शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

गोवंशहत्याबंदीसाठी चाकणमध्ये आंदोलन

By admin | Updated: July 27, 2015 03:57 IST

चाकणच्या गुरांच्या बाजारात अवैधरीत्या कत्तलीसाठी होणारी गोवंशाची खरेदी-विक्री बंद झालीच पाहिजे, अशी मागणी अखिल भारत कृषी गोसेवा

चाकण : चाकणच्या गुरांच्या बाजारात अवैधरीत्या कत्तलीसाठी होणारी गोवंशाची खरेदी-विक्री बंद झालीच पाहिजे, अशी मागणी अखिल भारत कृषी गोसेवा संघाचे मिलिंद एकबोटे यांनी चाकण (ता. खेड) येथील खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजारात केली.चाकणमधील गुरांच्या बाजारात अद्यापही मोठ्या प्रमाणावर गाई-बैलांची अवैध खरेदी विक्री होत असल्याचा आरोप करीत गोवंशहत्याबंदी कायदा मार्च महिन्यात मंजूर होऊनसुद्धा चाकणच्या बाजारात या कायद्याची अंमलबजावणी अजिबात होत नसल्याचे सांगत मिलिंद एकबोटे यांच्या नेतृत्वाखाली खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील उपबाजारात प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे प्रबोधन करण्यासाठी समस्त हिंदू आघाडीच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करीत आंदोलन करण्यात आले. या वेळी गोवंश रक्षणासाठी शेतकऱ्यांचे प्रबोधनही करण्यात आले. या वेळी बजरंग दल आणि पुणे जिल्ह्यातील सर्व गोप्रेमी संघटनांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.या वेळी पंचायत समिती सदस्य अमृत शेवकरी, बाजार समितीचे प्रशासक हर्षित तावरे, सचिव सतीश चांभारे, मार्केट असोसिएशनचे राम गोरे, माणिक गोरे, जमीर काझी, फिरंगोजी नरसाळा स्मारक प्रतिष्ठानचे राहुल वाडेकर, अनंता देशमुख, किरण झिंजुरके, संतोष रत्नपारखी आदींसह अखिल भारत कृषी गोसेवा संघाचे कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते. दरम्यान आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अनेक शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी येथील गुरांच्या बाजाराकडे पाठ फिरविली. त्यामुळे गुरांच्या बाजारात शुकशुकाट होता. (वार्ताहर)