शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

अनुभवांवर आधारित साहित्य मनाला भिडते -नागनाथ कोत्तापल्ले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 03:44 IST

अनुभवांवर आधारित साहित्य मनाला भिडते. सर्वसाधारण लेखकाला लिखाणातून व्यक्त होताना काही धोकेही पत्करावे लागतात. तो धोके का पत्करतो, पत्करलेले धोके कसे हाताळतो, ते अनुभव कसे मांडतो हे सर्व घटक महत्त्वाचे ठरतात.

पुणे - अनुभवांवर आधारित साहित्य मनाला भिडते. सर्वसाधारण लेखकाला लिखाणातून व्यक्त होताना काही धोकेही पत्करावे लागतात. तो धोके का पत्करतो, पत्करलेले धोके कसे हाताळतो, ते अनुभव कसे मांडतो हे सर्व घटक महत्त्वाचे ठरतात. प्रशासकीय अधिकाऱ्यांना दररोज नानाविध प्रकारची माणसे, वृत्ती, प्रवृत्ती भेटत असतात. त्यामुळे प्रशासकीय नोकरीच्या निमित्ताने अनुभवाचे एक मोठे दालनच त्यांच्यापुढे उभे ठाकलेले असते, असे मत माजी संमेलनाध्यक्ष नागनाथ कोत्तापल्ले यांनी व्यक्त केले.रंगत-संगत प्रतिष्ठान आणि श्यामची आई फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा काव्यप्रतिभा पुरस्कार उपजिल्हाधिकारी आणि शरद पवार यांचे स्वीय सहायक कवी सतीश राऊत यांना देण्यात आला. त्या वेळी कोत्तापल्ले बोलत होते. या वेळी रंगत-संगत प्रतिष्ठानचे अ‍ॅड. प्रमोद आडकर आणि श्यामची आई फाऊंडेशनचे भारत देसडला उपस्थित होते.कोत्तापल्ले म्हणाले, ‘मराठी साहित्यास जागतिक पातळीवर ओळख मिळत नसल्याची खंत व्यक्त केली जाते. परंतु, मराठी साहित्यिकांचे अनुभवविश्व मर्यादित असल्याने ते वैश्विक अनुभवाशी नाळ जोडू शकत नाही. त्या तुलनेत कामाच्या स्वरूपामुळे प्रशासकीय अधिकाºयाचे अनुभवविश्व व्यापक असल्याने मराठी साहित्यात तो मोलाची भर टाकू शकतो.’अ‍ॅड. प्रमोद आडकर यांनी प्रास्ताविक केले. उद्धव कानडे यांनी सूत्रसंचालन केले.प्रशासनात असल्याने हाताळावे लागणारे शेतीचे तंटे, अनैतिक संबंधांमुळे निर्माण होणारे प्रश्न, जाती-पातीची भांडणे, दुष्काळ, छावण्या, निवडणुकीचे प्रसंग हेच माझ्या कवितेचे विषय होते. प्रेमकविता तुलनेने कमी लिहिल्या. माझ्या वरिष्ठ अधिकाºयांनी मला प्रोत्साहित केले. सरकारी अधिकाºयांमध्ये संवेदनशीलता नसते, हा समज काही अंशी खोडून काढण्यात यशस्वी झालो, याचे समाधान काव्यनिर्मितीमुळे मिळाले. - सतीश राऊत

टॅग्स :marathiमराठीnewsबातम्या