शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईच्या बाबतीत काहीतरी डाव नक्कीच शिजतोय..."; राज ठाकरेंचे 'बॉम्बे' वादावर रोखठोक मत
2
व्यवहारच अपूर्ण, मुद्रांक शुल्क का भरावे? दंड टाळण्यासाठी ‘अमेडिया’ची पळवाट 
3
मुंबईत थरकाप उडवणारी घटना! अंडी फेकली आणि पाच जणांनी मित्रालाच पेट्रोल टाकून पेटवलं; घटनेचा सीसीटीव्ही व्हायरल
4
पगार ५० हजार...तर तुम्हाला किती मिळेल ग्रॅच्युइटी?; जाणून घ्या, नवीन नियम अन् सोपा फॉर्म्युला
5
Stock Market: ३ दिवसांच्या घसरणीनंतर शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स २४५ अंकांनी वधारला; गुंतवणूकदारांमध्ये उत्साह
6
टीम इंडियाची लाजिरवाणी कामगिरी! स्टार क्रिकेटर म्हणाला, 'ही' आमच्यासाठी विन-विन सिच्युएशन ठरेल!
7
आजचे राशीभविष्य, २६ नोव्हेंबर २०२५: 'या' राशींसाठी आहे धनलाभाचा योग; वाचा आपले आजचे राशीभविष्य!
8
पेन्शन, टॅक्स पासून एलपीजी पर्यंत; १ डिसेंबरपासून बदलणार हे महत्त्वाचे नियम, तुमच्यावर थेट होणार परिणाम
9
स्मृती मानधनाच्या वडिलांना रुग्णालयातून डिस्चार्ज; पलाश मुच्छलसोबत लग्न अद्यापही लांबणीवरच!
10
देशाच्या माजी राष्ट्रपतींनाच सुनावली २७ वर्षांची शिक्षा, कुठे घडला प्रकार? काय आहे गुन्हा?
11
धर्मेंद्र यांचा 'हा' सिनेमा आता कधीच चाहत्यांच्या भेटीला येणार नाही; दिग्दर्शकाचा मोठा निर्णय
12
आरक्षणाची मर्यादा ओलांडली तर निवडणूक रद्दही होऊ शकते; निवडणुकांवरील टांगती तलवार कायम
13
हमासनं जमिनीखाली वसवलं ८० खोल्यांचं गाव! केवळ इस्रायलच नाही, तर अख्खं जग थक्क झालं
14
नरिमन पाँईंटवरून थेट विरार...पोहचा एका तासातच सुसाट; उत्तन-विरार सागरी सेतूच्या ‘DPR’ला मान्यता
15
रेड झोन झाला तर बांधकामे बंद होणार; प्रदूषणाचा विळखा कायम, मुंबई महापालिकेचा इशारा
16
असत्यावर सत्य विजय मिळविते याचे भगवा ध्वज हे प्रतीक - पंतप्रधान नरेंद्र मोदी
17
मुंबईत ४.३३ लाख दुबार मतदार, महापालिकेची कबुली; म्हणाले, नावे काढण्याचा अधिकार आम्हाला नाही
18
खोटा प्रचार केल्याने वास्तव बदलणार नाही; अरुणाचल प्रदेशावर दावा करणाऱ्या चीनला भारताचे प्रत्युत्तर
19
४ वर्षांची चिमुकली सहा महिन्यांनी पुन्हा आईच्या कुशीत; लेकीला पाहिले अन् आईची शुद्ध हरपली 
20
शेवग्याची शेंग ५०० रुपये किलाेवर; संपूर्ण राज्यात महिनाभर तुटवडा राहणार, कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीविरोधी ‘एल्गार’

By admin | Updated: October 7, 2014 06:20 IST

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेचे बारामती शहरात दि. ९ आॅक्टोबर रोजी होत आहे. राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यातच सभेचे आयोजन केले

बारामती : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेचे बारामती शहरात दि. ९ आॅक्टोबर रोजी होत आहे. राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यातच सभेचे आयोजन केले असल्याने राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या नेत्यांच्यादेखील भुवया उंचावल्या आहेत. राज्यातील इतर सभांमध्ये मोदींनी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या नेत्यांनाच चांगलेच लक्ष्य केले आहे. आता थेट राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या बारामतीतच त्यांची सभा होणार असल्याने ते काय बोलणार, यावर राजकीय वर्तुळात चर्चा आहे. भारतीय जनता पक्ष व मित्रपक्षाचे बारामतीतील उमेदवार बाळासाहेब गावडे यांच्यासह दौंड, इंदापूर, पुरंदर, फलटण, माळशिरस या तालुक्यातील उमेदवारांसाठी या जाहीर सभेचे बारामतीत आयोजन केले आहे. त्यामुळे सभेला विशेष महत्व आहे. एकहाती सत्ता असून बारामतीसह अन्य तालुक्यातील पाण्याचा प्रश्न, रखडलेल्या उपसा सिंचन योजना, सहकारी साखर कारखान्यांसह अन्य संस्थांमधील गैरप्रकार आदी स्थानिक प्रश्नांबाबत नरेंद्र मोदी पवार यांना त्यांच्या बालेकिल्लयातच ‘लक्ष्य’ करणार काय, याकडे सर्वांचे लक्ष आहे. राज्याच्या राजकारणात भाजपाचे नेते स्व. गोपीनाथ मुंडे यांनीच आतापर्यंत बारामतीत सभा घेऊन राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते शरद पवार, अजित पवार यांना थेट आव्हान दिले होते. राज्य, राष्ट्रीय पातळीवरील अन्य पक्षातील नेत्यांशी शरद पवार यांचे सख्य असते, असे सांगितले जाते. शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांची बारामतीत सभा घेण्याचा प्रयत्न झाला होता. परंतू ते शक्य झाले नव्हते. बारामतीवर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची एकहाती सत्ता आहे. परंतू मागील पाच वर्षात त्याला विविध आंदोलनाच्या माध्यमातून छेद देण्यात आले. त्यामध्ये प्रामुख्याने शेतकरी कृती समिती व स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी उस दराच्या आंदोलनासाठी बारामतीची निवड केली. उग्र आंदोलन झाले. त्यामुळे वाढीव उस दराचा निर्णय सरकारला घ्यावा लागला. उस दराच्या आंदोलनाला स्थानिक नेते सतीश काकडे, रंजन तावरे, पृथ्वीराज जाचक यांचे नेतृत्व लाभले. त्यानंतर धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू करावे, यासाठी धनगर आरक्षण कृती समितीच्या माध्यमातून भाजपाचे बारामतीचे विद्यमान उमेदवार बाळासाहेब गावडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. उपोषण, चक्री उपोषण, रास्ता रोको आदींच्या माध्यमातून आरक्षणासाठी आंदोलन झाले. राष्ट्रवादी कॉँग्रेसने २००९ च्या निवडणूकीत आरक्षणाचे मुद्दा जाहीरनाम्यात दिला होता, म्हणून बारामतीत आंदोलन झाले. याच दरम्यान बारामती तालुक्यातील जिरायती भागातील जनतेने मागील वर्षी ऐन दिवाळीच्या सणाच्या काळात पाण्यासाठी आंदोलन सुरू केले. दोघा अंध व्यक्तींनी सुरू केलेल्या आंदोलनाला भाजपाचे नेते दिलीपराव खैरे यांनी पाठबळ दिले. त्यामुळे बारामतीची दुसरी बाजू उघड झाली. पाण्यासाठी मोर्चे, आंदोलने, काळ्या गुढ्या उभारून राष्ट्रवादीच्या नेत्यांचा निषेध करण्यात आला. त्यामुळे बारामतीत विरोध वाढत असल्याचे चित्र निर्माण झाले. अलिकडच्या काळात बारामती आंदोलनाचे केंद्रच बनले होते. याच पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणूकीत सुप्रिया सुळे यांना बारामतीने तारले हे सत्य असले तरी, महायुतीच्या उमेदवाराने बारामतीच्या बालेकिल्लयात घेतलेली मते लक्षणीय ठरली आहेत. याच अनुषंगाने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची सभा सध्याच्या मोदी लाटेत महत्वाची ठरणार आहे. त्यातच बहुरंगी लढत असल्याने या सभेला अधिक महत्व प्राप्त झाले आहे.