शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

mutha Canal : जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करा, महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत जोरदार पडसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 01:53 IST

शहराच्या मध्यवस्तीतून वाहणा-या मुठा कालव्याची स्थिती अत्यंत दयनीय झाली असून, तातडीने दुरुस्ती करण्याची गरज आहे. परंतु यासाठी महापालिका प्रशासनाकडून वारंवार जलसंपदा विभागाकडे पाठपुरावा करूनदेखील दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप सदस्यांनी केला.

पुणे : शहरातील कालवाफुटीच्या दुर्घटनेची महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत जोरदार पडसाद उमटले. शहराच्या मध्यवस्तीतून वाहणा-या मुठा कालव्याची स्थिती अत्यंत दयनीय झाली असून, तातडीने दुरुस्ती करण्याची गरज आहे. परंतु यासाठी महापालिका प्रशासनाकडून वारंवार जलसंपदा विभागाकडे पाठपुरावा करूनदेखील दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप सदस्यांनी केला. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकाºयांवर कडक कारवाई करण्याची मागणी या वेळी केली.सिंहगड रोडवरील जनता वसाहतीमधून जाणारा मुठा उजवा कालवा सकाळी सव्वाआकरा वाजता फुटल्याने परिसरात गंभीर पूरस्थिती निर्माण झाली होती.या भागातील झोपडपट्ट्यांमध्ये पाणी शिरल्याने अनेक कुटुंबांचे संसार रस्त्यावर आले. या दुर्घटनेला जबाबदार नसल्याचे सांगत महापालिका तसेच जलसंपदा विभागाने आपले हात वर केले. या प्रकाराचे तीव्र पडसाद गुरुवारी झालेल्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत उमटले. या सर्व प्रकाराला पालिकेचा हलगर्जीपणा जबाबदार असून, कालव्याच्या भिंतीची अवस्था चांगली नाही, तातडीने त्याची दुरुस्ती करावी, असे पत्र स्थानिक नगरसेवकांनी प्रशासनास दिल्यानंतरही याची कोणतीही दखल अधिकाºयांनी घेतली नसल्याचा आरोप केला.खडकवासला ते पर्वती हे बंद पाइपलाइनचे काम करताना काही परिस्थिती निर्माण झाली तर त्याची संपूर्ण जबाबदारी पालिकेची राहील, असे जलसंपदा विभागाने कळवून देखील पालिकेतील अधिकाºयांनी याकडे सतत दुर्लक्ष केल्याचा आरोप सभासदांनी केला. याला जबाबदार असलेल्या अधिकाºयांची चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी या वेळी केली.मुठा उजवा कालव्याला भगदाड पडल्याने निर्माण झालेल्या परिस्थिवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक ती पावले प्रशासनाने उचलली आहेत. ज्या नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे, त्यांच्या राहण्याची तसेत खाण्याची व्यवस्था जवळच्या शाळेत केली आहे.या दुर्घटनेचा समावेश नैसर्गिक आपत्तीमध्ये करून येथील नागरिकांना अधिकाधिक मदत कशी मिळेल, यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीकडे प्रस्ताव पाठविले जाणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त शीतल उगले-तेली यांनी सांगितले. अशा घटना पुन्हा होऊ नयेत, यासाठी शहरातून जाणाºया कालव्यांचे आॅडिट करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.अनधिकृत केबल खोदाईची चौकशी कराज्या ठिकाणी हे भगदाड पडले आहे, तेथे काही कंपन्यांच्या केबल आहेत. त्यामुळे तेथील जमीन भुसभुशीत झाली आहे, या कंपन्यांना केबल टाकण्यासाठी कोणी परवानगी दिली, याची चौकशी करावी. शहरातील अनेक भागांमधील नागरिकांना अद्यापही पुरेसे पाणी मिळत नसताना कालव्याच्या माध्यमातून एवढे पाणी कोणतीही कल्पना न देता कसे सोडले जाते, याचीदेखील चौकशी झाली पाहिजे, असे विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी सांगितले.कालवा समितीची बैठक अद्यापही झालेली नसताना एवढ्या मोठ्या प्रमाणात कालव्यातून पाणी कोणाच्या फायद्यासाठी सोडले जात होते, याची चौकशी झाली पाहिजे. पालिकेला कालव्याद्वारे ३०० क्युसेक्स पाणीपुरवठा केला जात असताना १३०० क्युसेक्स पाणी कोणाच्या आदेशाने सोडले जात होते.- अरविंद शिंदे, काँगे्रसचे गटनेतेप्रशासनाच्या दुर्लक्षामुळे दुर्घटना...स्थानिक लोकप्रतिनिधींकडून वेळोवेळी मागणी करून देखील महापालिका प्रशासन आणि जलसंपदा खात्याकडून दर्लक्ष केले जाते. यामुळेच ही दुर्घटना झाली असून, ठेकेदाराने दिलेल्या मुदतीत काम न केल्यानेच कालवा फुटला. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे.- श्रीनाथ भिमाले, महापालिका, सभागृह नेते

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या