शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

नाट्यसंमेलन ‘ताप’दायक

By admin | Updated: March 27, 2017 03:16 IST

मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून महाराष्ट्र तापायला सुरुवात झाली आहे. अशा परिस्थितीत ऐनउन्हाळ्याच्या ‘ताप’दायक

पुणे : मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून महाराष्ट्र तापायला सुरुवात झाली आहे. अशा परिस्थितीत ऐनउन्हाळ्याच्या ‘ताप’दायक वातावरणात उस्मानाबाद येथे ९७ व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे कलाकार मंडळींना संमेलनाला जाण्यापूर्वीच चांगला ‘घाम’ फुटला आहे. संयोजकांनी उन्हाच्या बचावासाठी ‘एक ते चार बंद’ असा मध्यंतराचा पर्याय शोधून काढला असला तरी नाट्यसृष्टीतील दिग्गज कलावंत मंडळी संमेलनाकडे फिरकण्याची शक्यता धूसर आहे. त्यामुळे हे संमेलन सर्वसमावेशक न ठरता त्यावर ‘स्थानिक’ संमेलन अशा शिक्का बसण्याची शक्यता आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात दरवर्षी नाट्यसंमेलन घेण्यात येते. यंदाच्या निवडणुकांमुळे हे संमेलन पुढे ढकलावे लागले. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात तुलनेने कमी त्रास होईल, या कारणाने सुरुवातीला पहिल्या आठवड्यातच संमेलन घेतले जाणार होते. त्यानुसार ७ ते ९ एप्रिल अशा संमेलनाच्या तारखा निश्चित करण्यात आल्या होत्या. मात्र दहावीसह शालेय परीक्षांच्या काळामुळे संमेलनाच्या तारखा पुन्हा पुढे ढकलाव्या लागल्या आणि संमेलन दि. २१ ते २३ एप्रिलदरम्यान घेण्यावर शिक्कामोर्तब झाले. उन्हाळी हंगामातच संमेलनाचे आयोजन करण्यात आल्याने नाट्यकलावंतांसह बाहेरगावहून संमेलनाला हजेरी लावणाऱ्या रसिकांना संमेलनापूर्वीच चांगला घाम फुटला आहे. उस्मानाबाद येथे तापमानाचा पारा हा ४० अंशांच्यावर असतो. याचा विचार करून संयोजकांनी उन्हाचा तडाखा टाळण्यासाठी दुपारी १ ते ४ बंद पुकारून संमेलन सकाळी ८ ते दुपारी १ आणि दुपारी ४ ते रात्री १२ असे घेण्यात येईल, असे जाहीर केले. मात्र, सकाळी बाहेर पडणाऱ्या कलावंतांनी या बंदच्या वेळेत करायचे काय? बाहेरगावाहून येणारे नाट्यरसिक दुपारच्या वेळेत संमेलनस्थळ सोडून कुठे जाणार, त्यांच्यासाठी संयोजकांकडून काही व्यवस्था करण्यात आली आहे का, असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. अंगाची लाही लाही करणाऱ्या उकाड्यात हॉटेलच्या रूम किंवा जिथे सोय केली आहे तिथे जाणे शक्य नाही आणि बाहेर उन्हात फिरताही येणार नाही, अशा स्थितीला सर्वांना सामोरे जावे लागणार आहे. यातच हिवाळा असो वा उन्हाळा कधीही संमेलन घेतले तरी त्याकडे पाठ फिरवणाऱ्या नाट्यसृष्टीतील कलाकारांना यंदा ‘आयते कोलीत’ हातात मिळाले आहे. कायम ‘एअर कंडिशन’मध्ये राहणारे कलाकार ४५ अंश तापमान असलेल्या भागात किती तग धरू शकतील, हापण प्रश्न आहेच. ‘शो मस्ट गो आॅन’प्रमाणे नाट्यसंमेलनाच्या परंपरेला खंड पाडायचा नाही, म्हणून केवळ यंदाचे संमेलन घेतले जात असल्याचे बोलले जात आहे. नियामक मंडळाचे सदस्य आणि नाट्य परिषदेचे पदाधिकारीच संमेलनात पूर्णवेळ उपस्थित राहतील की नाही, याबाबतही शंका आहे. नाट्य परिषदेच्या एका सदस्याने नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले, की यंदाच्या संमेलनाला तापमानामुळे अत्यल्प प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. नाट्यसृष्टीतील दिग्गज कलाकार सोडाच, पण उस्मानाबादमधील नागरिकही संमेलनात कितपत फिरकतील, अशी शंका आहे. (प्रतिनिधी)रंगणार नाट्यमहोत्सव४नाट्यसंमेलनापूर्वी १५ ते १९ एप्रिलदरम्यान उस्मानाबाद येथे नाट्यमहोत्सव रंगणार आहे. त्यामध्ये ‘मोरूची मावशी,’ ‘कट्यार काळजात घुसली,’ ‘तो मी नव्हेच’ अशा गाजलेल्या नाटकांचा आस्वाद रसिकांना घेता येणार आहे. संमेलनाचे उद्घाटन संमेलनाध्यक्ष जयंत सावरकर यांच्या ‘तुझं आहे तुजपाशी’ या नाटकाने होणार आहे.उन्हाचा वाढता पारा लक्षात घेता संमेलनात दुपारी एक ते चारदरम्यान कोणतेही कार्यक्रम होणार नाहीत. त्याऐवजी रात्री बारा वाजेपर्यंत कार्यक्रम चालतील. तशी परवानगी घेण्यात आली आहे. कलाकारांची उपस्थिती वाढावी, यासाठी प्रयत्न सुरू असून सर्वांशी पत्रव्यवहार करण्यात आला आहा.-दीपक करंजीकर, प्रमुख कार्यवाह, मध्यवर्ती नाट्य परिषद