शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

mutha Canal : जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करा, महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत जोरदार पडसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 01:53 IST

शहराच्या मध्यवस्तीतून वाहणा-या मुठा कालव्याची स्थिती अत्यंत दयनीय झाली असून, तातडीने दुरुस्ती करण्याची गरज आहे. परंतु यासाठी महापालिका प्रशासनाकडून वारंवार जलसंपदा विभागाकडे पाठपुरावा करूनदेखील दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप सदस्यांनी केला.

पुणे : शहरातील कालवाफुटीच्या दुर्घटनेची महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत जोरदार पडसाद उमटले. शहराच्या मध्यवस्तीतून वाहणा-या मुठा कालव्याची स्थिती अत्यंत दयनीय झाली असून, तातडीने दुरुस्ती करण्याची गरज आहे. परंतु यासाठी महापालिका प्रशासनाकडून वारंवार जलसंपदा विभागाकडे पाठपुरावा करूनदेखील दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप सदस्यांनी केला. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकाºयांवर कडक कारवाई करण्याची मागणी या वेळी केली.सिंहगड रोडवरील जनता वसाहतीमधून जाणारा मुठा उजवा कालवा सकाळी सव्वाआकरा वाजता फुटल्याने परिसरात गंभीर पूरस्थिती निर्माण झाली होती.या भागातील झोपडपट्ट्यांमध्ये पाणी शिरल्याने अनेक कुटुंबांचे संसार रस्त्यावर आले. या दुर्घटनेला जबाबदार नसल्याचे सांगत महापालिका तसेच जलसंपदा विभागाने आपले हात वर केले. या प्रकाराचे तीव्र पडसाद गुरुवारी झालेल्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत उमटले. या सर्व प्रकाराला पालिकेचा हलगर्जीपणा जबाबदार असून, कालव्याच्या भिंतीची अवस्था चांगली नाही, तातडीने त्याची दुरुस्ती करावी, असे पत्र स्थानिक नगरसेवकांनी प्रशासनास दिल्यानंतरही याची कोणतीही दखल अधिकाºयांनी घेतली नसल्याचा आरोप केला.खडकवासला ते पर्वती हे बंद पाइपलाइनचे काम करताना काही परिस्थिती निर्माण झाली तर त्याची संपूर्ण जबाबदारी पालिकेची राहील, असे जलसंपदा विभागाने कळवून देखील पालिकेतील अधिकाºयांनी याकडे सतत दुर्लक्ष केल्याचा आरोप सभासदांनी केला. याला जबाबदार असलेल्या अधिकाºयांची चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी या वेळी केली.मुठा उजवा कालव्याला भगदाड पडल्याने निर्माण झालेल्या परिस्थिवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक ती पावले प्रशासनाने उचलली आहेत. ज्या नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे, त्यांच्या राहण्याची तसेत खाण्याची व्यवस्था जवळच्या शाळेत केली आहे.या दुर्घटनेचा समावेश नैसर्गिक आपत्तीमध्ये करून येथील नागरिकांना अधिकाधिक मदत कशी मिळेल, यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीकडे प्रस्ताव पाठविले जाणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त शीतल उगले-तेली यांनी सांगितले. अशा घटना पुन्हा होऊ नयेत, यासाठी शहरातून जाणाºया कालव्यांचे आॅडिट करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.अनधिकृत केबल खोदाईची चौकशी कराज्या ठिकाणी हे भगदाड पडले आहे, तेथे काही कंपन्यांच्या केबल आहेत. त्यामुळे तेथील जमीन भुसभुशीत झाली आहे, या कंपन्यांना केबल टाकण्यासाठी कोणी परवानगी दिली, याची चौकशी करावी. शहरातील अनेक भागांमधील नागरिकांना अद्यापही पुरेसे पाणी मिळत नसताना कालव्याच्या माध्यमातून एवढे पाणी कोणतीही कल्पना न देता कसे सोडले जाते, याचीदेखील चौकशी झाली पाहिजे, असे विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी सांगितले.कालवा समितीची बैठक अद्यापही झालेली नसताना एवढ्या मोठ्या प्रमाणात कालव्यातून पाणी कोणाच्या फायद्यासाठी सोडले जात होते, याची चौकशी झाली पाहिजे. पालिकेला कालव्याद्वारे ३०० क्युसेक्स पाणीपुरवठा केला जात असताना १३०० क्युसेक्स पाणी कोणाच्या आदेशाने सोडले जात होते.- अरविंद शिंदे, काँगे्रसचे गटनेतेप्रशासनाच्या दुर्लक्षामुळे दुर्घटना...स्थानिक लोकप्रतिनिधींकडून वेळोवेळी मागणी करून देखील महापालिका प्रशासन आणि जलसंपदा खात्याकडून दर्लक्ष केले जाते. यामुळेच ही दुर्घटना झाली असून, ठेकेदाराने दिलेल्या मुदतीत काम न केल्यानेच कालवा फुटला. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे.- श्रीनाथ भिमाले, महापालिका, सभागृह नेते

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या