शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
2
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
3
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
4
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
5
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
6
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
7
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
8
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
9
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
10
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
11
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
12
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
13
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
14
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
15
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
16
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
17
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
18
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
19
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
20
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा

बहुभाषिक संमेलन सांस्कृ तिक मानदंडाचे

By admin | Updated: March 4, 2016 00:15 IST

बहुभाषिक संमेलन हे केवळ शब्दांच्या बुडबुड्यांचे नव्हे, तर सांस्कृतिक मानदंडाच्या बेरजेचे संमेलन आहे. यातून भारताचा एक नवा मानदंड प्रस्थापित होईल

पुणे : बहुभाषिक संमेलन हे केवळ शब्दांच्या बुडबुड्यांचे नव्हे, तर सांस्कृतिक मानदंडाच्या बेरजेचे संमेलन आहे. यातून भारताचा एक नवा मानदंड प्रस्थापित होईल, जो उजव्या आणि डाव्यांच्या संघर्षातूनही होणार नसल्याचे स्पष्ट मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र आणि पंजाबचा सांस्कृतिक दुवा साधणाऱ्या ‘घुमान’ या संत नामदेवांच्या कर्मभूमीत ३ व ४ एप्रिल रोजी ‘भारतीय भाषांसाठी मराठीचा पुढाकार’ या ब्रीदवाक्यांतर्गत ‘बहुभाषिक साहित्य संमेलन’ सरहद्द संस्थेने आयोजित केले आहे. या संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण डॉ. सबनीस आणि माजी संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते गुरुवारी झाले. त्या वेळी अध्यक्षीय भाषणात सबनीस बोलत होते.संमेलनाचे स्वागताध्यक्ष अरूण नेवासकर, समन्वयक राजन खान, भारत देसडला, डॉ. सतीश देसाई आणि सरहद्दचे संजय नहार उपस्थित होते.डॉ. सबनीस म्हणाले, ‘‘संत नामदेव यांची वैचारिकता भक्ती, अध्यात्म्य यापुरतीच सीमित न राहता सांस्कृतिक राष्ट्रवादाकडे नेणारी आहे. महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून गेलेले त्यांचे संतत्व हे सांस्कृतिक ऐक्याचे केंद्र बनले आहे. भाषा, जात आणि धर्म या अंगाने विभागला गेलेला भारत आता विवेकाच्या रूपाने मजबूत करायचा असेल, तर संत नामदेवांचे संतत्व आणि कर्तव्य उपयोगी पडेल. सत्य आणि संतत्वाला धर्म नसतो. म्हणूनच नामदेव हे आदर्श राष्ट्रवादाचा मानदंड होऊ शकतात.’’ कुरुपता, विद्रूपता आणि क्रौर्याविरुद्ध शांततेचा मानदंड म्हणजे संत नामदेव असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. मोरे यांनी, भारतीय भाषांचे प्रतिनिधित्व करण्याची क्षमता मराठीमध्ये आहे. आज प्रादेशिक भाषांचे अस्तित्व धोक्यात आलेले असताना मराठीने पुढाकार घेऊन इतर भाषांना स्थान देण्याचा करावा, याकडे लक्ष वेधले. संजय नहार यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)घुमान येथे होणाऱ्या बहुभाषिक साहित्य संमेलनाला साहित्य आणि कला क्षेत्रातून काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतच्या भागामधील सुमारे १०० मान्यवर उपस्थित राहणार असून, दीड दिवस चालणाऱ्या या संमेलनाला १५० ते २०० लोक भेट देतील, असे राजन खान यांनी सांगितले. घुमानला बाबा नामदेव विद्यालय सुरू होणारघुमानच्या साहित्य संंमेलनाने काय दिले, असा प्रश्न विचारला जातो. आज पंजाब सरकारच्या पुढाकाराने घुमानला बाबा नामदेव महाविद्यालयाच्या इमारतीचे काम पूर्णत्वास आले असून, येत्या शैक्षणिक वर्षात हे महाविद्यालय सुरू होईल. तसेच शेतकऱ्यांनी भाषा भवन उभारणीसाठी दीड एकर जमीन दिली आहे, त्याचे भूमिपूजन लवकरच केले जाणार आहे. संत नामदेव एक्स्प्रेस सुरू करण्याची मागणी आम्ही केली होती; मात्र एक्स्प्रेस सुरू न होता एखादी गाडी जम्मू व्हाया बियास, पठाणकोट जाईल असा मार्ग निश्चित केला जाणार आहे, याची तरतूद पुढील वर्षीच्या रेल्वे अंदाजपत्रकात करण्याचे आश्वासन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिले असल्याचे संजय नहार यांनी सांगितले.