शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

अनुभवांवर आधारित साहित्य मनाला भिडते -नागनाथ कोत्तापल्ले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 03:44 IST

अनुभवांवर आधारित साहित्य मनाला भिडते. सर्वसाधारण लेखकाला लिखाणातून व्यक्त होताना काही धोकेही पत्करावे लागतात. तो धोके का पत्करतो, पत्करलेले धोके कसे हाताळतो, ते अनुभव कसे मांडतो हे सर्व घटक महत्त्वाचे ठरतात.

पुणे - अनुभवांवर आधारित साहित्य मनाला भिडते. सर्वसाधारण लेखकाला लिखाणातून व्यक्त होताना काही धोकेही पत्करावे लागतात. तो धोके का पत्करतो, पत्करलेले धोके कसे हाताळतो, ते अनुभव कसे मांडतो हे सर्व घटक महत्त्वाचे ठरतात. प्रशासकीय अधिकाऱ्यांना दररोज नानाविध प्रकारची माणसे, वृत्ती, प्रवृत्ती भेटत असतात. त्यामुळे प्रशासकीय नोकरीच्या निमित्ताने अनुभवाचे एक मोठे दालनच त्यांच्यापुढे उभे ठाकलेले असते, असे मत माजी संमेलनाध्यक्ष नागनाथ कोत्तापल्ले यांनी व्यक्त केले.रंगत-संगत प्रतिष्ठान आणि श्यामची आई फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा काव्यप्रतिभा पुरस्कार उपजिल्हाधिकारी आणि शरद पवार यांचे स्वीय सहायक कवी सतीश राऊत यांना देण्यात आला. त्या वेळी कोत्तापल्ले बोलत होते. या वेळी रंगत-संगत प्रतिष्ठानचे अ‍ॅड. प्रमोद आडकर आणि श्यामची आई फाऊंडेशनचे भारत देसडला उपस्थित होते.कोत्तापल्ले म्हणाले, ‘मराठी साहित्यास जागतिक पातळीवर ओळख मिळत नसल्याची खंत व्यक्त केली जाते. परंतु, मराठी साहित्यिकांचे अनुभवविश्व मर्यादित असल्याने ते वैश्विक अनुभवाशी नाळ जोडू शकत नाही. त्या तुलनेत कामाच्या स्वरूपामुळे प्रशासकीय अधिकाºयाचे अनुभवविश्व व्यापक असल्याने मराठी साहित्यात तो मोलाची भर टाकू शकतो.’अ‍ॅड. प्रमोद आडकर यांनी प्रास्ताविक केले. उद्धव कानडे यांनी सूत्रसंचालन केले.प्रशासनात असल्याने हाताळावे लागणारे शेतीचे तंटे, अनैतिक संबंधांमुळे निर्माण होणारे प्रश्न, जाती-पातीची भांडणे, दुष्काळ, छावण्या, निवडणुकीचे प्रसंग हेच माझ्या कवितेचे विषय होते. प्रेमकविता तुलनेने कमी लिहिल्या. माझ्या वरिष्ठ अधिकाºयांनी मला प्रोत्साहित केले. सरकारी अधिकाºयांमध्ये संवेदनशीलता नसते, हा समज काही अंशी खोडून काढण्यात यशस्वी झालो, याचे समाधान काव्यनिर्मितीमुळे मिळाले. - सतीश राऊत

टॅग्स :marathiमराठीnewsबातम्या