शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

mutha Canal : जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करा, महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत जोरदार पडसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 01:53 IST

शहराच्या मध्यवस्तीतून वाहणा-या मुठा कालव्याची स्थिती अत्यंत दयनीय झाली असून, तातडीने दुरुस्ती करण्याची गरज आहे. परंतु यासाठी महापालिका प्रशासनाकडून वारंवार जलसंपदा विभागाकडे पाठपुरावा करूनदेखील दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप सदस्यांनी केला.

पुणे : शहरातील कालवाफुटीच्या दुर्घटनेची महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत जोरदार पडसाद उमटले. शहराच्या मध्यवस्तीतून वाहणा-या मुठा कालव्याची स्थिती अत्यंत दयनीय झाली असून, तातडीने दुरुस्ती करण्याची गरज आहे. परंतु यासाठी महापालिका प्रशासनाकडून वारंवार जलसंपदा विभागाकडे पाठपुरावा करूनदेखील दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप सदस्यांनी केला. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकाºयांवर कडक कारवाई करण्याची मागणी या वेळी केली.सिंहगड रोडवरील जनता वसाहतीमधून जाणारा मुठा उजवा कालवा सकाळी सव्वाआकरा वाजता फुटल्याने परिसरात गंभीर पूरस्थिती निर्माण झाली होती.या भागातील झोपडपट्ट्यांमध्ये पाणी शिरल्याने अनेक कुटुंबांचे संसार रस्त्यावर आले. या दुर्घटनेला जबाबदार नसल्याचे सांगत महापालिका तसेच जलसंपदा विभागाने आपले हात वर केले. या प्रकाराचे तीव्र पडसाद गुरुवारी झालेल्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत उमटले. या सर्व प्रकाराला पालिकेचा हलगर्जीपणा जबाबदार असून, कालव्याच्या भिंतीची अवस्था चांगली नाही, तातडीने त्याची दुरुस्ती करावी, असे पत्र स्थानिक नगरसेवकांनी प्रशासनास दिल्यानंतरही याची कोणतीही दखल अधिकाºयांनी घेतली नसल्याचा आरोप केला.खडकवासला ते पर्वती हे बंद पाइपलाइनचे काम करताना काही परिस्थिती निर्माण झाली तर त्याची संपूर्ण जबाबदारी पालिकेची राहील, असे जलसंपदा विभागाने कळवून देखील पालिकेतील अधिकाºयांनी याकडे सतत दुर्लक्ष केल्याचा आरोप सभासदांनी केला. याला जबाबदार असलेल्या अधिकाºयांची चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी या वेळी केली.मुठा उजवा कालव्याला भगदाड पडल्याने निर्माण झालेल्या परिस्थिवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक ती पावले प्रशासनाने उचलली आहेत. ज्या नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे, त्यांच्या राहण्याची तसेत खाण्याची व्यवस्था जवळच्या शाळेत केली आहे.या दुर्घटनेचा समावेश नैसर्गिक आपत्तीमध्ये करून येथील नागरिकांना अधिकाधिक मदत कशी मिळेल, यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीकडे प्रस्ताव पाठविले जाणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त शीतल उगले-तेली यांनी सांगितले. अशा घटना पुन्हा होऊ नयेत, यासाठी शहरातून जाणाºया कालव्यांचे आॅडिट करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.अनधिकृत केबल खोदाईची चौकशी कराज्या ठिकाणी हे भगदाड पडले आहे, तेथे काही कंपन्यांच्या केबल आहेत. त्यामुळे तेथील जमीन भुसभुशीत झाली आहे, या कंपन्यांना केबल टाकण्यासाठी कोणी परवानगी दिली, याची चौकशी करावी. शहरातील अनेक भागांमधील नागरिकांना अद्यापही पुरेसे पाणी मिळत नसताना कालव्याच्या माध्यमातून एवढे पाणी कोणतीही कल्पना न देता कसे सोडले जाते, याचीदेखील चौकशी झाली पाहिजे, असे विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी सांगितले.कालवा समितीची बैठक अद्यापही झालेली नसताना एवढ्या मोठ्या प्रमाणात कालव्यातून पाणी कोणाच्या फायद्यासाठी सोडले जात होते, याची चौकशी झाली पाहिजे. पालिकेला कालव्याद्वारे ३०० क्युसेक्स पाणीपुरवठा केला जात असताना १३०० क्युसेक्स पाणी कोणाच्या आदेशाने सोडले जात होते.- अरविंद शिंदे, काँगे्रसचे गटनेतेप्रशासनाच्या दुर्लक्षामुळे दुर्घटना...स्थानिक लोकप्रतिनिधींकडून वेळोवेळी मागणी करून देखील महापालिका प्रशासन आणि जलसंपदा खात्याकडून दर्लक्ष केले जाते. यामुळेच ही दुर्घटना झाली असून, ठेकेदाराने दिलेल्या मुदतीत काम न केल्यानेच कालवा फुटला. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे.- श्रीनाथ भिमाले, महापालिका, सभागृह नेते

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या