शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

पुण्यामध्ये सर्वाधिक दावे निकाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 01:51 IST

राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने दर तीन महिन्यांनी आयोजिण्यात येत असलेल्या महालोकअदालतीमध्ये दावे निकाली काढण्यात पुणे जिल्ह्याने पहिला क्रमांक मिळवला.

पुणे : राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने दर तीन महिन्यांनी आयोजिण्यात येत असलेल्या महालोकअदालतीमध्ये दावे निकाली काढण्यात पुणे जिल्ह्याने पहिला क्रमांक मिळवला.राज्यात ३४ जिल्ह्यांत ८ सप्टेंबरला महालोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये एकूण ७ लाख ७९ हजार ५८३ खटले तडजोडीसाठी ठेवण्यात आले होते. त्यापैकी १ लाख ३८ हजार ६४ दावे निकाली काढण्यात आले. पुणे जिल्ह्यात ७९ हजार ३१२ दावे तडजोडीसाठी ठेवण्यात आले होते. त्यापैकी ३७ हजार ७२१ दावे निकाली काढण्यात आले, तर सातारा जिल्ह्याने दुसरा क्रमांक पटकाविला आहे. तेथे १ लाख १७ हजार ७२१ पैकी ३२ हजार ६१५ दावे निकाली निघाले. त्यानंतर तिसरा क्रमांक रागयड जिल्ह्याचा लागला. रायगडमध्ये ५९ हजार ९२७ दावे तडजोडीसाठी ठेवण्यात आले होते. त्यापैकी १४ हजार ५१४ दावे निकाली काढण्यात आले. पुण्यात निकाली काढलेल्या दाव्यात ३५ हजार ४४७ दावे दाखलपूर्व आहेत, तर २ हजार २७४ दावे प्रलंबित स्वरूपाचे आहेत. यात ३९ कोटी ४० लाख ९३ हजार २५८ रुपयांची नुकसानभरपाई वसूल करण्यात आली. दाखलपूर्व आणि प्रलंबित असे दोन प्रकारचे दावे तडजोडीसाठी ठेवण्यात आले होते, अशी माहिती पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रदीप अष्टुरकर यांनी दिली.जुलै महिन्यात झालेल्या लोकअदालतीमध्ये दावे निकाली काढण्यात पुणे जिल्ह्याने तिसरा क्रमांक मिळवला होता. पुण्यात ६५ हजार १४७ दावे तडजोडीसाठी ठेवण्यात आले होते. त्यापैकी २५ हजार ७६५ दावे निकाली काढण्यात आले. निकाली काढलेल्या दाव्यात २३ हजार १४२ दावे दाखलपूर्व आहेत, तर २ हजार ६२३ दावे प्रलंबित स्वरूपाचे होते. २० कोटी ३५ लाख ८३ हजार ६८३ रुपयांची नुकसानभरपाई वसूल करण्यात आली होती. धनादेश बाऊन्स, बँक, मोटार अपघात न्याय प्राधिकरण, वीज, पाणी, वैवाहिक, जमिनीसंबंधी वाद, महसूल, विविध सेवा आणि तडजोड योग्य फौजदारी, दिवाणी स्वरूपाचे प्रलंबित दावे तडजोडीसाठी ठेवण्यात आले होते. प्रलंबित आणि दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीने मिटविण्यासाठी लोकअदालत होते.>मोटार अपघात न्याय प्राधिकरणाच्या ३६ दाव्यांत तडजोडअपघातात मृत्यू व्यक्तींचे वारस अथवा जखमी झालेल्या व्यक्ती नुकसानभरपाईसाठी मोटार अपघात न्याय प्राधिकरणात दावा दाखल करतात. महालोकअदालतीत अशा स्वरूपाचे ११५ दावे तडजोडीसाठी होते. त्यापैकी ३६ दाव्यांमध्ये तडजोड झाली. त्यामध्ये २ कोटी ६६ लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्यात आली असल्याची माहिती अ‍ॅड. अतुल गुंजाळ यांनी दिली.>कौटुंबिक न्यायालयात ८ खटले निकालीकौटुंबिक न्यायालयातदेखील लोकअदालत भरविण्यात आली होती. या ठिकाणी एकूण ७२ खटले निकालासाठी ठेवण्यात आले होते. त्यातील ८ दावे निकाली निघाले. न्यायाधीश व्ही. व्ही. शहापूरकर, एस. जी. तांबे आणि डी. डी. जोशी यांच्या पॅनलने हे आदेश दिले, अशी माहिती दी पुणे फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनच्या अध्यक्षा अ‍ॅड. वैशाली चांदणे यांनी दिली.>जिल्हा निकाली निघालेले दावे नुकसानभरपाईपुणे ३७,७२१ ३९,४०,९३,२५८सातारा ३२,६१५ १६,९४,९२,३०३रायगड १४,१६४ १४,९४,०९,१००नाशिक १२,५१४ १६,९७,३५,६८७मुंबई ५९३२ १८,०७,०३,४०३