शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
3
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
4
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
5
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
6
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
7
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
8
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
9
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
10
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
11
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
12
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
13
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
14
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
15
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
16
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
17
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
18
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
19
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
20
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना

नामस्मरण हेच परमेश्वराचे प्रवेशव्दार - ह.भ.प. बाबामहाराज सातारकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 01:47 IST

आपले आयुष्य किती आहे हे कोणालाच माहिती नसते. पुढच्या क्षणी काय घडेल, हे देखील कोणाला माहिती नाही, म्हणून आज माणसे एकमेकांना सोबत घेऊन जगत आहेत.

पुणे : आपले आयुष्य किती आहे हे कोणालाच माहिती नसते. पुढच्या क्षणी काय घडेल, हे देखील कोणाला माहिती नाही, म्हणून आज माणसे एकमेकांना सोबत घेऊन जगत आहेत. कोणालाही पुढील क्षण माहिती नाही म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जो क्षण आत्ता आहे, त्याक्षणी तुम्ही देवाचे नामस्मरण करा. नामस्मरण हेच परमेश्वराच्या जवळ जाण्याचे प्रवेशद्वार आहे, असे मत ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबामहाराज सातारकर यांनी व्यक्त केले.श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे चातुमार्सानिमित्त कीर्तनकार व प्रवचनकार ह.भ.प. बाबामहाराज सातारकर यांच्या प्रवचनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रवचन गणेश कला क्रीडा मंच येथे गुरूवार, दिनांक ३० आॅगस्ट पर्यंत सुरू आहे. यावेळी त्यांनी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठाचे निरुपण करताना नामस्मरण आणि देव याचे विश्लेषण केले. बाबामहाराज सातारकर म्हणाले, ज्याक्षणी आपण देवाचे नामस्मरण करतो, त्याक्षणी आपल्या मनात इतर कोणतेही विचार येऊ नयेत. सद्गुरू कृपेचा एक क्षण तुमचे जीवन पालटू शकतो. परंतु तो क्षण तुमच्या जीवनात असाच येत नाही, त्याकरीता देवाची तशा प्रकारची उपासना देखील करावी लागते.ते म्हणाले, ज्ञानाने मुक्ती साध्य होते, परंतु ज्ञानेश्वर महाराज म्हणतात देवाच्या द्वारी उभे राहिलात, देवाचे नामस्मरण केले तर चारही मुक्ती साध्य होतील. वेदांच्या मागार्ने गेल्यानंतर आपण मुक्तीकडे जातो. परंतु वारकरी सांप्रदायाच्या मागार्ने गेलात, तर तुम्ही भक्तीच्या मार्गाकडे जाता. जन्म असेल तर भक्ती घडेल. पंढरीची वारी केली तर तुम्हाला चारही मुक्ती साध्य होतील, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकPuneपुणे