शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
3
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
4
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
5
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
8
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
9
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
10
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
11
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
12
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
13
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
14
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
15
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
16
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
17
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
18
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
19
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
20
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
Daily Top 2Weekly Top 5

पाणी वापरावर नाबार्डचे कृतिशील प्रबोधन - शिरसाळकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 00:49 IST

पाण्याची उपलब्धता ही आपल्यासमोरील मोठी समस्या आहे. पाण्याचा योग्य वापर आणि वाटप कसे होईल याकडे लक्ष देण्याची गरज आहे. उसाचे क्षेत्र केवळ चार टक्के आहे. मात्र, ऊस एकूण शेतीच्या ७० टक्के पाणी पितो.

पाण्याची उपलब्धता ही आपल्यासमोरील मोठी समस्या आहे. पाण्याचा योग्य वापर आणि वाटप कसे होईल याकडे लक्ष देण्याची गरज आहे. उसाचे क्षेत्र केवळ चार टक्के आहे. मात्र, ऊस एकूण शेतीच्या ७० टक्के पाणी पितो. याबाबत शेतकऱ्यांमध्ये जागृती करण्यासाठी नाबार्ड पुढाकार घेणार असून, त्यासाठी पतपुरवठादेखील करणार आहे. तसा प्रस्ताव केंद्र सरकारला दिला असल्याची माहिती नॅशनल बँक फॉर अ‍ॅग्रीकल्चर अ‍ॅण्ड रुरल डेव्हलपमेंटच्या (नाबार्ड) पुणे क्षेत्रीय कार्यालयाचे मुख्य महाव्यवस्थापक उदय शिरसाळकर यांनी नाबार्डच्या वर्धापन दिनाच्या (१२ जुलै) पार्श्वभूमीवर दिली.देशासह राज्यातील शेती ही संपूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे खरीप हंगामच शेती उत्पादनाचा मुख्य हंगाम आहे. रब्बीचा टक्का त्या तुलनेत फारच कमी आहे. त्यामुळे पाण्याची उपलब्धतता ही महाराष्ट्रापुढील सर्वांत मोठी समस्या आहे. शेतीखालील एकूण क्षेत्रापैकी फक्त १८ ते २० क्षेत्र सिंचनाखाली आहे. त्यातही ऊस व कापूस यासारख्या नगदी पिकांना लागणाºया पाण्याचे प्रमाण जास्त आहे.राज्याच्या एकूण कृषी क्षेत्रापैकी केवळ ४ टक्के क्षेत्रावर उसाचे पीक घेतले जाते. पण या पिकासाठी एकूण सिंचनासाठी वापरण्यात येणाºया पाण्याच्या ७० टक्के पाणी वापरले जाते. ही बाब महाराष्ट्रासारख्या अवर्षणग्रस्त राज्यासाठी चिंतेची आहे. असे असले तरी फारमोठा शेतकरीवर्ग या पिकावर अवलंबून आहे. त्यामुळे ऊसपीक घेऊ नको असा सल्ला कोणी देणार नाही. ठिबक, तुषार सिंचनाद्वारे पाण्याचा नियंत्रित वापर करूनही ऊसपीक घेता येते. त्याबाबत नाबार्ड अभियान राबवित आहे.राज्यात उसाचे मोठ्या प्रमाणावर क्षेत्र असलेल्या भागात जलदूतामार्फत जागृती अभियान राबविण्यात येत आहे. शासनाचे विविध विभाग, बँका, सहकारी संस्था, साखर कारखाने, स्वयंसेवी संस्था यांची देखील या कामी मदत घेतली जाणार आहे.मराठवाडा, विदर्भातील काही जिल्ह्यांसह कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा आणि पुणे अशा विविध १० जिल्ह्यांतील ५ हजारांहून अधिक गावांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट आहे. राज्यातील १० लाख हेक्टर क्षेत्र ठिबक आणि तुषार सिंचनाखाली आणण्याचा मानस आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाने २०१९पर्यंत त्यातील साडेसात लाख हेक्टर ऊस क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्या नुसार नियोजन करण्यात येणार आहे. या शिवाय राज्यातील प्रलंबित असणाºया जलसिंचन प्रकल्पांना तब्बल ७ हजार कोटी रुपयांचा पतपुरवठा करण्यात येणार आहे. पुढील तीन वर्षांत ही रक्कम टप्प्याटप्प्याने दिली जाईल. त्यामुळे तब्बल साडेसात लाख हेक्टर सिंचनाखाली येईल.कृषी विभागासाठी दूध संकलन आणि प्रक्रिया उद्योग महत्त्वाची भूमिका बजावत असतो. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात दूधभुकटीचे भाव कोसळल्याने उद्योगावर संकटाची स्थिती निर्माण झाली आहे. सध्या नाबार्डच्या माध्यमातून डेअरी उद्यम विकास योजना आणि कृषी व्यवसाय केंद्रासाठी पतपुरवठा केला जातो. तसेच त्याच्या प्रकल्प उभारणीसाठी अनुदानही मिळते. हा सर्व व्यवहार बँकांच्या माध्यमातून होतो. नाबार्ड बँकांकडून आलेल्या प्रस्तावाला मंजुरी देते. हा व्यवहार आॅनलाईन होतो. तसेच नुकतीच नॅशनल डेअरी डेव्हलपमेंटच्या माध्यमातून डेअरी इन्फ्रा ही योजना राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत सहकारी दूध संकलन करणाºया पेढ्यांना यंत्रसामग्री अद्ययावत करण्यासाठी पतपुरवठा करण्यात येणार आहे. संबंधित दूध संकलन केंद्रांना त्यासाठी डेअरी बोर्डाकडे अर्ज करावा लागेल.नाबार्ड ही स्वत:ची योजना राबवित नाही. सरकारने योजनानिहाय मंजूर केलेल्या निधीनुसार त्याचा पतपुरवठा केला जातो. तसेच सरकारकडून एखादी योजनासुरू अथवा बंद केली जाऊशकते. तसेच त्याचा निधीदेखील धोरणानुसार नियंत्रित केला जाऊ शकतो. त्यामध्ये नाबार्डची स्वत:ची भूमिका नसते. 

टॅग्स :Waterपाणीnewsबातम्या