शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

नरेंद्र मोदी लोकशाहीपेक्षा स्वतःला मोठे मानणे धोक्याचे लक्षण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2019 14:37 IST

संविधानाने सर्वांना समानता दिलेली आहे. मोदी हे सर्व लोकशाही व्यवस्था, लोकशाही संस्था, मंत्रीमंडळ यांच्यापेक्षा स्वतःला मोठे मानतात, हा धोका आहे. लोकशाही मानणे म्हणजेच समानता आणणे होय. मात्र, मनुस्मृती मानणारी मंडळी सत्तेवर आल्याने देशात गोंधळ माजला.

पुणे :संविधानाने सर्वांना समानता दिलेली आहे. मोदी हे सर्व लोकशाही व्यवस्था, लोकशाही संस्था, मंत्रीमंडळ यांच्यापेक्षा स्वतःला मोठे मानतात, हा धोका आहे. लोकशाही मानणे म्हणजेच समानता आणणे होय. मात्र, मनुस्मृती मानणारी मंडळी सत्तेवर आल्याने देशात गोंधळ माजला. त्यामुळे सत्तेसाठी द्वेष वाढविण्याच्या कटाला बळी पडू नये', असे आवाहन युवक क्रांती दलाचे अध्यक्ष डॉ.कुमार सप्तर्षी यांनी रविवारी केले.

दलित स्वयंसेवक संघ व अण्णा भाऊ साठे स्मारक संस्था यांच्या  संयुक्त विद्यमाने व्याख्यानमालेचे ३४७ वे पुष्प आयोजित करण्यात आले हाेते. सध्याची सामाजिक - राजकीय परिस्थिती आणि आपल्यासमोरील आव्हाने ' या विषयावर डॉ. सप्तर्षी यांनी मार्गदर्शन केले.

डॉ. सप्तर्षी म्हणाले, 'जात, धर्म यामुळे माणसा -माणसातील अंतर वाढते, आपण माणसातील अंतर कमी केले पाहिजे. जातीच्या अस्मिता कमी झाल्याशिवाय भारतीयत्व मोठे होणार नाही.प्रामाणिकपणाच दूरवर आपल्याला साथ देतो, हा सर्वांचाच अनुभव आहे'.'सत्तेकरता समाजात विभाजन करण्यासाठी द्वेष वाढविला जात आहे. फक्त मोदींना घालवून चालणार नाही, मनुस्मृतीचा पगडा नाहिसा केला पाहिजे',असे त्यांनी सांगितले. अध्यक्षस्थानी प्रा.पवार हे  होते.दादासाहेब सोनवणे यांनी स्वागत केले.प्रल्हाद कांबळे यांनी प्रास्ताविक केले. सुजित रणदिवे यांनी सूत्रसंचालन केले.लक्ष्मण लोंढे, संदीप बर्वे, प्रसन्न मराठे उपस्थित होते. 

टॅग्स :PoliticsराजकारणNarendra Modiनरेंद्र मोदी