शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

नाट्यसंमेलन ‘ताप’दायक

By admin | Updated: March 27, 2017 03:16 IST

मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून महाराष्ट्र तापायला सुरुवात झाली आहे. अशा परिस्थितीत ऐनउन्हाळ्याच्या ‘ताप’दायक

पुणे : मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून महाराष्ट्र तापायला सुरुवात झाली आहे. अशा परिस्थितीत ऐनउन्हाळ्याच्या ‘ताप’दायक वातावरणात उस्मानाबाद येथे ९७ व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे कलाकार मंडळींना संमेलनाला जाण्यापूर्वीच चांगला ‘घाम’ फुटला आहे. संयोजकांनी उन्हाच्या बचावासाठी ‘एक ते चार बंद’ असा मध्यंतराचा पर्याय शोधून काढला असला तरी नाट्यसृष्टीतील दिग्गज कलावंत मंडळी संमेलनाकडे फिरकण्याची शक्यता धूसर आहे. त्यामुळे हे संमेलन सर्वसमावेशक न ठरता त्यावर ‘स्थानिक’ संमेलन अशा शिक्का बसण्याची शक्यता आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात दरवर्षी नाट्यसंमेलन घेण्यात येते. यंदाच्या निवडणुकांमुळे हे संमेलन पुढे ढकलावे लागले. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात तुलनेने कमी त्रास होईल, या कारणाने सुरुवातीला पहिल्या आठवड्यातच संमेलन घेतले जाणार होते. त्यानुसार ७ ते ९ एप्रिल अशा संमेलनाच्या तारखा निश्चित करण्यात आल्या होत्या. मात्र दहावीसह शालेय परीक्षांच्या काळामुळे संमेलनाच्या तारखा पुन्हा पुढे ढकलाव्या लागल्या आणि संमेलन दि. २१ ते २३ एप्रिलदरम्यान घेण्यावर शिक्कामोर्तब झाले. उन्हाळी हंगामातच संमेलनाचे आयोजन करण्यात आल्याने नाट्यकलावंतांसह बाहेरगावहून संमेलनाला हजेरी लावणाऱ्या रसिकांना संमेलनापूर्वीच चांगला घाम फुटला आहे. उस्मानाबाद येथे तापमानाचा पारा हा ४० अंशांच्यावर असतो. याचा विचार करून संयोजकांनी उन्हाचा तडाखा टाळण्यासाठी दुपारी १ ते ४ बंद पुकारून संमेलन सकाळी ८ ते दुपारी १ आणि दुपारी ४ ते रात्री १२ असे घेण्यात येईल, असे जाहीर केले. मात्र, सकाळी बाहेर पडणाऱ्या कलावंतांनी या बंदच्या वेळेत करायचे काय? बाहेरगावाहून येणारे नाट्यरसिक दुपारच्या वेळेत संमेलनस्थळ सोडून कुठे जाणार, त्यांच्यासाठी संयोजकांकडून काही व्यवस्था करण्यात आली आहे का, असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. अंगाची लाही लाही करणाऱ्या उकाड्यात हॉटेलच्या रूम किंवा जिथे सोय केली आहे तिथे जाणे शक्य नाही आणि बाहेर उन्हात फिरताही येणार नाही, अशा स्थितीला सर्वांना सामोरे जावे लागणार आहे. यातच हिवाळा असो वा उन्हाळा कधीही संमेलन घेतले तरी त्याकडे पाठ फिरवणाऱ्या नाट्यसृष्टीतील कलाकारांना यंदा ‘आयते कोलीत’ हातात मिळाले आहे. कायम ‘एअर कंडिशन’मध्ये राहणारे कलाकार ४५ अंश तापमान असलेल्या भागात किती तग धरू शकतील, हापण प्रश्न आहेच. ‘शो मस्ट गो आॅन’प्रमाणे नाट्यसंमेलनाच्या परंपरेला खंड पाडायचा नाही, म्हणून केवळ यंदाचे संमेलन घेतले जात असल्याचे बोलले जात आहे. नियामक मंडळाचे सदस्य आणि नाट्य परिषदेचे पदाधिकारीच संमेलनात पूर्णवेळ उपस्थित राहतील की नाही, याबाबतही शंका आहे. नाट्य परिषदेच्या एका सदस्याने नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले, की यंदाच्या संमेलनाला तापमानामुळे अत्यल्प प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. नाट्यसृष्टीतील दिग्गज कलाकार सोडाच, पण उस्मानाबादमधील नागरिकही संमेलनात कितपत फिरकतील, अशी शंका आहे. (प्रतिनिधी)रंगणार नाट्यमहोत्सव४नाट्यसंमेलनापूर्वी १५ ते १९ एप्रिलदरम्यान उस्मानाबाद येथे नाट्यमहोत्सव रंगणार आहे. त्यामध्ये ‘मोरूची मावशी,’ ‘कट्यार काळजात घुसली,’ ‘तो मी नव्हेच’ अशा गाजलेल्या नाटकांचा आस्वाद रसिकांना घेता येणार आहे. संमेलनाचे उद्घाटन संमेलनाध्यक्ष जयंत सावरकर यांच्या ‘तुझं आहे तुजपाशी’ या नाटकाने होणार आहे.उन्हाचा वाढता पारा लक्षात घेता संमेलनात दुपारी एक ते चारदरम्यान कोणतेही कार्यक्रम होणार नाहीत. त्याऐवजी रात्री बारा वाजेपर्यंत कार्यक्रम चालतील. तशी परवानगी घेण्यात आली आहे. कलाकारांची उपस्थिती वाढावी, यासाठी प्रयत्न सुरू असून सर्वांशी पत्रव्यवहार करण्यात आला आहा.-दीपक करंजीकर, प्रमुख कार्यवाह, मध्यवर्ती नाट्य परिषद