शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
4
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
5
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
6
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
7
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
8
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
9
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
10
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
11
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
12
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
13
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
14
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
15
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
16
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
17
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
18
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
19
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
20
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!

नामस्मरण हेच परमेश्वराचे प्रवेशव्दार - ह.भ.प. बाबामहाराज सातारकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 01:47 IST

आपले आयुष्य किती आहे हे कोणालाच माहिती नसते. पुढच्या क्षणी काय घडेल, हे देखील कोणाला माहिती नाही, म्हणून आज माणसे एकमेकांना सोबत घेऊन जगत आहेत.

पुणे : आपले आयुष्य किती आहे हे कोणालाच माहिती नसते. पुढच्या क्षणी काय घडेल, हे देखील कोणाला माहिती नाही, म्हणून आज माणसे एकमेकांना सोबत घेऊन जगत आहेत. कोणालाही पुढील क्षण माहिती नाही म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जो क्षण आत्ता आहे, त्याक्षणी तुम्ही देवाचे नामस्मरण करा. नामस्मरण हेच परमेश्वराच्या जवळ जाण्याचे प्रवेशद्वार आहे, असे मत ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबामहाराज सातारकर यांनी व्यक्त केले.श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे चातुमार्सानिमित्त कीर्तनकार व प्रवचनकार ह.भ.प. बाबामहाराज सातारकर यांच्या प्रवचनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रवचन गणेश कला क्रीडा मंच येथे गुरूवार, दिनांक ३० आॅगस्ट पर्यंत सुरू आहे. यावेळी त्यांनी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठाचे निरुपण करताना नामस्मरण आणि देव याचे विश्लेषण केले. बाबामहाराज सातारकर म्हणाले, ज्याक्षणी आपण देवाचे नामस्मरण करतो, त्याक्षणी आपल्या मनात इतर कोणतेही विचार येऊ नयेत. सद्गुरू कृपेचा एक क्षण तुमचे जीवन पालटू शकतो. परंतु तो क्षण तुमच्या जीवनात असाच येत नाही, त्याकरीता देवाची तशा प्रकारची उपासना देखील करावी लागते.ते म्हणाले, ज्ञानाने मुक्ती साध्य होते, परंतु ज्ञानेश्वर महाराज म्हणतात देवाच्या द्वारी उभे राहिलात, देवाचे नामस्मरण केले तर चारही मुक्ती साध्य होतील. वेदांच्या मागार्ने गेल्यानंतर आपण मुक्तीकडे जातो. परंतु वारकरी सांप्रदायाच्या मागार्ने गेलात, तर तुम्ही भक्तीच्या मार्गाकडे जाता. जन्म असेल तर भक्ती घडेल. पंढरीची वारी केली तर तुम्हाला चारही मुक्ती साध्य होतील, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकPuneपुणे