शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

नामस्मरण हेच परमेश्वराचे प्रवेशव्दार - ह.भ.प. बाबामहाराज सातारकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 01:47 IST

आपले आयुष्य किती आहे हे कोणालाच माहिती नसते. पुढच्या क्षणी काय घडेल, हे देखील कोणाला माहिती नाही, म्हणून आज माणसे एकमेकांना सोबत घेऊन जगत आहेत.

पुणे : आपले आयुष्य किती आहे हे कोणालाच माहिती नसते. पुढच्या क्षणी काय घडेल, हे देखील कोणाला माहिती नाही, म्हणून आज माणसे एकमेकांना सोबत घेऊन जगत आहेत. कोणालाही पुढील क्षण माहिती नाही म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जो क्षण आत्ता आहे, त्याक्षणी तुम्ही देवाचे नामस्मरण करा. नामस्मरण हेच परमेश्वराच्या जवळ जाण्याचे प्रवेशद्वार आहे, असे मत ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबामहाराज सातारकर यांनी व्यक्त केले.श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे चातुमार्सानिमित्त कीर्तनकार व प्रवचनकार ह.भ.प. बाबामहाराज सातारकर यांच्या प्रवचनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रवचन गणेश कला क्रीडा मंच येथे गुरूवार, दिनांक ३० आॅगस्ट पर्यंत सुरू आहे. यावेळी त्यांनी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठाचे निरुपण करताना नामस्मरण आणि देव याचे विश्लेषण केले. बाबामहाराज सातारकर म्हणाले, ज्याक्षणी आपण देवाचे नामस्मरण करतो, त्याक्षणी आपल्या मनात इतर कोणतेही विचार येऊ नयेत. सद्गुरू कृपेचा एक क्षण तुमचे जीवन पालटू शकतो. परंतु तो क्षण तुमच्या जीवनात असाच येत नाही, त्याकरीता देवाची तशा प्रकारची उपासना देखील करावी लागते.ते म्हणाले, ज्ञानाने मुक्ती साध्य होते, परंतु ज्ञानेश्वर महाराज म्हणतात देवाच्या द्वारी उभे राहिलात, देवाचे नामस्मरण केले तर चारही मुक्ती साध्य होतील. वेदांच्या मागार्ने गेल्यानंतर आपण मुक्तीकडे जातो. परंतु वारकरी सांप्रदायाच्या मागार्ने गेलात, तर तुम्ही भक्तीच्या मार्गाकडे जाता. जन्म असेल तर भक्ती घडेल. पंढरीची वारी केली तर तुम्हाला चारही मुक्ती साध्य होतील, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकPuneपुणे