे नाट्यरसिक दुपारच्या वेळेत संमेलनस्थळ सोडून कुठे जाणार, त्यांच्यासाठी संयोजकांकडून काही व्यवस्था करण्यात आली आहे का, असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. अंगाची लाही लाही करणाऱ्या उकाड्यात हॉटेलच्या रूम किंवा जिथे सोय केली आहे तिथे जाणे शक्य नाही आणि बाहेर उन्हात फिरताही येणार नाही, अशा स्थितीला सर्वांना सामोरे जावे लागणार आहे. यातच हिवाळा असो वा उन्हाळा कधीही संमेलन घेतले तरी त्याकडे पाठ फिरवणाऱ्या नाट्यसृष्टीतील कलाकारांना यंदा ‘आयते कोलीत’ हातात मिळाले आहे. कायम ‘एअर कंडिशन’मध्ये राहणारे कलाकार ४५ अंश तापमान असलेल्या भागात किती तग धरू शकतील, हापण प्रश्न आहेच. ‘शो मस्ट गो आॅन’प्रमाणे नाट्यसंमेलनाच्या परंपरेला खंड पाडायचा नाही, म्हणून केवळ यंदाचे संमेलन घेतले जात असल्याचे बोलले जात आहे. नियामक मंडळाचे सदस्य आणि नाट्य परिषदेचे पदाधिकारीच संमेलनात पूर्णवेळ उपस्थित राहतील की नाही, याबाबतही शंका आहे. नाट्य परिषदेच्या एका सदस्याने नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले, की यंदाच्या संमेलनाला तापमानामुळे अत्यल्प प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. नाट्यसृष्टीतील दिग्गज कलाकार सोडाच, पण उस्मानाबादमधील नागरिकही संमेलनात कितपत फिरकतील, अशी शंका आहे. (प्रतिनिधी)रंगणार नाट्यमहोत्सव४नाट्यसंमेलनापूर्वी १५ ते १९ एप्रिलदरम्यान उस्मानाबाद येथे नाट्यमहोत्सव रंगणार आहे. त्यामध्ये ‘मोरूची मावशी,’ ‘कट्यार काळजात घुसली,’ ‘तो मी नव्हेच’ अशा गाजलेल्या नाटकांचा आस्वाद रसिकांना घेता येणार आहे. संमेलनाचे उद्घाटन संमेलनाध्यक्ष जयंत सावरकर यांच्या ‘तुझं आहे तुजपाशी’ या नाटकाने होणार आहे.उन्हाचा वाढता पारा लक्षात घेता संमेलनात दुपारी एक ते चारदरम्यान कोणतेही कार्यक्रम होणार नाहीत. त्याऐवजी रात्री बारा वाजेपर्यंत कार्यक्रम चालतील. तशी परवानगी घेण्यात आली आहे. कलाकारांची उपस्थिती वाढावी, यासाठी प्रयत्न सुरू असून सर्वांशी पत्रव्यवहार करण्यात आला आहा.-दीपक करंजीकर, प्रमुख कार्यवाह, मध्यवर्ती नाट्य परिषद