शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

‘एमपीएससी’ म्हणजे घोळात घोळच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अमोल अवचिते पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) घेण्यात येणाऱ्या परीक्षेची तारीख बदलल्याने गुरुवारी (दि. ११) ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अमोल अवचिते

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) घेण्यात येणाऱ्या परीक्षेची तारीख बदलल्याने गुरुवारी (दि. ११) राज्यभरचे विद्यार्थी संतप्त होऊन रस्त्यावर उतरले. मात्र परीक्षा वेळेत न घेणे, निकाल रखडवणे या प्रकारातून विद्यार्थ्यांना मनस्ताप देण्याची एमपीएससीची परंपराच असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. या दिव्यातून पार पडल्यानंतर नियुक्त्या प्रलंबित राहण्याचीही टांगती तलवार असते, अशी विद्यार्थ्यांची तक्रार आहे.

एमपीएससी ने २०१८ आणि २०१९ साली घेतलेल्या परीक्षांबाबत गंभीर होण्याची गरज आहे. आरक्षणाच्या लढाईत तसेच न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेल्या परीक्षा सोडून इतर परीक्षांचे तरी निकाल लावावेत. जेणेकरून निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा नियुक्तीचा प्रश्न सुटेल. रखडलेल्या मुलाखती पार पडतील, अशी कळकळीची विनंती विद्यार्थी करतात.

एमपीएससीने राज्यसेवा २०१९ परीक्षा ४२० पदांसाठी घेतली. या परीक्षेची जाहिरात १० डिसेंबर २०१८ ला प्रसिद्ध करण्यात आली. पूर्व परीक्षा १७ फेब्रुवारी तर मुख्य परीक्षा १३ ते १५ जुलै २०१९ रोजी घेण्यात आली. अंतिम निकाल १९ जून २०२० रोजी लावण्यात आला. एकूण ४२० पदांपैकी ४१३ उमेदवार निवडण्यात आले. या संपूर्ण प्रक्रियेला दीड वर्षाचा कालवधी होऊन गेला आहे. शासन नियमानुसार तीन महिन्यांत नियुक्ती देणे बंधनकारक आहे. मात्र राज्य सरकार मराठा आरक्षणाचे कारण पुढे करत नियुक्ती देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे विद्यार्थ्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

दि. ९ सप्टेंबर २०२० सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार एसईबीसी आरक्षणाला स्थगिती देण्यात आली. कोणतीही नियुक्ती एसईबीसी आरक्षणानुसार देण्यात येऊ नये असे नमूद करण्यात आले. या निर्णयाने ४१३ पैकी एसईबीसी आरक्षणाचा लाभ घेऊन पास झालेल्या विद्यार्थ्यांच्या नियुक्तीवर स्थगिती आली. परंतु ४८ विद्यार्थ्यांमुळे इतर संवर्गातील ३६५ विद्यार्थ्यांच्या नियुक्त्या कोणतेही कारण न देता सरकारने रखडवल्या आहेत. यामुळे अन्य जाती-संवर्गातील विद्यार्थ्यांवर सरकार अन्याय करीत असल्याची भावना विद्यार्थ्यांमध्ये आहे.

९ डिसेंबर २०२० रोजी ५ न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीत मराठा आरक्षण कायद्याअंतर्गत येणाऱ्या नियुक्त्या वगळून इतर नियुक्त्या देण्यास राज्य सरकारला रोखलेले नसल्याचे न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले आहे. त्यामुळे एसईबीसी व्यतिरिक्त इतर उमेदवारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाल्याचे एका विद्यार्थ्यांने ‘लोकमत’ला सांगितले.

चौकट

‘एमपीएससी’चे रडगाणे

-एक अध्यक्ष आणि एका सदस्यावर कारभार सुरू आहे. रिक्त असलेली चार सदस्य संख्या पूर्ण भरली गेली तर एमपीएससीला पूर्ण क्षमेतेने काम करता येईल असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

-रिक्त सदस्यांची पदे न भरल्याने केवळ दोन सदस्यांना मुलाखती घ्याव्या लागत आहेत.

चौकट

उत्तीर्ण होऊनही रखडल्या नियुक्त्या

स्थापत्य अभियांत्रिकी - ३६७१

पोलीस उपनिरीक्षक - २१२७

पशुधन विकास अधिकारी - १३०० (निकाल घोषित होणे आहे. )

चौकट

निकाल लागूनही प्रतीक्षा

-संयुक्त पूर्व परीक्षा गट ब २०१९ ची ५५५ पदांसाठी घेण्यात आली. मार्च २०२० मध्ये निकाल लागला मात्र अजून अंतिम निकाल लागलेला नाही. यात पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) पदांसाठी ४६९ जागांसाठी परीक्षा घेण्यात आली. मुख्य परीक्षेचा निकाल मार्च २०२० मध्ये निकाल जाहीर झाला. मात्र १५ महिने होऊनही शारीरिक चाचणीसाठी बोलावले नाही.

-२०१८ पीएसआय - ३८७ उमेदवारांची निवड झाली. अजून ते प्रशिक्षणाच्या प्रतीक्षेत आहेत.

-स्थापत्य अभियांत्रिकी २४ नोव्हेंबर २०१९ रोजी सुमारे ११६१ पदांसाठी परीक्षा घेण्यात आली. निकाल जुलै २०२० मध्ये लावण्यात आला. मात्र मुलाखती रखडलेल्या आहेत. याच परीक्षेचा अंतिम निकाल लागला नसतानाही आता २७ मार्च रोजी २०२० ची २१७ पदांसाठी पूर्व परीक्षा होणार आहे. त्यामुळे आधीच्या परीक्षांची प्रक्रिया पूर्ण न होताच नव्याने परीक्षा घेतली जात आहे.

-सहायक मोटार वाहन निरीक्षक (आरटीओ) या पदाची सुमारे २५० जागांची पूर्व परीक्षा होऊन एक वर्ष होत आले आहे. निकाल अजूनही जाहीर नाही.