शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
3
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
4
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
5
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
6
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
7
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
8
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
9
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
10
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
11
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
12
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
13
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
14
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
15
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
16
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
17
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
18
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
19
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
20
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?

गोमातेचे रक्षण करण्याच्या नावाखाली धांगडधिंगा, सुमित्रा महाजन यांचा अप्रत्यक्षपणे गोरक्षकांवर निशाणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 02:24 IST

भगिनी निवेदिता या परदेशी व्यक्ती असूनही भारतीय मूल्यांचा सूक्ष्मपणे अभ्यास करीत मूल्यधिष्ठित विचारसरणीशी एकरूप झाल्या; मात्र आपल्याला अजूनही ‘भारतीयत्व’ समजलेले नाही.

पुणे : भगिनी निवेदिता या परदेशी व्यक्ती असूनही भारतीय मूल्यांचा सूक्ष्मपणे अभ्यास करीत मूल्यधिष्ठित विचारसरणीशी एकरूप झाल्या; मात्र आपल्याला अजूनही ‘भारतीयत्व’ समजलेले नाही. गाय घरात आणली तर कुटुंबातील सदस्य या नात्याने तिचे स्वागत करून पूजन केले जाते. ती पूजनीय आहेच; मात्र सध्या गोमातेचे रक्षण करण्याच्या नावाखाली धांगडधिंगा सुरू आहे, अशा खरमरीत टीकेतून लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी अप्रत्यक्षपणे गोरक्षकांवर निशाणा साधला.विवेकानंद केंद्र, कन्याकुमारी मराठी प्रकाशन विभागाच्या वतीने आयोजित ‘चिंतन भगिनी निवेदितांचे’ या पुस्तक संचाच्या प्रकाशनाप्रसंगी त्या बोलत होत्या.या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून महापौर मुक्ता टिळक, लेखिका सुरुचि पांडे, मृणालिनी चितळे, अदिती जोगळेकर-हर्डीकर तसेच केंद्राच्या उपाध्यक्षा निवेदिता भिडे, सुधीर जोगळेकर आणि प्रकाश पाठक उपस्थित होते.भगिनी निवेदिता यांनी आत्मसात केलेल्या भारतीय मूल्यव्यवस्थेशी गुरू-शिष्य परंपरा, कला-संस्कृती आणि शिक्षण या मुद्द्यांची यथायोग्य सांगड घालून महाजन यांनी उत्तम विवेचन केले.त्या म्हणाल्या, ‘‘स्वामी विवेकानंद आणि भगिनी निवेदिता यांच्यातील गुरुशिष्य परंपरेचा धागा पकडून गुरू-शिष्य नाते कसे असले पाहिजे, याचे आदर्श उदाहरण म्हणून स्वामी विवेकानंद आणि भगिनी निवेदिता यांच्याकडे पाहावे. विवेकानंदांनी त्यांना शिष्य म्हणून तोलूनमापून तयार केले. गुरूकडून आपल्याला काय हवे, कोणते ज्ञान आणि चिंतन अपेक्षित आहे, याची तयारी करूनच शिष्याने गुरूकडे जायला पाहिजे. गुरूनेही शिष्याला परखले पाहिजे. मात्र, आजकाल या नात्यात खूप काही चालले आहे. गुरूची एक आचारसंहिता आणि अनुशासन असायला हवे. ऊठसूट गुरूची पदवी लावून घेता काम नये, असे सांगत त्यांनी तथाकथित गुरूंवर टीकास्त्र सोडले.लेखिकेसह निवेदिता भिडे यांनीही मनोगत व्यक्त केले. सुधीर जोगळेकर यांनी प्रास्ताविक केले. अरुण करमरकर यांनी सूत्रसंचालन केले.युवा पिढीला मूल्याधिष्ठित शिक्षण द्यावेस्वामी विवेकानंद यांनी समाजहितासाठी जो मार्ग अवलंबला त्यावरच भगिनी निवेदिता यांनी मार्गक्रमण केले. राष्ट्रप्रेम हे सर्वोच्च आहे. जेव्हा राष्ट्रप्रेमाची भावना मनात जागृत होईल, तेव्हा विश्वाच्या निर्मितीसाठी चांगले काम होऊ शकेल. युवा पिढीला मूल्याधिष्ठित शिक्षण देण्याची गरज आहे. यातूनच एक चांगला माणूस आणि नागरिक निर्माण होईल, असे मुक्ता टिळक म्हणाल्या.मातृभाषेतून शिक्षण देणे महत्त्वाचेभारतीय मूल्यव्यवस्था ही आदर्शवत आहे, त्यामधून संस्काराची बीज रूजली गेली आहेत. गाय ही आपली माता असून, पूजनीय आहेच. तिला विकत घेऊन घरात आणल्यानंतर तिची पूजा केली जाते; मात्र गोरक्षणाच्या नावाने धांगडधिंगा सुरू असल्याचे सुमित्रा महाजन म्हणाल्या.शिक्षणाच्या संस्कारातून व्यक्तिमत्त्व घडत असते. आईचे दूध जसे बाळासाठी पोषक असते, त्याचप्रमाणे मातृभाषेतून शिक्षण देणे महत्त्वाचे आहे. मातृभाषेतून शिक्षण घेणत्र्यांची संख्या किती आहे, त्यावर देशाचे भवितव्य अवलंबून असते, याकडे महाजन यांनी लक्ष वेधले.

टॅग्स :Puneपुणे