शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
5
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
6
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
7
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
8
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
9
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
10
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचा युवा स्टार म्हणतो- "मला टीम इंडियाकडून खेळायचंय, पण..."
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
12
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
14
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
15
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
16
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
17
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
18
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
19
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
20
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?

Mutha Canal : अाश्वासने गेली हवेत विरुन अन पुढारी अाता नाॅट रिचेबल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2018 18:58 IST

मुठा कालवा फुटून घरे जमीनदाेस्त झालेल्यांना अजून सरकारी मदत मिळाली नसल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे अाहे.

पुणे : दाेन अाठवडे उलटून गेले असले तरी दांडेकर पूल वसाहतीतील नागरिक सरकारी मदतीच्या प्रतिक्षेत अाहेत. मुठा कालवा दुर्घटना घडल्यानंतर सरकारकडून माेठ माेठी अाश्वासने देण्यात अाली, घरांचे पंचनामे करण्यात अाले परंतु निधी काही मिळाला नाही, असा अाराेप येथील रहिवासी करत अाहेत. ज्यांची घरं या दुर्घटनेत जमीनदाेस्त झाली ते राेज अापल्या घराकडे हताश हाेऊन पाहत बसतात. घर नाही त्यामुळे कामावर जाता येत नाही, अाणि कामावर नाही म्हंटल्यावर राेजगार नाही. अशा कात्रीत सध्या येथील रहिवासी सापडले अाहेत. घटना घडल्यानंतर काही दिवस नेते मंडळींनी भेटी दिल्या. सध्या मात्र हे पुढारी नाॅट रिचेबल असल्याचे रहिवाशांनी लाेकमतशी बाेलताना सांगितले. 

    27 सप्टेंबरला मुठा कालवा फुटून त्याचे पाणी दांडेकर पूल वसाहतीत शिरले. त्यामुळे शेकडाे नागरिक क्षणार्धात बेघर झाले. मुख्यमंत्र्यांनी या नागरिकांना पाच काेटीची मदत तात्काळ जाहीर केली हाेती. तसेच महापालिकेकडून सुद्धा मदतीचे अाश्वासन देण्यात अाले हाेते. परंतु अाता दाेन अाठवडे उलटून गेले असले तरी मदत मिळाली नसल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे अाहे. पालिकेने या नागरिकांची साेय सर्जेराव साळवे प्राथमिक विद्यालयात केली अाहे. परंतु किती दिवस त्या शाळेत राहणार असा प्रश्न येथील नागरिक विचारतायेत. त्यांना त्यांचे घर पुन्हा हवे अाहे. घरच राहिलं नसल्याने मुलांच्या शाळेचा प्रश्न सुद्धा निर्माण झाला अाहे. सध्या हे लाेक येथील बुद्ध विहार तसेच समाज मंदिरात राहत अाहेत. परंतु अंगावर घालण्यासाठी कपड्याशिवाय त्यांच्याकडे काहीच नसल्याने अाता जगायचे कसे असा प्रश्न त्यांना सतवात अाहे. पडक्या घराकडे बघत बसण्याशिवाय कुठलाही पर्याय त्यांच्याकडे अाता उरलेला नाही. शासनाने पैशांएेवजी घर द्यावे ही त्यांची मागणी अजूनही कायम अाहे. 

    येथे राहणारे सचिन दिवटे म्हणाले, दाेन अाठवडे झाले तरी सरकारची कुठलिही मदत अाम्हाला मिळाली नाही. अामच्याकडे काहीच उरले नाही. काही संस्था कपडे देत अाहेत, त्यामुळे केवळ अंगावर घालण्यासाठी कपडे अापच्याकडे अाहेत. घर नसल्याने कामावर जाणे शक्य नाही, त्यामुळे राेजगार नाही. पडक्या घराकडे हताश हाेऊन बघण्याशिवाय अामच्याकडे पर्याय नाही. सरकारने अाम्हाला घर बांधून द्यायला हवे. 

    हनिफ पटेल म्हणाले, घर नसल्याने येथील बुद्ध विहारात अाणि समाज मंदिरात अाम्ही राहताे. घर कधी परत मिळेल माहित नाही. सर्वांची अवस्था बिकट अाहे. स्त्रीयांच्या सुरक्षेचा प्रश्न सुद्धा निर्माण झाला अाहे. सरकारने अामच्याकडे लक्ष द्यायला हवे.  

टॅग्स :mula muthaमुळा मुठाPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाState Governmentराज्य सरकार